इराण युद्ध अनेक कारणांसाठी लक्षात ठेवले जाऊशकते. परंतु त्याचा एक परिणाम असा आहे, ज्याकडेमुळीच दुर्लक्ष करता येणार नाही. आधुनिक इतिहासाततेलाच्या पुरवठ्यात प्रथमच एवढा मोठा अडथळानिर्माण झाला आहे. यामुळे तेलाची जागतिक मागणीकमी करण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. चारमहिन्यांपूर्वी होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद झाल्यामुळेजागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले होते. तेलाच्या किमतीझपाट्याने वाढल्या आणि व्यापार विस्कळीत झाला.सरकारे ग्राहकांना महागाईपासून वाचवण्यासाठी सक्रियझाली आणि व्यवसायांनाही स्वतःमध्ये बदल करावेलागले. पण यादरम्यान आणखी एक नवा प्रवाह समोरआला आहे. देशांनी कमी तेलात गुजराण करण्यासाठी स्वतःला बदलवण्यास सुरुवात केली आहे. ऊर्जा क्षेत्राला आपल्या एका अत्यंत महत्त्वाच्या गृहीतकावर पुन्हा विचार करणे भाग पडले आहे. ते गृहीतक म्हणजे, तेलाची जागतिक मागणी सातत्याने वाढतच राहील. युद्धापूर्वी, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) एक अंदाज वर्तवला होता. त्यानुसार, 2024 ते 2030 दरम्यान तेलाची मागणी दररोज 25 लाख बॅरलने वाढणार होती. तसेच या दशकाच्या अखेरीस ती दररोज सुमारे 10 कोटी55 लाख बॅरलच्या पातळीवर पोहोचून स्थिर होणार होती.तेव्हा चर्चा यावर नव्हती की मागणी वाढत राहील कीनाही, तर ती वाढ किती वेगाने मंदावेल यावर होती. आता‘आयईए’चा अंदाज आहे की, 2026 मध्ये तेलाचीजागतिक मागणी युद्धापूर्वीच्या अंदाजापेक्षा दररोज सुमारे13 लाख बॅरलने कमी असेल. या घसरणीचे काही कारणकमकुवत आर्थिक परिस्थिती आणि वाढलेल्या किमती हेआहे, तर उर्वरित कारण म्हणजे लोकांनी परिस्थितीशीजुळवून घेणे हे होय. मर्यादित पुरवठा आणिअनिश्चिततेचा सामना करत सरकार आणि उद्योगांनीतेलावरील आपले अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्नअधिक वेगवान केले आहेत. बाजारानेही या परिस्थितीलातशीच प्रतिक्रिया दिली आहे. हल्ल्यांच्या बातम्यांमुळेतेलाच्या किमती वाढल्या आणि राजनैतिक चर्चेच्याबातम्यांमुळे त्या घसरल्या. जरी किमती युद्धादरम्यानच्यासर्वोच्च पातळीवरून खाली आल्या असल्या तरी त्याअजूनही युद्धापूर्वीच्या पातळीपेक्षा जास्तच आहेत.युद्धापूर्वी दररोज सुमारे 125 ते 140 जहाजे होर्मुझमधूनजात असत. हा जलमार्ग अत्यंत विश्वासार्ह मानला जातहोता. तिथे दीर्घकाळ कोणताही अडथळा येईल, अशीशक्यता खूपच कमी वाटत होती. परंतु होर्मुझ बंदझाल्यामुळे सरकार आणि कंपन्यांना ऊर्जा सुरक्षेशीसंबंधित त्यांच्या विचारांवर पुन्हा विचार करणे भाग पडलेआहे. आता जरी वाहतूक पुन्हा सुरू झाली आणिहोर्मुझमधील समुद्री सुरुंग हटवले गेले, तरी गेल्या चारमहिन्यांचा अनुभव बदलता येणार नाही. युद्धापूर्वी चीन दररोज सुमारे 1 कोटी 10 लाख बॅरलतेलाची आयात करत होता. त्यानंतर त्याने आपल्यासाठ्यांचा वापर केला, रिफायनरीच्या कामात बदल केलेआणि काही पेट्रोकेमिकल कच्च्या मालासाठी कोळशाचापर्याय स्वीकारला. यातून चीनने आयातीत मोठी कपातकेली आहे. अनेक विश्लेषकांच्या मते, चीनची आयातकमी करण्याची ही क्षमताच एक मुख्य कारण ठरली,ज्यामुळे तेलाच्या किमती अपेक्षेइतक्या वाढल्या नाहीत. हे लक्षात ठेवले पाहिजे की, गेल्या एका दशकाततेलाची जागतिक मागणी वाढण्यामागे चीन हेच सर्वातमोठे कारण राहिले आहे. 2015 ते 2024 दरम्यान चीनचीतेलाची मागणी दररोज सुमारे 60 लाख बॅरलने वाढली. हीवाढ जागतिक मागणीतील वाढीच्या सुमारे 60% होती.आता केवळ चीनच असे करत नाहीये. आशिया आणिजगाच्या इतर भागांतील सरकारांनीही वेगाने अशी पावलेउचलली आहेत. आठवड्यातून केवळ चार दिवस काम,घरून काम करण्याची धोरणे, एअर कंडिशनिंगवरनिर्बंध, उद्योगांसाठी इंधनाचे रेशनिंग, आपत्कालीनसबसिडी, करांमध्ये कपात आणि शेतीसाठी थेट मदत –हे सर्व आता सरकारी धोरणांचे महत्त्वाचे भाग बनलेआहेत. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) जगातील बहुतांश देशांनी कमी तेलासहजगण्यासाठी स्वतःला जुळवून घेण्याससुरुवात केली आहे. ऊर्जा क्षेत्रालाआपल्या एका गृहीतकावर पुन्हा विचारकरणे भाग पडले आहे. ते गृहीतक म्हणजेतेलाची मागणी सातत्याने वाढतच राहील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



