पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:गुरू मिळाला नाही तर ‎हनुमंतांना गुरू मानावे

जगण्याविषयी भ्रम असेल तर त्याचे निरसन होऊ शकते, पण भ्रम‎ईश्वराविषयी असल्यास संपूर्ण जीवन विस्कळीत होऊ शकते.‎काकभुशुंडीजींनी एक ओळ सांगितली — ‘निर्गुण रूप सुलभ अति,‎सगुन जान नहिं कोई; सुगम अगम नाना चरित, सुनि मुनि मन भ्रम‎होई.’निर्गुण स्वरूप सहज समजण्यासारखे आहे, पण गुणातीत दिव्य‎सगुण रूप कोणी पूर्णपणे जाणू शकत नाही. त्यामुळे त्या सगुण‎ईश्वराच्या विविध सुगम आणि अगम स्वरूपाचे वर्णन ऐकून‎ऋषी-मुनींच्याही मनात संभ्रम निर्माण होतो. ईश्वराचे स्वरूप दोन‎प्रकारचे असते — एक सुगम आणि दुसरे अगम. सुगम म्हणजे सोपे,‎सहज व अगम म्हणजे आकलनाच्या पलीकडचे, असीम. जीवनात‎कधी ईश्वराविषयी अशी अवस्था निर्माण झाल्यास सोपा उपाय म्हणजे‎एखाद्या गुरुच्या आश्रयाला जाणे. पण गुरू मिळाला नाही, तर‎हनुमंतांना गुरु माना. म्हणजे भ्रमांपासून स्वतःला दूर ठेवता येईल.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *