भारतात खाजगी रुग्णालयात दाखल होताच रुग्ण आणित्याच्या कुटुंबासमोर अनेक प्रश्न उभे ठाकतात. उपचारपूर्ण होईपर्यंत एकूण बिल किती होईल, हे स्पष्ट नसते.संसदेत सादर झालेल्या आरोग्य आणि कुटुंबकल्याणविषयक संसदीय स्थायी समितीच्या 176व्याअहवालाने याच चिंतेवर बोट ठेवले आहे. सरकारीआकडेवारीनुसार खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचासरासरी खर्च 50,508 रुपये आहे. सरकारी रुग्णालयातहाच खर्च 6,631 रुपये येतो. बाळंतपणाचा खाजगीसंस्थेतील सरासरी खर्च 37,630 रुपये आहे, तर सरकारीरुग्णालयात तो केवळ 2,299 रुपये आहे. समितीने एकूण 368 शिफारसी केल्या आहेत. यात उपचारसुरू होण्यापूर्वी अंदाजित खर्च सांगणे, मानक पॅकेज दरठरवणे आणि रुग्णालयांच्या शुल्कात पारदर्शकता आणणेयांचा समावेश आहे. महानगरांमधील खाजगीरुग्णालयांच्या सामान्य खोल्यांचे भाडे परिसरातील तीनतारांकित हॉटेल्सच्या सरासरी भाड्यापेक्षा जास्त असूनये, अशीही एक सूचना आहे. वैद्यकीय पर्यटन, परदेशीरुग्ण आणि श्रीमंत वर्गाकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काहीफायदा गरीबांपर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षा मोठ्याकॉर्पोरेट रुग्णालयांकडून व्यक्त करण्यात आली आहे.परंतु भारताला आरोग्य सेवांच्या विस्तारासाठी खाजगीआणि परदेशी भांडवलाची गरज आहे. रुग्णालय उभारणेमहागडे असते. जमीन, आधुनिक उपकरणे, आयसीयू,प्रयोगशाळा, डिजिटल तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित कर्मचारीया सर्वांसाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज असते. सरकारीरुग्णालये सध्या एकट्याने देशाची सर्व गरज पूर्ण करूशकत नाहीत. म्हणूनच खाजगी रुग्णालये आणि परदेशीगुंतवणुकीला थेट दोषी मानणे योग्य ठरणार नाही.अडचण भांडवलाची नाही. अडचण ही आहे की,भांडवलातून मिळणाऱ्या नफ्याची अपेक्षा वैद्यकीयनिर्णयांवर परिणाम करू नये. आरोग्य सेवा ही काहीसामान्य बाजारपेठ नाही. आजारी व्यक्ती कार किंवामोबाईल घेणाऱ्या ग्राहकासारखी वेगवेगळ्या दुकानांतजाऊन दरांची तुलना करू शकत नाही. रुग्णावर कायउपचार करायचे, हे बऱ्याच अंशी रुग्णालयच ठरवते.एमआरआय गरजेचा आहे की नाही, रुग्णाला आणखीदोन दिवस दाखल ठेवणे आवश्यक आहे का,अँजिओप्लास्टीची गरज आहे की औषधांनी उपचारशक्य आहेत, या निर्णयांमध्ये डॉक्टर आणिरुग्णालयाकडे रुग्णापेक्षा खूप जास्त माहिती असते.आरोग्य क्षेत्रातील या दरीला अर्थशास्त्रज्ञ दीर्घकाळापासून‘ज्ञान-असमानता'' म्हणत आले आहेत. कॉर्पोरेटरुग्णालयांमधील महागडे तंत्रज्ञान, नामांकित तज्ज्ञ आणिउत्तम सुविधा यामुळे उपचारांचा दर्जा सुधारू शकतो.परंतु त्याचा खर्चही वसूल करावा लागतो. रुग्णालयांवरखाटा भरून ठेवणे, प्रति रुग्ण उत्पन्न वाढवणे किंवा जास्ततपासण्या करून घेणे असा सतत दबाव असतो. बहुतांशडॉक्टरांना रुग्णाचे भलेच हवे असते. परंतु संस्थात्मकदबाव त्यांच्या वैद्यकीय निर्णयांवर परिणाम करतो. यातूनचओव्हर-मेडिकलायझेशनची समस्या निर्माण होते. काहीबाबतीत आजार घरी औषधे आणि देखरेखीखाली ठीकहोऊ शकत असताना रुग्णाला दाखल केले जाते. केवळवाट पाहणे आणि लक्ष ठेवणे योग्य होते, तिथेशस्त्रक्रियेचा किंवा प्रक्रियेचा सल्ला दिला जाऊ शकतो.सिझेरियन शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, आयसीयू मधीलदाखल, चाण्यांचे पॅकेज आणि औषधांच्या लांबलचकयाद्या यांच्याकडे केवळ डॉक्टरांचा वैयक्तिक निर्णयम्हणून पाहता येणार नाही. संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्यारचनेच्या संदर्भात याचा विचार झाला पाहिजे. आपल्यालाआरोग्य क्षेत्रात गुंतवणुकीची गरज आहे. नफा मिळवणे हाकाही गुन्हा नाही. पण ही सीमा आखली गेली पाहिजे.गरज आहे तितकाच उपचार मिळेल, या विश्वासानेआजारी व्यक्तीने रुग्णालयात प्रवेश करावा. ( हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
- नागपूर: "मी दिलेला निर्णय टिकून राहणार; सिब्बलांचे मत म्हणजे न्यायालयाचे मत नाही" एका विधानामुळे कायदेशीर व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- रत्नागिरी: चिपळूणमधील दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू! मासेमारीसाठी गेलेले दोघे मित्र बुडाले, गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडले मृतदेह
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल


























Subscribe to my channel




