पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सुट्टी जरूर साजरी करा; पण या चार गोष्टी लक्षात ठेवा

मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत किंवा लागणार आहेत. बहुतेक पालक मुलांसह प्रवासाची तयारी करत आहेत. ऋषी-मुनीही विश्रांती घेत असत. त्यांची सुट्टी साजरी करण्याची पद्धत वेगळी होती. कारण गुरुकुल व्यवस्था होती. तुम्ही सुट्टीचे नियोजन करता, तेव्हा सर्वप्रथम कालावधी ठरवा. सोबत कोण असणार हे निश्चित करा. ठिकाण बदलत असल्यास सावधगिरी बाळगा. जुने ठिकाण सोडल्यास तो संपर्क किती काळ ठेवायचा,हे ठरवा. म्हणजे सुरक्षित परत या. सुट्टीचा योग्य उपयोग कसा करावा याबाबत रामचरितमानसमध्ये ओळ आहे. प्रभू राम, सीता वलक्ष्मण वनवासाच्या काळात एकांतात होते. ती ओळ अशी आहे— “एहि बिधि गए कछुक दिन बीती, कहत बिराग ज्ञान गुन नीति.” काही दिवस असे गेले की त्यांनी एकमेकांशी वैराग्य, ज्ञान, गुण आणि नीती यांवर चर्चा केली. सुट्टी साजरी करा. पण या चार गोष्टी त्या काळात घडल्यास मानसिक आरोग्यासह जाल, शारीरिक आरोग्यासह सुट्टी साजरी कराल व दोन्हींसह परत याल.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *