आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंहने साकारलेल्या हमजा अली मजारी या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. या मल्टीस्टारर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत नवे विक्रम रचले. ‘धुरंधर’ने तब्बल 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. इतक्या मोठ्या यशानंतरही रणवीरचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. ‘धुरंधर’ने रणवीरच्या करिअरला एक वेगळं वळण दिलं असलं तरी त्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामागचं कारण म्हणजे ‘डॉन 3’ हा चित्रपट. या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. रणवीर सिंह आणि ‘डॉन 3’चे निर्माते एक्सेल एंटरटेन्मेंट यांच्यात मोठा वाद झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंहने अचानक हा चित्रपट सोडला होता आणि त्यामुळे प्रॉडक्शन कंपनी, स्टुडिओचं मोठं नुकसान झालं होतं. ‘व्हरायटी इंडिया’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, एक्सेल एंटरटेन्मेंटने आता रणवीरकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या कंपनीने रणवीरकडे थेट 40 कोटी रुपयांची मागणी केली आहे. रणवीरने चित्रपट अचानक सोडल्यामुळे पैसा, शेड्युलिंग, प्लॅनिंग, कमिटमेंट्सची दिरंगाई असं बरंच नुकसान झेलावं लागल्याचा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय प्रॉडक्शन हाऊसने काही डिपार्टमेंट्सनाही काढून टाकलं आहे. डिपार्टमेंटच्या प्रमुखांना बाहेर काम शोधण्यास सांगितलं गेलं आहे.
दुसरीकडे एक्सेल एंटरटेन्मेंटला मी कोणतीही रक्कम किंवा नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नसल्याचं रणवीर सिंहने स्पष्ट केलं आहे. रणवीरच्या मते त्याने आधीही कोणत्याही नुकसान भरपाईच्या मागणशिवाय प्रोजेक्ट्समधून माघार घेतली आहे. त्यामुळे या परिस्थितीला वेगळं वळण देऊ नये, असं त्याने म्हटलंय. रणवीरला या चित्रपटाची पटकथा आवडली नव्हती. यामुळेच त्याने हा चित्रपट सोडला होता.
रिपोर्ट्समध्ये असंही लिहिलंय की, रणवीरने सतत पटकथेत बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीसुद्धा त्याला फायनल ड्राफ्ट आवडला नव्हता. तर प्रॉडक्शन हाऊसने दावा केला की त्यांनी तोपर्यंत प्री-प्रॉडक्शनला सुरुवात केली होती. रणवीर आणि प्रॉडक्शन हाऊसदरम्यान शुक्रवारी जवळपास दोन तास चर्चा झाली. परंतु या चर्चेतून तोडगा निघालाच नाही.
रणवीर सिंह आता ‘धुरंधर’च्या दुसऱ्या भागातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागासाठी त्याने जवळपास 30 ते 40 कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




