बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत बीएनपी (BNP) चा ऐतिहासिक विजय झाला आहे. बांगलादेशमध्ये बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीला दणदणीत यश मिळालं. दरम्यान बांगलादेशमध्ये सत्तेत आल्यानंतर आता बीएनपीकडून भारतासंदर्भात मोठं विधान करण्यात आलं आहे, पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, यामुळे पुन्हा एकदा भारत आणि बांगलादेशमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये पाठवण्याचा मुद्दा आम्ही भारतासमोर उपस्थित करू असं बीएनपीने म्हटलं आहे. बीएनपीचे ज्येष्ठ नेते सलाहुद्दीन अहमद यांनी शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावर प्रतिक्रिया देतान हे वक्तव्य केलं आहे. आम्ही भारत सरकारला असं आव्हान करू की त्यांनी शेख हसीना यांना बांगलादेशच्या ताब्यात द्यावं, त्यानंतर त्या आपली न्यायालयीन लढाई लढतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना सलाहुद्दीन अहमद यांनी असं देखील म्हटलं आहे की, शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही भारतावर दबाव टाकू, आम्ही भारत सरकारला असं आव्हान करू की त्यांनी शेख हसीना यांना बांगलादेशच्या ताब्यात द्यावं. शेख हसीना या बांगलादेशमध्ये आल्यानंतर आपली न्यायालयीन लढाई लढतील. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील हा प्रश्न आहे, आम्ही त्यावर पुढील काळात काम करू असंही यावेळी सलाहुद्दीन यांनी म्हटलं आहे.
तणाव वाढणार?
दरम्यान बीएनपीचे नेता सलाहुद्दीन यांनी शेख हसीना यांच्याबद्दल केलेलं हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सलाहुद्दीन यांचा पक्ष आता तारिक रहमान यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करणार आहे. तारिक रहमान यांच्यापूर्वी बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांचं जे काळजीवाहू सरकार होतं, त्यांची देखील हीच भूमिका होती, त्यांनी देखील शेख हसीना यांचं प्रत्यार्पण करावं अशी मागणी केली होती. दरम्यान आता सत्तेत येताच बीएपीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे आता तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र आता हा कळीचा मुद्दा बणण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




