
Mumbai/Pune : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आज, मंगळवारी १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेला १० हजार ६६४ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील १५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बसणार आहेत. यंदा परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत २७ हजारांनी वाढ झाली आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये आठ लाख २० हजार २२९ मुले, सात लाख १२ हजार २४० मुली, तर १८ तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान विषयासाठी दोन लाख ३६ हजार ३२०, तर सामान्य ज्ञान विषयासाठी एक हजार ७०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी परीक्षेसाठी एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.विद्यार्थ्यांनी केवळ राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेले आणि छापील वेळापत्रकच ग्राह्य धरावे. यंदाही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांची अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या ९ जानेवारीच्या सरकारी निर्णयानुसार परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवणे, तसेच परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी जिल्हा दक्षता समितीवर राहणार आहे, अशी माहिती डॉ. बेडसे यांनी दिली.
कर्मचाऱ्यांची अदलाबदल
राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य आहे. मात्र, १७२ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही नसल्याने त्या केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही नसलेली सर्वाधिक, ५५ केंद्र अमरावती मंडळात आहेत. तर २४८ परीक्षा केंद्रे संवेदनशील आहेत.
गैरप्रकार रोखण्यासाठी गुगल मीट, झूमचा वापर
दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी जिल्हा दक्षता समितीच्या अध्यक्षांना आवश्यक नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात सीसीटीव्ही नसलेल्या काही केंद्रांवर गुगल मीट आणि झूम प्रणालीचा वापर केला जाणार आहे. भरारी पथकांना आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विभागीय मंडळांतर्गत विशेष व बैठी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. बैठे पथक असतानाही, उपद्रव झाल्यास संबंधित केंद्रावरील, तसेच पथकातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले.
विभागीय मंडळनिहाय विद्यार्थी संख्या
पुणे : २,६०,०१४
नागपूर : १,६०,५३०
छत्रपती संभाजीनगर : १,९१,४९३
मुंबई : ३,५२,७१८
कोल्हापूर : १,१६,६११
अमरावती : १,५६,९१५
नाशिक : १,७३,६५१
लातूर : ९६,५४२
कोकण : २४,०१३
शाखानिहाय विद्यार्थीसंख्या
कला ३,८०,६९२
वाणिज्य : ३,२०,१५२
विज्ञान : ७,९९,७७३
व्यावसायिक अभ्यासक्रम : २७,३७८
आयटीआय ४,४९२
परीक्षा पारदर्शक व गैरप्रकारमुक्त व्हावी, यासाठी राज्यभरात २७१ भरारी पथकांसह कॉपीमुक्त अभियानांतर्गत विविध उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. - नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य मंडळ
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


