‘तुम्ही माझा रिझ्युमे सुधारण्यासाठी मदत करू शकाल का?’ मला माहीत नाही तुमच्या बाबतीत काय घडते, पण नोकरीच्या या कठीण काळात नकार किंवा भयंकर शांतता अनुभवणाऱ्या अनेक तरुणांकडून मी हे वाक्य वारंवार ऐकले आहे. आजच्या काळात तरुण सोशल मीडियावर एका ‘स्माइली’नेही खुश होतात. अशा वेळी छोटासा नकार पचवणेही त्यांच्यासाठी जड जात आहे. विशेषतः जेव्हा आपण सर्व प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहोत, तरीही नोकरी मिळत नाही, ही भावना त्यांना अस्वस्थ करत आहे. सध्या कमालीचे ऊन आहे. परीक्षा संपल्या आहेत किंवा संपत आल्या आहेत. अशा वेळी नोकरी मिळवणे हीच मोठी प्राथमिकता असते. मात्र, नोकरी मिळत नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या निराशेपोटी अनेक तरुण आता पालक, समुपदेशक आणि प्राध्यापकांकडे मदत मागत आहेत. अनेक कुटुंबांमध्ये हा संघर्ष उघडपणे दिसतोय. अशा परिस्थितीत आपण शहामृगासारखे वाळूत मान खुपसून गप्प बसू शकत नाही. कॉलेजमधून बाहेर पडलेल्या किंवा शेवटच्या वर्षाला असलेल्या तरुणांसाठी नोकरी शोधणे आता पूर्वीसारखे सोपे राहिलेले नाही. मार्ग स्पष्ट नाही, पात्रतेचे निकष उंचावले आहेत आणि पहिली पायरी चढणेच कठीण झाले आहे. या आव्हानांनंतरही ही पिढी स्वतःहून नोकरी शोधतेय, हे कौतुकास्पद आहे. ‘तुम्हीच माझ्यासाठी नोकरी शोधा, मी उद्यापासून रुजू होतो,’ अशी त्यांची वृत्ती नाही. कोविड-19 नंतर कामाच्या पद्धती बदलल्या आहेतच, पण सोबतच मालकांच्या अपेक्षाही अनेक पटींनी वाढल्या आहेत. जर तुमच्या घरातही नोकरी शोधणारा एखादा तरुण असेल, तर पालक म्हणून तुम्ही त्याला नक्कीच प्रोत्साहन देत असाल. मात्र, हा प्रश्न केवळ ‘मोटिव्हेशन’पुरता मर्यादित नाही. तज्ज्ञांच्या मते, रिझ्युमे सुधारणे किंवा ओळखीच्या नेटवर्कमध्ये नोकरी शोधण्यापलीकडेही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या खालीलप्रमाणे: 1. प्रक्रियेत सहभागी व्हा, पण स्वातंत्र्य हिरावू नका:
2. सध्या नोकऱ्या कमी आणि स्पर्धा जास्त आहे, हे त्यांना समजावून सांगा. यामुळे नोकरी न मिळाल्यास ते स्वतःला दोष देणार नाहीत आणि त्यांच्या अपेक्षा वास्तवावर आधारित राहतील.
3. आपल्या अनुभवावरून त्यांना सांगा की, अर्ज केल्यानंतर फॉलोअप कॉल कधी आणि कसा करायचा.
4. एखादा तरुण, विशेषतः आपले मूल जेव्हा खूप संवेदनशील असते, तेव्हा अर्जाला उत्तर न मिळणे त्यांच्यासाठी त्रासदायक असते. पालक म्हणून हे समजून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून ते या नकाराचा चुकीचा अर्थ लावणार नाहीत.
5. जर मुलाची मुलाखत दीर्घकाळ चालली असेल, तर त्याचे कौतुक करा. त्यांना त्या चर्चेतील सकारात्मक मुद्दे आठवायला सांगा. यामुळे त्यांना स्वतःच्या कमतरता आणि बलस्थाने ओळखता येतील. मुलाखतीत काय चांगले झाले आणि पुढच्या वेळी कुठे सुधारणा करता येईल, यावर त्यांच्याशी चर्चा करा. लक्षात ठेवा, पहिली नोकरी मिळाल्यानंतर पुढचा प्रवास अधिक आव्हानात्मक असेल. जेव्हा ते कामावरून परततील, तेव्हा रोज त्यांच्याशी संवाद साधा. त्यांचा दिवस कसा गेला आणि त्यांनी काय नवीन शिकले, हे जाणून घ्या. जसा एक शिक्षक विद्यार्थ्याला विषयाची गोडी लावतो, तसेच पालकांनीही मुलाला त्याच्या कामाबद्दल अभिमान वाटेल असे वातावरण निर्माण करावे.
फंडा असा की - मूल जेव्हा नोकरी शोधत असते किंवा प्रोबेशनच्या काळात असते, तेव्हा पालकांनी केवळ यशाचा विचार न करता अनुभवावर (एक्स्पोजर) भर द्यावा. यामुळे तरुणांना नोकरी मिळवण्यात तर मदत होईलच, पण ते एक उत्तम कर्मचारी म्हणूनही स्वतःला सिद्ध करू शकतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



