सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विट्याजवळील रेणावी घाटामध्ये झालेल्या दोन एसटी बसच्या भीषण समोरासमोरच्या धडकेतील मृतांचा आकडा आता तीनवर पोहोचला आहे. उपचारादरम्यान १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर अपघाताची दखल घेत राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे, तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाकडून केला जाणार आहे.
घटनाक्रमाची सविस्तर माहिती अशी की, विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर विट्या जवळच्या रेणावी घातात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. विटा आगाराची विटा ते भिवघाट जाणारी बस आणि मेढा आगाराची विजापूर ते मेढा जाणारी बस यांच्यात रेणावी घाटाच्या चढणीवर तीव्र स्वरूपाची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसेसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेच्या सुरुवातीच्या धक्क्यातच खानापूर येथील नंदाबाई हरिदास त्रंबके (वय ६०) आणि बांबवडे (ता. खानापूर/जि. सातारा) येथील धोंडिराम लक्ष्मण पाटील (वय ७८) हे दोघे प्रवासी जागीच ठार झाले होते.
या अपघातात बसमधील ३८ पेक्षा जास्त प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले होते. अपघातानंतर घाटातील अंधार, मोबाइल नेटवर्कची अनुपलब्धता आणि तीव्र वळणे यामुळे सुरुवातीला मदतकार्यात काही प्रमाणात अडथळे आले होते. मात्र, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने धाव घेऊन जखमी प्रवाशांना बस बाहेर काढले आणि उपचारासाठी विट्यातील खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात गंभीर जखमी झालेली १७ वर्षीय तरुणी साक्षी चंद्रकांत पवार (रा. ऐनवाडी, ता. खानापूर) हिच्यावर विट्यातील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. साक्षी ही बळवंत महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. तिच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक बनली होती. शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली, ज्यामुळे या अपघातातील बळींची संख्या वाढून तीन झाली आहे. तिच्या अकाली जाण्याने ऐनवाडी गावावर आणि तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
या भीषण अपघाताची गंभीर दखल घेत स्थानिक आमदार सुहास बाबर यांनी रुग्णालयाला भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय जखमी प्रवाशांना योग्य उपचार मिळावेत यासाठी सर्व उपचाराचा खर्च राज्य शासनाकडून केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. घाटातील वाहतुकीचे नियम आणि एसटी बसच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याबाबत नागरिक व प्रवाशांमधून संताप व्यक्त होत असून, अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
शहर
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
- पुणे: अंधारबन ट्रेक पुन्हा खुला; निसर्गप्रेमींची प्रतीक्षा संपली, वनविभागाच्या नवीन नियमांसह ट्रेक सुरू
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
- पुणे: अंधारबन ट्रेक पुन्हा खुला; निसर्गप्रेमींची प्रतीक्षा संपली, वनविभागाच्या नवीन नियमांसह ट्रेक सुरू
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर
- ओडिशा: स्वातंत्र्यदिनाच्या तयारीदरम्यान बालासोरमध्ये मोठी दुर्घटना; शॉक लागून शिक्षकाचा जागीच मृत्यू, तीन विद्यार्थी गंभीर जखमी

























Subscribe to my channel




