दिवसभरच्या धावपळीनंतर शेवटी संध्याकाळी, रात्री लक्षात येतं की आज फक्त ओढाताणच आपल्या पदरी पडली. अंथरुणावर पडल्यावर ही झोप लागत नाही. अनेक लोकांना तर झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. काहीजण व्यसनाच्या आहारी जातात. प्रत्येक जण दिवसभर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवत नाही की सगळी धावपळ, ओढाताण कशासाठी चालू आहे? दिवसभर आपण व्यवहाराकडे लक्ष देत असतो. एकावेळी अनेक कामं,अनेक व्यवहार असतात. काही गोष्टी काही व्यवहार आपल्या हातातले नसतात,आपल्या आटोक्यातले नसतात. ते पार पाडताना ताणतणाव होतो. हे सर्व अखेर कशासाठी चालू आहे? कोणत्या प्राप्तीसाठी चालू आहे? याचा विचार मात्र केलेला नसतो. बहुतांशी नेमकी हीच चूक घडते की भौतिकतेच्या आहारी गेलेला मनुष्य साधनांना साध्य समजत आहे. प्रगती सोबत स्थिरता तणाव मुक्ती शांतता आंतरिक शांती हे साध्य आहे. यासाठी जी मेहनत करायची ती साधना. परंतु साधनापर्यंतच अडकत गेल्यामुळे साध्या पर्यंत पोहोचता येत नाही आणि परिणामी तो करणारा म्हणजे साधक हा अस्थिर, तणावग्रस्त, चिंताग्रस्त असाच असतो आणि दिसतो. आज जगात वावरत असलेल्या किती लोकांना याची जाणीव आहे की जीवनाचा प्रमुख उद्देश शांती आणि स्थिरता आहे. ही शांती आणि स्थिरता मिळवण्यासाठी दिवसभराचे सगळे व्यवहार,धावपळ आणि उठाठेव करायची असते. सकाळी उठल्याबरोबर आपण साधारणपणे न बोलता दिवसभराची कामे मनात ठरवतो. ती कशाप्रकारे करायची याची आखणी करतो. आणि ते सर्व करत असताना काही पूर्ण होतात तर काही ना अडचणी येतात. असाच दिवस निघून जातो आणि शेवटी आपण थकलो आहोत, तणावग्रस्त आहोत,अत्यंत अस्थिर अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीने झोपतो. आपल्या नियोजनामध्ये सगळी कामं असतात परंतु स्थिरता आणि शांतीचे नियमन नसते. कुठे थांबायचे, केव्हा थांबायचे हे निश्चित नसते. सगळी कार्य पार पाडत असताना मनाला शांतता केव्हा लाभली आणि वास्तविक जगण्याचा आनंद काही मिळाला का हे आपण तपासलेले नसते. जन्माला येणे आणि मागे नाव लौकिक न ठेवता केवळ कष्टात आयुष्य कंठून एके दिवशी मरणे याला जीवन जगणे असे म्हणत नाहीत. तसेच दिवस उजाडला, धावपळ, पळापळी कष्ट सुरू झाली आणि त्यामध्येच दिवसाचा शेवट झाला हा ही दिवसाचा निरर्थक वाईट अंत आहे. म्हणून रोजच्या दिवशी दररोजच्या कामात जशी काम करायची पद्धत ठरवलेली असते त्यातच हे विसरायला नको हे सर्व धावपळ सर्व मेहनत ही स्थिरता आणि शांती लाभावी यासाठी आहे. म्हणून कुठेतरी थांबणे मनाला समजूत घालून घेणे आणि खरोखर खऱ्या अर्थाने जगणे महत्त्वाचे ठरते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
- पुणे: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव सादर
- मुंबई: प्रवाशांच्या जिवाशी खेळ वांद्रे पश्चिम स्टेशनबाहेर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली कळेना, अपघाताचा धोका वाढला
महाराष्ट्र
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- सिंधुदुर्ग: मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह मळगाव घाटीतील धबधब्यात आढळला
- नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर माता साहेब गुरुद्वारा परिसरात प्राणघातक हल्ला; खासगी रुग्णालयात दाखल
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!
- नवी दिल्ली: "शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी; ठाकरेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, संजय राऊतांना न्यायाची खात्री."




























Subscribe to my channel




