पिढ्यान्पिढ्या भारतीय पालक आपल्या मुलींना मन लावून शिक्षण घे, मोठी स्वप्ने पाहा आणि आयुष्यात काहीतरी मोठे कर, असे सांगत आले आहेत. मात्र लग्नाचे वय आले की हा संदेश अचानक बदलतो. त्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते की आता तडजोड करायला शिक. ही परिस्थिती मी अनेकदा प्रत्यक्ष पाहिली आहे. डॉक्टर, उद्योजक, कलाकार किंवा शिक्षणतज्ज्ञ होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या अनेक गुणी मुली महाविद्यालयानंतर तर काही वेळा शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच अचानक दिसेनाशा होतात. त्यांचे लग्न होते. त्यानंतर करिअर हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा पर्याय राहत नाही. आर्थिक स्वावलंबनालाही दुय्यम स्थान दिले जाते. त्यांच्या सर्व महत्त्वाकांक्षा जणू एखाद्या डिझायनर लेहंग्यात गुंडाळून ठेवल्या जातात. त्यांची ओळख केवळ तीन शब्दांत मर्यादित राहते – पत्नी, आई आणि सून. येथे एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. हा लेख अरेंज्ड मॅरेजच्या विरोधात नाही. अशा लाखो विवाहांत प्रेम, जिव्हाळा व यश आहे. मात्र येथे आज्ञाधारकपणाला सद्गुण, पालनाला संमती आणि कर्तव्याला इच्छा समजण्याची चूक करतात. अशा अरेंज्ड मॅरेज पद्धतीवर येथे प्रश्न उपस्थित केला जातो. गेल्या काही दशकांत भारतात मोठे बदल झाले आहेत. महिला विद्यापीठांच्या गुणवत्ता यादीत अव्वल येत आहेत. कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत. लढाऊ विमानांच्या तुकड्यांचे नेतृत्व करत आहेत. युनिकॉर्न कंपन्या उभारत आहेत व सर्वोच्च न्यायालयात प्रभावी बाजू मांडत आहेत. आपण त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवतो. पण स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा निर्णय घेण्याइतका विश्वास मात्र आजही ठेवत नाही. आजही प्रश्न तेच आहेत – लोक काय म्हणतील? मुलगा योग्य समाजातील आहे का? मुलगी जुळवून घेऊ शकेल का? पण एखाद्या मुलीला तिची स्वतःची इच्छा काय आहे, हा प्रश्न किती वेळा विचारतो? अलीकडील सिया गोयल प्रकरणच घ्या. सियाने केलेल्या गुन्ह्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. मात्र या घटनेने अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न समोर आणले. महिलांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी एका निर्णयावर स्वतःचा अधिकार नसल्याची जाणीव होते. तेव्हा काय घडते? केवळ कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आखून दिलेले आयुष्य जगण्याचे भावनिक परिणाम काय असतात? हे प्रश्न एखादी शोकांतिका घडल्यानंतर विचारण्याची वाट पाहता येणार नाही. विवाह ठरण्यापूर्वीच ते विचारले गेले पाहिजेत. कारण आजची पिढी संमती म्हणजे केवळ लग्नाच्या दिवशी ‘हो’ म्हणणे असे मानत नाही. त्यांच्या दृष्टीने संमती म्हणजे भावनिक दबाव, सामाजिक बहिष्कार किंवा आयुष्यभर अपराधीपणाची भावना न बाळगता ‘नाही’ म्हणण्याचे स्वातंत्र्य. लग्न करायचे की नाही, कधी करायचे आणि कोणाशी करायचे, याचा निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य. आणि हे कोणतेही पाश्चात्त्य विचार नाहीत; ते मानवी मूल्ये आहेत. विसंगती अशी की आपण मुलींच्या शिक्षणावर वर्षानुवर्षे गुंतवणूक करतो. त्यांना स्वतंत्र विचार करायला, मोठ्या स्पर्धांमध्ये उतरायला प्रोत्साहन देतो. पण लग्नाचा विषय आला की त्याच स्वतंत्र विचाराला बंडखोरी मानले जाते. समस्या अरेंज्ड मॅरेजमध्ये नाही. समस्या अशी आहे की विवाहसंस्था वगळता जवळपास प्रत्येक गोष्टीचे आधुनिकीकरण झाले आहे. मात्र विवाह हा आज्ञाधारकपणाचे बक्षीस नसून स्वतंत्र निर्णयाचा परिणाम असला पाहिजे. कुटुंबीयांनी भावी जोडीदारांची ओळख करून देण्यात काहीच गैर नाही. समाजाने परंपरांचा उत्सव साजरा करण्यातही हरकत नाही. संस्कृतीही टिकून राहू शकते. पण एखादी परंपरा व्यक्तीच्या स्वातंत्र्याला बळ देण्याऐवजी त्याचे दमन करू लागली, तर त्यात बदल करणे आवश्यक ठरते. सर्वात मजबूत नाती कौटुंबिक दबाव किंवा सामाजिक जबाबदारीवर उभी नसतात. सर्वात मजबूत नाती दोन व्यक्तींनी एकमेकांची स्वतंत्रपणे केलेली निवड यावर आधारलेली असतात. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) समस्या अरेंज्ड मॅरेजमध्ये नाही. समस्या अशी आहे की विवाहसंस्था वगळता आपण जवळपास प्रत्येक क्षेत्राचे आधुनिकीकरण केले आहे. विवाह हा केवळ आज्ञाधारकपणाचे बक्षीस नसून व्यक्तीच्या स्वतंत्र निर्णयाचा परिणाम असला पाहिजे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
- नागपूर: "मी दिलेला निर्णय टिकून राहणार; सिब्बलांचे मत म्हणजे न्यायालयाचे मत नाही" एका विधानामुळे कायदेशीर व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
- पुणे: "राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या पक्षासोबत युती करू नये, हेच महाराष्ट्राच्या आणि माझ्या मनातील आहे" हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्ट भाष्य!
महाराष्ट्र
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- रत्नागिरी: चिपळूणमधील दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू! मासेमारीसाठी गेलेले दोघे मित्र बुडाले, गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडले मृतदेह
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल


























Subscribe to my channel




