मुंबई: खारफुटी आणि खाडीवरून जाणार 'ठाणे रिंग मेट्रो', केंद्राकडून प्रकल्पाला मंजुरी; ५,३८० झाडांना फटका

मुंबई: ठाण्यातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या 'ठाणे रिंग मेट्रो' प्रकल्पाला अखेर केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून या प्रकल्प प्रकल्पाला किनारपट्टी नियमन क्षेत्र (CRZ) मंजुरी प्राप्त झाली आहे. यामुळे प्रकल्पापुढील एक मोठे तांत्रिक आणि कायदेशीर रहदारीचे बंधन दूर झाले आहे.

प्रकल्पाची थोडक्यात माहिती:

ठाणे जिल्ह्यात १२,२०० कोटी रुपये खर्च करून अंतर्गत वर्तुळाकार (रिंग) मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहे.

 

या प्रकल्पांतर्गत मेट्रो मार्ग, स्थानके आणि कारशेड उभारताना खाडी आणि किनारी परिसर तसेच सुमारे ५,३८० खारफुटी (Mangroves) बाधित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पर्यावरणपूरक उपाययोजना म्हणून बांधकामामुळे बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर (सुमारे ३७,१८४ झाडांची) पुनर्लागवड करण्यात येणार असल्याचे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाण्यातील खाडी आणि किनारी क्षेत्रातून जाणारी ही मेट्रो मार्गिका शहरांतर्गत दळणवळण अधिक सुटसुटीत करेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, या परिसरातील पर्यावरणावर व खारफुटी क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांमुळे काही पर्यावरणप्रेमींकडून चिंताही व्यक्त केली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *