सरकार संसदेच्या आगामी अधिवेशनात नवीन परिसीमन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. असे करण्यामागे भक्कम घटनात्मक आणि लोकशाहीवादी तर्क आहेत. लोकशाही व्यवस्था वेळोवेळी निवडणूक क्षेत्रांचे पुनर्निर्धारण करते, जेणेकरून जनतेचे प्रतिनिधित्व हे बदलत्या लोकसंख्येनुसार कायम राहील. लोकशाहीचा मुख्य आधार हा आहे की, प्रत्येक नागरिकाच्या मताचे मूल्य समान असावे. काळानुसार लोकसंख्येत होणारे बदल मतदारसंघात विषमता निर्माण करतात. काही खासदार इतरांच्या तुलनेत खूप मोठ्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करू लागतात. वास्तविक, परिसीमन प्रक्रियेला आधीच उशीर झाला आहे. मागील मोठी परिसीमन प्रक्रिया 2001 च्या जनगणनेच्या आधारे करण्यात आली होती, पण लोकसभेतील जागांची संख्या स्थिर ठेवण्यात आली होती. तेव्हापासून भारताच्या लोकसंख्येत मोठे बदल झाले आहेत. शहरीकरण वेगाने झाले आहे. स्थलांतरामुळे लोकसंख्येचे स्वरूप बदलले आहे. नवीन आर्थिक केंद्र उदयाला आली आहेत. अनेक ठिकाणी मतदारसंघांच्या सीमा आता सध्याच्या वास्तवाशी जुळत नाहीत. मात्र, परिसीमन हा केवळ गणिताचा विषय नाही. तो लोकसंख्या, राजकीय सत्ता, शासन व्यवस्था आणि राष्ट्रीय एकता यांच्यातील नाजूक समतोल बिघडवू शकतो. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांसारख्या राज्यांनी अनेक दशकांपासून शिक्षण, आरोग्य आणि कुटुंब नियोजनावर मोठा खर्च केला आहे. त्यांची लोकसंख्या वाढ स्थिर झाली आहे. त्याच वेळी, ही राज्ये राष्ट्रीय विकास आणि कर-राजस्व भरण्यात मोलाची भूमिका बजावत आहेत. जर परिसीमन केवळ लोकसंख्येच्या आधारावर केले गेले, तर संसदेत या राज्यांचा राजकीय प्रभाव कमी होऊ शकतो. उत्तर भारतातील जी राज्ये आहेत,जिथे लोकसंख्या वाढ अधिक आहे. तिथे लोकसंख्येच्या प्रमाणात अधिक प्रतिनिधित्व मिळेल. ही धारणा पूर्णपणे योग्य आहे की नाही, हा वादाचा मुद्दा आहे. राजकारण केवळ तथ्यांवर चालत नाही; ते मानसशास्त्रावरही अवलंबून असते. कोणतीही लोकशाही प्रक्रिया, देशाला एकसंघ ठेवणाऱ्या भावनिक बंधांना कमकुवत करून होऊ नये. हा प्रश्नही महत्त्वाचा आहे की, नवीन जनगणनेशिवाय परिसीमन पुढे नेणे योग्य आहे का? परिसीमन ही मुळात लोकसंख्येवर आधारित प्रक्रिया आहे. जर अचूक प्रतिनिधित्व सुनिश्चित करायचे असेल, तर कोणतीही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी नवीन आणि विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. जनगणना पूर्ण झाल्याशिवाय परिसीमन प्रक्रिया सुरू केल्यास प्रक्रिया अपूर्ण किंवा जुन्या आकडेवारीवर आधारित असल्याचा आरोप होईल. याव्यतिरिक्त, परिसीमन केवळ जागांच्या संख्येचा विषय नाही. यात मतदारसंघांच्या सीमा कुठे असतील, हे ठरवणेही समाविष्ट असते. असे निर्णय निवडणुकीच्या निकालांवर मोठा प्रभाव पाडू शकतात. त्यामुळे, ही जबाबदारी ज्या संस्थेकडे सोपवली जाईल, तिची विश्वासार्हता सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या सर्व कारणांमुळे हे गरजेचे आहे की, सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करून परिसीमन प्रक्रियेवर एकमत घडवून आणावे. एक शक्यता अशी असू शकते की, हे अनेक निवडणूक चक्रांमध्ये टप्प्याटप्प्याने लागू करावे. यामुळे राजकीय व्यवस्था आणि जनमताला हळूहळू जुळवून घेण्याची संधी मिळेल. दुसरा पर्याय ‘वेटेड-रिप्रझेंटेशन’चा (भारित प्रतिनिधित्व) असू शकतो. जर हे समजदारीने केले, तर ते लोकशाही तत्त्वांचे उल्लंघन ठरणार नाही. जगातील देश अनेकदा लोकसंख्येवर आधारित प्रतिनिधित्वासोबत अशी यंत्रणा अवलंबतात, जी प्रादेशिक हितसंबंधांचे रक्षण करते. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या सिनेटमध्येही लोकसंख्येचा विचार न करता राज्यांना समान प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. जर्मनीचा ‘बुंडेसराट’ देखील अशाच प्रकारे प्रशासकीय संतुलनाची यंत्रणा राबवतो. भारताला या मॉडेल्सची नक्कल करण्याची गरज नाही, पण यामागच्या मूळ विचारधारेतून निश्चितपणे शिकता येईल. उद्देश असा असावा की, ज्या राज्यांनी विकासाची ध्येये गाठली आहेत, त्यांना राजकीयदृष्ट्या नुकसान सोसावे लागू नये. हे अधिक योग्य ठरेल की, विधेयक संसदेच्या सिलेक्ट-कमिटीकडे पाठवले जावे, जिथे सर्वांच्या उपस्थितीत त्यावर पुढील चर्चा होऊ शकेल. देशाने वेळोवेळी हे सिद्ध केले आहे की, कठीण प्रश्नांचे समाधान संवाद, सामंजस्य आणि परस्पर आदरातून काढले जाऊ शकते. परिसीमनावरील चर्चाही अशाच दूरदर्शी नेतृत्वाची मागणी करते.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
परिसीमन प्रक्रियेत मतदारसंघांच्या सीमा कुठे असतील, हे ठरवणेही समाविष्ट असते. असे निर्णय निवडणुकीच्या निकालांवर मोठा प्रभाव पाडू शकतात. त्यामुळे ही जबाबदारी ज्या संस्थेकडे सोपवली जाईल, तिची विश्वासार्हता सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिककरांवर पाणीबाणीचे संकट! जून-जुलैत दर शनिवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद, तर ऑगस्टमध्ये एक दिवसाआड पाणी
- परीक्षेच्या तणावातून पुन्हा एक बळी! NEET पुनर्रिक्षेच्या अवघ्या ३ दिवसांआधी अहमदाबादमध्ये विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
- कोकण रेल्वेचा कायापालट! गाड्या वेळेवर धावणार, गर्दी संपणार; 'कवच'सह २६३ किमी मार्गाचे दुहेरीकरण आणि वंदे भारतचे डबे होणार दुप्पट
- भारतासाठी सर्वात मोठा दिलासा! 'होर्मुझ' जलमार्ग खुला होताच ४० एलपीजी टँकर्स भारताकडे रवाना, गॅस-इंधन स्वस्त होणार?
महाराष्ट्र
- नाशिककरांवर पाणीबाणीचे संकट! जून-जुलैत दर शनिवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद, तर ऑगस्टमध्ये एक दिवसाआड पाणी
- परीक्षेच्या तणावातून पुन्हा एक बळी! NEET पुनर्रिक्षेच्या अवघ्या ३ दिवसांआधी अहमदाबादमध्ये विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
- मान्सून खोळंबल्याने भाजीपाला महागला! बाजार समित्यांमध्ये आवक ४० टक्क्यांनी घटली; गृहिणींचे बजेट कोलमडले
- नाशिक: सुटकेसमधील महिलेच्या हत्येचा उलगडा; हातावरील टॅटू ठरला तपासाचा धागा, प्रेम प्रकरणातून भीषण हत्या.
गुन्हा
- अंबरनाथ: डॉक्टर पतीची सीसीटीव्हीतून पत्नीवर पाळत; हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या.
- पुणे: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! ५० चिमुरड्यांचा जीव टांगणीला; पुण्यात चालकाच्या दारुड्या वृत्तीमुळे मोठा अनर्थ!
- मंदिरात बनावट लग्न करून कॉलेज तरुणीवर वारंवार अत्याचार; पांढरकवडा पोलिसांत नराधमाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
- विजापूरहून पुण्याला चाललेला गुटख्याचा मोठा साठा जप्त; आटपाडी पोलिसांची धडक कारवाई, तब्बल २०० पोती पकडली!
राजकीय
- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: मतदानाला सुरुवात, खासदार बंडाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले!
- दिल्ली: ऑपरेशन टायगर फत्ते! उद्धवसेनेच्या ६ खासदारांचा वेगळा गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांकडून मिळाली मान्यता.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- मुंबई: महाराष्ट्र पुन्हा 'राजकीय भूकंप'? ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा!
इतर
- 'फूड सेफ्टी' अलर्ट! तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचे कारण; FSSAI ने जारी केले कडक नवीन नियम.
- आजचे राशिभविष्य १७ जून २०२६: चंद्र, शुक्र आणि गुरूच्या कृपेने या राशींना मिळणार तिप्पट लाभ!
- एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने खरंच सांधेदुखी वाढते का? ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी सांगितले वेदनांचे खरे कारण.
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही 'कफ सिरप'; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- भारतासाठी सर्वात मोठा दिलासा! 'होर्मुझ' जलमार्ग खुला होताच ४० एलपीजी टँकर्स भारताकडे रवाना, गॅस-इंधन स्वस्त होणार?
- मोठी आर्थिक घडामोड! भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू; स्कॉच व्हिस्की आणि लक्झरी कार होणार स्वस्त
- हरियाणा: पानिपतमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाकडून अत्याचार; 'रमेश छोटू' वर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!
- ओडिशा: समोरा-समोरील धडकेत दोन ट्रकला भीषण आग, दोन्ही चालक जिवंत जळाले!


























Subscribe to my channel


