तापमान वाढू लागते तेव्हा सर्वत्र झाडे लावा, हिरवळवाढवा, तेव्हाच उष्णता कमी होईल, ही चर्चा सुरू होते. हा विचार काही अंशी बरोबर आहे.पण पूर्ण सत्य नाही. आज आपण असह्य उष्णताअनुभवत आहोत. तिचे मुख्य कारण झाडतोड नाही, तरत्या हरितगृह वायू आहेत. ते आपण सतत आपल्यावातावरणात सोडत आहोत. हे वायू एका चादरीसारखेपृथ्वीला झाकून टाकतात आणि सूर्याची उष्णता बाहेरजाऊ देत नाहीत. आज वातावरणातील कार्बन डायऑक् साइडचे प्रमाणसामान्य पातळीपेक्षा सुमारे ५३ टक्के अधिक आहे. याचाअर्थ पृथ्वीची उष्णता अडकवून ठेवण्याची क्षमता ५३टक्क्यांनी वाढली आहे. या अतिरिक्त उष्णतेमुळे पृथ्वीचेतापमान सतत वाढत आहे. सध्या या अतिरिक्त उष्णतेचेसर्वात मोठे कारण म्हणजे आपला ऊर्जेचा वापर, त्यातपेट्रोल, डिझेल, गॅस, वीज आणि रोजच्या वापरातीलवस्तूंचा समावेश आहे. सध्याच्या काळात एकूण कार्बनउत्सर्जनापैकी सुमारे ७५ टक्के हिस्सा याचाच आहे.जमिनीच्या वापरातील बदल, शेती आणि जंगलतोडयामुळेही कार्बन उत्सर्जन होते, पण हे सर्व मिळून सुमारे२५ टक्के असते. या २५ टक्क्यांमध्येही झाडांच्या तोडीमुळेहोणारे कार्बन उत्सर्जन फक्त सुमारे १० टक्केच आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की समस्येचा मोठा भागआपली जीवनशैली व उपभोगाशी जोडलेला आहे. हीचती जागा आहे. तेथे आपण वैयक्तिक, सामाजिक आणिराजकीय पातळीवर चूक करतो. झाडे लावणे निश्चितचआवश्यक आहे. पण ताे हवामान बदलावरील मूळ उपायनाही. आपला उपभोग असाच वाढत राहिला, तरकोट्यवधी अब्जावधी झाडेही ही समस्या संतुलित करूशकणार नाहीत. आपल्याला एक अस्वस्थ करणारे, पण आवश्यक सत्यस्वीकारावे लागेल— आज मानवजात पृथ्वीच्याक्षमतेपेक्षा खूप जास्त संसाधनांचा वापर करत आहे.आपण असे जगत आहोत. जणू आपल्या जवळएकापेक्षा अधिक पृथ्वी आहेतय पण प्रत्यक्षात फक्तएकच आहे. या परिस्थितीत सर्वात पहिले आणि सर्वातप्रभावी पाऊल काय असू शकते? आपल्याला आपल्याऊर्जा आणि वस्तूंच्या वापरात जवळपास अर्धी कपातकरावी लागेल. आपल्या गरजा, इच्छांमध्ये संतुलननिर्माण करत नाही, तोपर्यंत कोणतीही मोहीमकायमस्वरूपी फलद्रुप होऊ शकत नाही. दुर्दैवानेसरकारांचा प्रत्येक प्रयत्न आणि कंपन्यांची प्रत्येकजाहिरात तुम्हाला जास्तीत जास्त उपभोगासाठी प्रोत्साहितकरते, आणि तुम्ही त्या दुष्टचक्रात अडकता. आपणअनेकदा म्हणतो— प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगलाअसतो. हवामान बदलाच्या संदर्भात ही गोष्ट आणखीअचूक ठरते. झाडे लावणे, सोलर पॅनल लावणे किंवाइलेक्ट्रिक वाहन स्वीकारणे— हे सर्व उपचाराचेकौतुकास्पद प्रयत्न आहेत. पण प्रतिबंध म्हणजेअनावश्यक उपभोग कमी करणे. ही बाब पूर्णपणे आपल्यास्वतःच्या निर्णयांवर अवलंबून आहे. आपण काय खरेदीकरतो, किती वापरतो, आणि काय सोडू शकतो— हेचमहत्त्वाचे आहे. हवामान सुधारासाठी सर्वात मोठे पाऊलम्हणजे इन-ॲक्टव्हिटी, म्हणजेच काही न करणे. याचाअर्थ अनावश्यक गोष्टी न खरेदी करणे, न वापरणे. याचापरिणाम खूप मोठा आहे. आपण आजही थांबलो नाही,तर इतिहास आपल्यालाही ‘एक हाेता डायनासोर..’यासारखे लक्षात ठेवेल. अनेक वर्षांनंतर पृथ्वीवर एकनवी प्रजाती येईल आणि म्हणेल, एकेकाळी पृथ्वीवरमाणसे राहत होती! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
