पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:बदलत्या काळात कुटुंबांचा‎ आधार परमात्मा असावा

काही गोष्टींनी बाहेरचे जीवन आधीच कठीण करून टाकले आहे-‎गोंगाट, दारू, दिखाऊपणा आणि वैभवाचे प्रदर्शन. यामुळे बाहेरचे जग ‎विचित्र आणि अस्वस्थ करणारे झाले . एक काळ असा होता की,‎शांततेच्या शोधात लोक बाहेरून घरी परतायचे. पण आता या गोष्टी‎ घरातही शिरल्या आहेत. घरातही गोंगाट वाढला. कुटुंबातील सदस्य‎ परस्परांशी अपशब्दांत बोलतात. मोठेपणाचा आव आणतात. घरात‎एखादा कार्यक्रम असला की, लोक तक्रारींच्या सुरात आणि नाराजीच्या ‎चेहऱ्याने दिसू लागतात. दारूसारख्या विषालाही आता लोक मौल्यवान‎ पेय समजू लागले आहेत. गोंगाट इतका वाढला आहे की, तो मानसिक‎ आजाराचे रूप घेत आहे. शान म्हणजे अंतर्मनातील गौरव आणि ‎प्रतिष्ठा; पण ती हळूहळू दिखाऊ वैभवात बदलली आहे. नाती आता ‎व्यवहार बनली आहेत किंवा प्रदर्शनाची वस्तू झाली आहेत. अशा‎ बदलत्या काळात किमान कुटुंबांचा आधार परमात्मा असायला हवा.‎ आणि त्यासाठीचा मार्ग म्हणजे योग. घरांमध्ये सामूहिक योग करावा.‎‎

This post was originally published on this site.



गुन्हा

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *