बंगालमध्ये निवडणुकांचे वारे वाहत आहेत व होर्मुझच्या खाडीत महाभारतासारखी परिस्थिती आहे. इकडे ममता बॅनर्जी ऐकत नाहीत, तिकडे भाजप पूर्ण जोर लावत आहे. दुसरीकडे होर्मुझमध्ये ना इराण हार मानतेय ना अमेरिका. इस्रायल व इराणच्या वादात अमेरिकेच्या हाती फारसे काही लागत नाहीये. बंगालमध्ये ममता व भाजप संघर्षात काँग्रेसची अवस्था झाली अगदी तशीच स्थिती आहे. बंगालमध्ये काँग्रेसचा दरारा होता, तिथे आज त्यांचे नाव घेणारेही कुणी नाही. त्यातच निवडणुकीच्या काळात काही नेते नेहमी असे काहीतरी करून बसतात. यामुळे पक्षाची नाचक्की होते. नुकतेच काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘आतंकवादी’ असा केला. नंतर त्यांनी स्पष्टीकरण देत वक्तव्यावरून माघारही घेतली. पण नंतर पश्चात्ताप करावा लागेल व स्पष्टीकरण द्यावे लागेल, अशी विधाने करायचीच कशाला? असो. केवळ काँग्रेसच कशाला, असे ‘बोलघेवडे’ इतर पक्षांतही आहेत. भाजपमध्ये तर यांची कमतरता नाही. राजकीय पक्ष अशा वक्तव्यांवर स्वतःहून लगाम घालणार नाहीत तोपर्यंत हे सर्व सुरूच राहील. विखारी विधानांच्या बाबतीत ट्रम्प महाराजही मागे नाहीत. ते आज काहीतरी बोलतील. दुसऱ्या दिवशी घूमजाव करतील. त्यानंतर पुन्हा तिसरेच काहीतरी बरळतात. इराणमधील संपूर्ण वंशच संपवून टाकू, अशी भाषा ते करतात. पण का? नक्की असे काय झालेय? तुम्हाला चर्चा तर करायची नाहीये, फक्त चर्चेचे ढोंग करायचे आहे! चर्चेसाठी जागा निवडली तर तीही पाकिस्तान. हा देश स्वतःच सर्वात मोठा ‘पलटूराम’ आहे. एका अर्थाने ‘राम मिलाई जोडी..’ असे म्हणावे लागेल! आता पुन्हा बंगालच्या निवडणुकीकडे वळूया. येथे निश्चितपणे भाजप अनपेक्षितपणे प्रबळ होत चालला आहे. भाजप जिंकेल की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही, पण पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. ममतांची अडचण अशी की, डाव्यांच्या दादागिरीला मुद्दा बनवून त्या सत्तेत आल्या, तेच सर्व प्रकार आता त्यांच्या तृणमूल काँग्रेसकडून केले जात आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी आणि गुंडगिरी सर्वश्रुत आहे. लोकांना घराबाहेर काढून, मुलाच्या डोक्यावर हात ठेवून ‘मत तृणमूललाच देऊ’ अशी शपथ घ्यायला लावणे. मुस्लिमबहुल भागात तर तृणमूलची चलती आहे. तिथे मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. तसे पाहिले तर बंगालचा मूळ स्वभाव सत्ताविरोधी आहे. येथील बहुतांश लोक नेहमी विरोधात बसलेले दिसतात. पण निवडणुका आणि सरकारच्या बाबतीत हा स्वभाव कुठे जातो हेच कळत नाही. अनेक वर्षे येथे डाव्यांनी एकहाती सत्ता गाजवली. आता 2011 पासून ममता अखंड राज्य करत आहेत. तिथे विरोधक दिसला नाही. पूर्वी काँग्रेस होती आणि दुसरे कुणीच नव्हते. काँग्रेसचा झेंडाही कधीकाळी ममतांनीच हाती घेतला होता. पुढे त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबाही दिला. पण आता त्या भाजपच्या कट्टर विरोधक बनल्या आहेत. असो. राजकारणात विशेषतः प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय पक्षांचा विरोध करावाच लागतो. ते करतही आहेत. प्रश्न केवळ नि:पक्ष निवडणुकीचा आहे. बंगालमध्ये निवडणुका पारदर्शक आणि नि:पक्ष झाल्या तर निकाल काही वेगळाच असू शकतो. निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारने ठरवले तर हे शक्य आहे. पण हे का होत नाहीये हे कोडेच आहे. ममतांना एका राज्यापुरते मर्यादित ठेवण्यासाठीही अशा प्रकारचे राजकारण असू शकते. कारण त्या राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला दाद देत नाहीत. विरोधकांच्या एकजुटीची चर्चा झाली की ममता सर्व समीकरणे बिघडवून टाकतात. त्या केवळ बंगालमध्ये राज्य करतात. तरीही त्यांच्याकडे लोकसभा जागांची कमतरता नसते व राज्यात तर त्यांची सत्ता आहेच. केंद्रीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना तर त्या कोलकात्यातून अशा प्रकारे हाकलून लावतात, जणू एखादा प्राणी त्यांच्या स्वयंपाकघरात शिरला असावा! असो, यंदा बंगालमध्ये लढत मात्र चुरशीची आहे. 29 एप्रिल रोजी मतदानाचा शेवटचा टप्पा आहे. 4 मे रोजी लागणारे निकालच सांगतील की जनतेच्या वाटेत ‘काटे’ कोण आणि ‘फूल’ कोण!
या वेळेस लढत चुरशीची आहे...ममता बॅनर्जींना एका राज्यापुरते मर्यादित ठेवण्यासाठीही अशा प्रकारचे राजकारण केले जाऊ शकते. राष्ट्रीय राजकारणात त्या काँग्रेसला फारसा भावच देत नाहीत. एकसंध विरोधी आघाडीची चर्चा होताच त्या त्याची वीण विस्कटून टाकतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




