मुंबई: ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर मागील काही दिवसांपासून 'नॉट रिचेबल' असल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यासहित ६ खासदारांनी बंडखोरी केल्याच्या वृत्ताने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावरही ओमराजे निंबाळकर यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत खासदार ओमराजे निंबाळकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच, आता खुद्द ओमराजे निंबाळकर यांनी यावर अत्यंत महत्त्वाचं भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "मी सध्या मोठ्या धर्म संकटात आहे. इमोशनली (भावनिकदृष्ट्या) विचार केला तर हे पाऊल चुकीचे वाटते, पण पॉलिटिकल (राजकीय) दृष्टिकोनातून विचार केला तर हेच बरोबर आहे."
राजकीय अस्तित्व धोक्यात असल्याचा उद्वेग
ठाकरे गटात राहिल्यास राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अशी भीती व्यक्त करताना निंबाळकर म्हणाले, "खासदार असूनही जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतःची माणसं निवडून आणता येत नसतील, तर भविष्यात आपले राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते. मतदारसंघामध्ये रस्ते, पूल, डीपी यांसारखी महत्त्वाची कामे करण्यासाठी वारंवार प्रस्ताव देऊनही ती कामे होत नाहीत. सत्ता आणि निधी नसल्यामुळे सर्वसामान्यांची कामे करता येत नाहीत."
शिंदे सेनेत प्रवेश कधी?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, "शिंदे सेनेत प्रवेश करण्यासाठी माझ्यावर कार्यकर्त्यांचा आणि समर्थकांचा प्रचंड दबाव आहे. मात्र, माझे वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा अंतिम निकाल २० जून रोजी लागणार आहे. या निकालानंतर मी मतदारसंघातील माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी आणि लोकांशी सविस्तर चर्चा करूनच आपला अंतिम निर्णय जाहीर करेन."
पैशांचे आरोप पूर्णपणे खोटे
बंडखोरीसाठी किंवा पक्षांतरासाठी ५० कोटी किंवा १५ कोटी घेतल्याचा होत असलेल्या सर्व चर्चांचा त्यांनी तीव्र शब्दांत इन्कार केला. "पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या चर्चा आणि आरोप पूर्णपणे खोटे व अवाजवी आहेत. हा निर्णय मी पैशांसाठी घेतलेला नाही, तर केवळ माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी घेतला आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे यांच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष नाराजी
मुलाखतीदरम्यान ओमराजे यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये फिरतात आणि अफाट मेहनत घेतात. उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणांमुळे सतत फिरणे शक्य नसले, तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते आणि मैदानात उतरून काम करायला हवे होते."
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण आणि तूट राहण्याचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
- आजचे राशिभविष्य २१ ऑगस्ट २०२६: शुक्र देणार पैसा, लक्झरी आणि सुख-समृद्धी; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!
- पुणे: भावाला वाचवताना दोघांचा करुण अंत, पुण्याच्या दौंडमध्ये विजेचा शॉक लागून दोन चुलत भावांचा मृत्यू आई थोडक्यात बचावली!
महाराष्ट्र
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
गुन्हा
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!




























Subscribe to my channel



