दिवसभरच्या धावपळीनंतर शेवटी संध्याकाळी, रात्री लक्षात येतं की आज फक्त ओढाताणच आपल्या पदरी पडली. अंथरुणावर पडल्यावर ही झोप लागत नाही. अनेक लोकांना तर झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. काहीजण व्यसनाच्या आहारी जातात. प्रत्येक जण दिवसभर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवत नाही की सगळी धावपळ, ओढाताण कशासाठी चालू आहे? दिवसभर आपण व्यवहाराकडे लक्ष देत असतो. एकावेळी अनेक कामं,अनेक व्यवहार असतात. काही गोष्टी काही व्यवहार आपल्या हातातले नसतात,आपल्या आटोक्यातले नसतात. ते पार पाडताना ताणतणाव होतो. हे सर्व अखेर कशासाठी चालू आहे? कोणत्या प्राप्तीसाठी चालू आहे? याचा विचार मात्र केलेला नसतो. बहुतांशी नेमकी हीच चूक घडते की भौतिकतेच्या आहारी गेलेला मनुष्य साधनांना साध्य समजत आहे. प्रगती सोबत स्थिरता तणाव मुक्ती शांतता आंतरिक शांती हे साध्य आहे. यासाठी जी मेहनत करायची ती साधना. परंतु साधनापर्यंतच अडकत गेल्यामुळे साध्या पर्यंत पोहोचता येत नाही आणि परिणामी तो करणारा म्हणजे साधक हा अस्थिर, तणावग्रस्त, चिंताग्रस्त असाच असतो आणि दिसतो. आज जगात वावरत असलेल्या किती लोकांना याची जाणीव आहे की जीवनाचा प्रमुख उद्देश शांती आणि स्थिरता आहे. ही शांती आणि स्थिरता मिळवण्यासाठी दिवसभराचे सगळे व्यवहार,धावपळ आणि उठाठेव करायची असते. सकाळी उठल्याबरोबर आपण साधारणपणे न बोलता दिवसभराची कामे मनात ठरवतो. ती कशाप्रकारे करायची याची आखणी करतो. आणि ते सर्व करत असताना काही पूर्ण होतात तर काही ना अडचणी येतात. असाच दिवस निघून जातो आणि शेवटी आपण थकलो आहोत, तणावग्रस्त आहोत,अत्यंत अस्थिर अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीने झोपतो. आपल्या नियोजनामध्ये सगळी कामं असतात परंतु स्थिरता आणि शांतीचे नियमन नसते. कुठे थांबायचे, केव्हा थांबायचे हे निश्चित नसते. सगळी कार्य पार पाडत असताना मनाला शांतता केव्हा लाभली आणि वास्तविक जगण्याचा आनंद काही मिळाला का हे आपण तपासलेले नसते. जन्माला येणे आणि मागे नाव लौकिक न ठेवता केवळ कष्टात आयुष्य कंठून एके दिवशी मरणे याला जीवन जगणे असे म्हणत नाहीत. तसेच दिवस उजाडला, धावपळ, पळापळी कष्ट सुरू झाली आणि त्यामध्येच दिवसाचा शेवट झाला हा ही दिवसाचा निरर्थक वाईट अंत आहे. म्हणून रोजच्या दिवशी दररोजच्या कामात जशी काम करायची पद्धत ठरवलेली असते त्यातच हे विसरायला नको हे सर्व धावपळ सर्व मेहनत ही स्थिरता आणि शांती लाभावी यासाठी आहे. म्हणून कुठेतरी थांबणे मनाला समजूत घालून घेणे आणि खरोखर खऱ्या अर्थाने जगणे महत्त्वाचे ठरते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
महाराष्ट्र
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- जालना: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात उद्या जालना, बीड, परभणी आणि लातूर कडकडीत बंद; काय सुरू आणि काय राहणार बंद?
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात


























Subscribe to my channel




