पूर्वी रांची हे अतिशय सुंदर शहर होते. ते आजच्यासारखे मोठे शहर नव्हते तर एक छोटेसे गाव होते.त्याच्या आसपास अनेक आदिवासी वस्त्या होत्या. मध्येतलाव, नद्या आणि बागा होत्या. हळूहळू त्या वस्त्यांच्याजागी मोठ्या इमारती, मॉल आणि उड्डाण पूल उभेराहिले. आता फक्त त्यांची नावे उरली आहेत-कांताटोली, डंगराटोली, सिरमटोली, करमटोली इत्यादी.मी अशाच राहिलेल्या एका वस्तीत राहतो. रांचीच्याकाठावर असलेली ही उरांव समाजाची वस्ती आहे.एका स्थानिक झाडाच्या नावावरून तिला ‘नीमटोली’म्हटले जाते. तिथले गावासारखे वातावरण हळूहळू कमी होत आहे,पण अजूनही जिवंत आहे. घरासमोर मोठे चिंचेचे झाड आहे. मुले त्या झाडाखाली खेळतात. त्यांच्याकडे बाजारातून आणलेली खेळणी नसतात. बांबू, लाकडाचे तुकडे, तुटलेल्या चपला, रिकाम्या बाटल्या आणि जुन्या टायरांपासून ती स्वतःची खेळणी तयार करतात. सामान्य खेळण्यांमध्येही ती तासन्तास आनंदाने रमून जातात. अनेक प्राणीही गावाचा भाग आहेत. कुत्रे, मांजरे, बकऱ्या आणि कोंबड्या इकडे-तिकडे दिसतात. त्यांना बांधून ठेवले जात नाही. तेमोकळेपणाने फिरतात आणि जणू समुदायाचाच भागआहेत. नीमटोलीतील आवाज खूप शांतता देणारेआहेत. तिथे वाहनांचे हॉर्न ऐकू येत नाहीत. पक्ष्यांचाकिलबिलाट, मुलांचे हसणे, फेरीवाल्यांचे आवाजआणि पावसाच्या सरींचा नाद ऐकू येतो. मला सकाळीउठताना पक्ष्यांचे आवाज ऐकायला खूप आवडते. गावात एक छोटी किराणा दुकान आहे. मिस्टर टोप्पोआणि त्यांची पत्नी मिळून ते चालवतात. त्यांनीदुकानाला मुलगी बुलबुलचे नाव दिले आहे. दोघेही खूपमिळून मिसळून वागणारे आहेत. अनेक दुकानदार जास्त पैसे कमावण्यासाठी ग्राहकांनाघाईत पाठवतात. पण मिस्टर टोप्पो आणि त्यांची पत्नीग्राहकांशी गप्पा मारणे पसंत करतात. माझे काही शेजारीगरिबीत जीवन जगत आहेत. त्यात एक विधवा महिलाआहे. त्यांचे मूल दिव्यांग आहे. त्या उदरनिर्वाहासाठीगावठी दारू तयार करतात. गावातील लोक त्यांचा आदर करतात. त्यांच्याकडेछोटे-छोटे गट येतात, शांतपणे दारू पितात आणि नंतरघरी जातात किंवा झाडाखाली विसावतात. पण मीत्यांना कधी भांडताना किंवा ओरडताना पाहिले नाही.कधी-कधी नीमटोलीतील सर्व लोक एखाद्यामेजवानीसाठी किंवा सणासाठी एकत्र येतात. उरांव समाजाचा सर्वात मोठा सण म्हणजे सरहुल. त्यादिवशी संपूर्ण गाव सिरमटोली सरना स्थळाकडेजाणाऱ्या मिरवणुकीत सहभागी होते. शहरभरलाल-पांढऱ्या पारंपरिक कपड्यांची झलक दिसते.मिरवणुकीत मोठी गर्दी असते. पण ती शांत आणिशिस्तबद्ध असते. ते दृश्य खूप सुंदर असते. एकदा मी नीमटोलीतील काहीवृद्ध महिलांना त्यांच्या बालपणाबद्दल विचारले. मीम्हणालो, पूर्वी लोक खूप गरीब होते. आता घरात पंखेआणि टीव्ही आहेत. मग जीवन चांगले झाले का? त्यासगळ्या एकाच वेळी म्हणाल्या की, पूर्वीचे जीवनअधिक चांगले होते! त्यांना आठवत होते की, शाळेत जाताना त्या स्वच्छतलावात पोहत असत आणि परतताना खाण्यासाठीएकत्र शिंपले पकडत असत. पण आता असे वाटते की,जुन्या जीवनपद्धतीची थोडी झलक उरली आहे, तीहीलवकरच संपेल. नीमटोलीच्या आसपास मोठमोठेअपार्टमेंट उभे राहत आहेत. ही वस्ती कधीही विस्थापितहोऊ शकते. त्याच्यासोबत जगण्याची एक पद्धतहीनाहीशी होईल. मी असे म्हणत नाही की, आपण पुन्हाजुन्या काळात जावे. पण त्या जीवनातून प्रेरणा घ्यायलाहवी आणि त्यातील मूल्ये जपण्याचा प्रयत्न करायलाहवा. आपण सामुदायिक जीवनाचा खजिना हरवून बसलो आहोत. पण कदाचित एखाद्या दिवशी तो पुन्हासापडेल! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
मी असे म्हणत नाही की आपण पुन्हाजुन्या काळात परत जावे. पण त्याजीवनातून प्रेरणा घ्यायला हवी आणित्यातील मूल्ये जपण्याचा प्रयत्न करायलाहवा. पण सत्य हेच आहे की आपणसामूहिक जीवनाचा खजिना गमावलाआहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'दुकान उघडलंस तर ठार मारेन!' दारूसाठी पैसे मागितल्याचा राग; वाईन शॉप कर्मचाऱ्यावर बाटलीने जीवघेणा हल्ला
- अमरावती: बसच चोरीला... तेही थेट बसस्थानकातून! आरोपीची २० बसेस चोरल्याची कबुली; पोलिसही चक्रावले
- मायलेज न सांगताच मारुतीची 'फ्लेक्स-फ्यूल' वॅगनआर बाजारात; तीन आठवड्यांत केवळ ३ कारची विक्री!
- गोव्यात जन्म-मृत्यू नोंदणी आता पूर्णपणे ऑनलाइन; १ जुलैपासून केंद्रीय CRS पोर्टलवरूनच होणार सर्व प्रक्रिया!
महाराष्ट्र
- शक्तीपीठ' महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; ७ जुलैला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार महा-धरणे आंदोलन!
- अमरावती: बसच चोरीला... तेही थेट बसस्थानकातून! आरोपीची २० बसेस चोरल्याची कबुली; पोलिसही चक्रावले
- अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा धसका! माहिती अधिकार नियमांतील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्री फडणवीसांचे पत्र
- पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रोडवर १५ दिवसांपासून वाहतेय मुतारीचे पाणी; प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर!
गुन्हा
- बीड: स्कॉर्पिओ आणि १० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल.
- ऐरोली महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा! चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती सोनम डोंगरे आणि बाळाचा मृत्यू; नवी मुंबईत खळबळ!
- रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीची तस्करी करताना महाराष्ट्रातील दोन पोलीस छत्तीसगडमध्ये जेरबंद; खवल्या मांजराचे खवलेही जप्त!
- कोठडीतील मृत्यूला जबाबदार कोण? वाशिममधील धक्कादायक प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा!
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

मुंबईची शान असलेला जुहू बीच कचऱ्याच्या विळख्यात! #JuhuBeach #Mumbai #MumbaiNews #Beach #IndiaNews
Chief Minister Devendra Fadnavis and Deputy CM Sunetra Pawar Murlidhar Mohol #Leadership v
अमळनेरमध्ये संतापजनक प्रकार! बेवारस मृतदेह कचऱ्याच्या घंटागाडीतून स्मशानभूमीत #Amalner #Jalgaon
देश विदेश
- मायलेज न सांगताच मारुतीची 'फ्लेक्स-फ्यूल' वॅगनआर बाजारात; तीन आठवड्यांत केवळ ३ कारची विक्री!
- आता आयुष्मान भारत योजनेची कामे होतील व्हॉट्सॲपवर; केंद्र सरकारचा 'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च!
- बसच चोरीला! तेही थेट बसस्थानकातून.. आरोपीकडून तब्बल २० बसेस चोरल्याची कबुली; पोलीसही चक्रावले!
- कोकणात पावसाचा हाहाकार; ५ जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' कायम! केरळ ते महाराष्ट्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय.



























Subscribe to my channel

