हवामान सुधारासाठी गरजेची गोष्ट ‎”इन-ॲक्टिव्हिटी’ अर्थात काही करू नका‎:इन-ॲक्टिव्हिटी अर्थात अनावश्यक गोष्टीची ना खरेदी ना वापर… गोष्ट छोटी पण परिणाम मोठा‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎तापमान वाढू लागते तेव्हा सर्वत्र झाडे लावा, हिरवळ‎वाढवा, तेव्हाच उष्णता कमी होईल,‎ ही चर्चा सुरू होते. हा विचार काही अंशी बरोबर आहे.‎पण पूर्ण सत्य नाही. आज आपण असह्य उष्णता‎अनुभवत आहोत. तिचे मुख्य कारण झाडतोड नाही, तर‎त्या हरितगृह वायू आहेत. ते आपण सतत आपल्या‎वातावरणात सोडत आहोत. हे वायू एका चादरीसारखे‎पृथ्वीला झाकून टाकतात आणि सूर्याची उष्णता बाहेर‎जाऊ देत नाहीत.‎ आज वातावरणातील कार्बन डायऑक् साइडचे प्रमाण‎सामान्य पातळीपेक्षा सुमारे ५३ टक्के अधिक आहे. याचा‎अर्थ पृथ्वीची उष्णता अडकवून ठेवण्याची क्षमता ५३‎टक्क्यांनी वाढली आहे. या अतिरिक्त उष्णतेमुळे पृथ्वीचे‎तापमान सतत वाढत आहे. सध्या या अतिरिक्त उष्णतेचे‎सर्वात मोठे कारण म्हणजे आपला ऊर्जेचा वापर, त्यात‎पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज आणि रोजच्या वापरातील‎वस्तूंचा समावेश आहे. सध्याच्या काळात एकूण कार्बन‎उत्सर्जनापैकी सुमारे ७५ टक्के हिस्सा याचाच आहे.‎जमिनीच्या वापरातील बदल, शेती आणि जंगलतोड‎यामुळेही कार्बन उत्सर्जन होते, पण हे सर्व मिळून सुमारे‎२५ टक्के असते. या २५ टक्क्यांमध्येही झाडांच्या तोडीमुळे‎होणारे कार्बन उत्सर्जन फक्त सुमारे १० टक्केच आहे.‎ याचा सरळ अर्थ असा आहे की समस्येचा मोठा भाग‎आपली जीवनशैली व उपभोगाशी जोडलेला आहे. हीच‎ती जागा आहे. तेथे आपण वैयक्तिक, सामाजिक आणि‎राजकीय पातळीवर चूक करतो. झाडे लावणे निश्चितच‎आवश्यक आहे. पण ताे हवामान बदलावरील मूळ उपाय‎नाही. आपला उपभोग असाच वाढत राहिला, तर‎कोट्यवधी अब्जावधी झाडेही ही समस्या संतुलित करू‎शकणार नाहीत.‎ आपल्याला एक अस्वस्थ करणारे, पण आवश्यक सत्य‎स्वीकारावे लागेल— आज मानवजात पृथ्वीच्या‎क्षमतेपेक्षा खूप जास्त संसाधनांचा वापर करत आहे.‎आपण असे जगत आहोत. जणू आपल्या जवळ‎एकापेक्षा अधिक पृथ्वी आहेतय पण प्रत्यक्षात फक्त‎एकच आहे. या परिस्थितीत सर्वात पहिले आणि सर्वात‎प्रभावी पाऊल काय असू शकते? आपल्याला आपल्या‎ऊर्जा आणि वस्तूंच्या वापरात जवळपास अर्धी कपात‎करावी लागेल. आपल्या गरजा, इच्छांमध्ये संतुलन‎निर्माण करत नाही, तोपर्यंत कोणतीही मोहीम‎कायमस्वरूपी फलद्रुप होऊ शकत नाही. दुर्दैवाने‎सरकारांचा प्रत्येक प्रयत्न आणि कंपन्यांची प्रत्येक‎जाहिरात तुम्हाला जास्तीत जास्त उपभोगासाठी प्रोत्साहित‎करते, आणि तुम्ही त्या दुष्टचक्रात अडकता. आपण‎अनेकदा म्हणतो— प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला‎असतो. हवामान बदलाच्या संदर्भात ही गोष्ट आणखी‎अचूक ठरते. झाडे लावणे, सोलर पॅनल लावणे किंवा‎इलेक्ट्रिक वाहन स्वीकारणे— हे सर्व उपचाराचे‎कौतुकास्पद प्रयत्न आहेत. पण प्रतिबंध म्हणजे‎अनावश्यक उपभोग कमी करणे. ही बाब पूर्णपणे आपल्या‎स्वतःच्या निर्णयांवर अवलंबून आहे. आपण काय खरेदी‎करतो, किती वापरतो, आणि काय सोडू शकतो— हेच‎महत्त्वाचे आहे. हवामान सुधारासाठी सर्वात मोठे पाऊल‎म्हणजे इन-ॲक्टव्हिटी, म्हणजेच काही न करणे. याचा‎अर्थ अनावश्यक गोष्टी न खरेदी करणे, न वापरणे. याचा‎परिणाम खूप मोठा आहे. आपण आजही थांबलो नाही,‎तर इतिहास आपल्यालाही ‘एक हाेता डायनासोर..’‎यासारखे लक्षात ठेवेल. अनेक वर्षांनंतर पृथ्वीवर एक‎नवी प्रजाती येईल आणि म्हणेल, एकेकाळी पृथ्वीवर‎माणसे राहत होती!‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *