पौराणिक कथांनुसार, जेव्हा देव आणि असुर यांनी अमृताच्या प्राप्तीसाठी समुद्रमंथन केले होते, तेव्हा अमृतापूर्वी ‘हलाहल’ नावाचे भयंकर विष बाहेर आले होते.त्या विषामुळे संपूर्ण सृष्टीच्या विनाशाचे संकट उभे राहिले होते. तेव्हा भगवान शिव यांनी करुणे पोटी ते विष आपल्या कंठात धारण केले आणि ते नीलकंठ म्हणवले गेले. आजच्या युगात आपण पुन्हा एकदा मंथन करत आहोत. हे मंथन आहे निसर्गाच्या संसाधनांचे. आपण आपल्यासुख-सुविधा आणि अंतहीन इच्छांच्या पूर्तीसाठी पृथ्वीच्या गर्भापासून आकाशापर्यंत, प्रत्येक नैसर्गिक संसाधन घुसळून काढत आहोत. यातून आपल्याला आर्थिक समृद्धी आणि तंत्रज्ञानाचे अमृत तर मिळत आहे, पण त्यासोबतच प्रदूषणाचे विषही बाहेर पडत आहे. विकासाच्या आपल्याया आंधळ्या शर्यतीने केवळ हवा विषारी आणि पाणीप्रदूषित केले नाही, तर मातीलाही मोठ्या प्रमाणावर नापीक बनवले आहे. पृथ्वीचे वाढते तापमान आणि अनियंत्रित हवामान बदल आपल्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका बनले आहेत. विडंबना अशी आहे की, आपण नैसर्गिक संसाधनांचे इतक्या निर्दयीपणे आणि वेगाने मंथन करत आहोत की निसर्गाला स्वतःला सावरण्याची आणि पुनरुज्जीवित करण्याची संधीच मिळत नाही. आज मानवता पृथ्वीच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक उपभोग घेत आहे. हा अतिरिक्त उपभोग म्हणजेच तेविष आहे, जे पर्यावरणात कार्बन उत्सर्जन आणि कचऱ्याच्या रूपात विरघळत आहे. आता सर्वात मोठा प्रश्नहा आहे की, आजच्या काळातील हे विष पिणार कोण? आपण एखाद्या चमत्काराची प्रतीक्षा करायची का, की कोणीतरी येईल आणि आपण पसरवलेले हे प्रदूषण शोषून घेईल? विज्ञान आणि तंत्रज्ञानाला स्वतःच्या मर्यादा आहेत.जोपर्यंत आपण पृथ्वीच्या मर्यादेत राहून जगणार नाही आणि विष निर्माण करणे बंद करणार नाही, तोपर्यंत कोणतेही तंत्रज्ञान किंवा धोरण यशस्वी होऊ शकत नाही. आज प्रत्येक व्यक्तीला आपल्या वाट्याचे थोडे थोडे हलाहल प्यावे लागेल. हे विष कोणत्याही पेल्यात नसून आपल्या जीवनशैलीत आहे. आपल्याला अधिक मिळवण्याची आपली लालसा आपल्या कंठातच रोखून धरावी लागेल, जेणेकरून ती पृथ्वीच्या खोलवर पोहोचणार नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या जबाबदारीचे हे विष पेईल,तेव्हाच येणाऱ्या पिढ्यांसाठी अमृत सुरक्षित राहील. आपल्याला हे मान्य करावे लागेल की, पृथ्वी मर्यादित आहे आणि ती नेहमीच मर्यादित राहील, मग आपले विज्ञान आणि आपली अर्थव्यवस्था कितीही प्रगती करो. वास्तवात,संसाधनांची कमतरता समजून घेणे मानवासाठी अत्यंतसहज आणि स्वाभाविक आहे. जेव्हा आपले उत्पन्न मर्यादित असते, तेव्हा आपण आपले खर्च आपोआपच मर्यादित करतो. जर आपल्याकडे ५ आसनी कार असेल, तर आपण त्यात दहा लोकांना बसण्यासाठी आमंत्रित करत नाही. आपण दररोज क्षमतेच्या आधारावर निर्णय घेतो, मग पृथ्वीच्या संदर्भात आपण हे मूलभूत सत्य का विसरतो? पृथ्वीचा आकार निश्चित आहे आणि तो काळानुसार किंवा तंत्रज्ञानानुसार वाढत नाही. तिची संसाधनेही मर्यादित आहेत. आपला उपभोग आणि मागणी सातत्याने वाढत चालली आहे आपण एका मर्यादित पृथ्वीवर राहत आहोत ही जाणीव होणे, हा समाधानाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. जेव्हा आपण आपल्या मर्यादा ओळखू, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने निवारणाकडे वाटचाल करू शकू. येथे हे समजून घेणे देखील अनिवार्य आहे की, ही समस्या आपल्या सर्वांच्या उपभोग घेण्यामुळेच निर्माण झाली आहे, म्हणूनच समाधानाचा भागही आपल्या सर्वांनाच व्हावे लागेल. आपण आपल्या सवयी सुधारल्या आणि एखादी गोष्ट ‘परवडण्याची’ क्षमता असूनही निसर्गासाठी ती ‘टाळणे’ शिकलो, तर आपण या विषाचा प्रसार रोखू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

