पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:विवाह अन् दांपत्य यात मोठे अंतर‎‎‎,‎विवाह देह, तर दांपत्य आत्मा..‎

सध्या जवळपास प्रत्येक क्षेत्र युद्धग्रस्त आहे. ट्रेड वॉर, टेक वॉर, लँड‎वॉर, थॉट वॉर, जनरेशन वॉर आणि सर्वात धोकादायक म्हणजे फॅमिली‎वॉर. आपला विषय कुटुंब हा आहे. कुटुंबातही युद्धाची परिस्थिती निर्माण‎होत आहे. लोकांनी नात्यांनाच हत्यार बनवले आहे. डिजिटल‎मीडियानेही कुटुंबातील प्रेमावर आक्रमण केले आहे. हा इन्फ्लुएन्सर्सचा‎काळ आहे. डिजिटल बाजारातून पैसे कसे कमवायचे हे त्यांनी शिकवले.‎आता कुटुंब वाचवण्यासाठीही आपण इन्फ्लुएन्सर्सची मदत घेतली‎पाहिजे. देशात इन्फ्लुएन्सर मार्केटिंग जवळपास 2200 कोटी रुपयांवर‎पोहोचले आहे, तर मग आपण इन्फ्लुएन्सर्सकडे मदत का मागू नये की‎भारतातील कुटुंबे वाचली पाहिजेत, या प्रेरणेचेही त्यांनी मार्केटिंग करावे.‎ विवाहाला तर प्रॉडक्ट बनवूनच टाकले आहे. लग्नाच्या आयोजनात‎लोक वेडे झाले आहेत, पण दांपत्याबाबत ते गंभीर नाहीत. विवाह आणि‎दांपत्य यात अंतर आहे. विवाह देह आहे आणि दांपत्य आत्मा आहे. जर‎इन्फ्लुएन्सर्सनी दांपत्याचे जबरदस्त मार्केटिंग केले, तर कुटुंबांवर खूप‎मोठे उपकार होतील.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *