
Maharashtra bike taxi rules explained : लाखो मुंबईकरांचा प्रवास आता स्वस्त अन् मस्त होणार आहे. मुंबईमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. त्यासाठी भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. १.५ किमीसाठी किमान भाडं 15 रुपये आकारलं जाणार असून, त्यापुढे प्रत्येक किलोमीटरला 10.27 रुपये प्रमाणे दर लागू होईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ही माहिती दिली आहे. How to book e-bike taxi in Mumbai
महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने सोमवारी मुंबई आणि उपनगरात बाईक टॅक्सी सेवांसाठी ओला, उबर आणि रॅपिडो यांना तात्पुरते परवाने दिलेत. अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम २०२५ मध्ये नमूद केलेल्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केल्यानंतर या कंपन्यांनी एका महिन्याच्या आत कायमस्वरूपी परवान्यांसाठी अर्ज करावा. या अटीवर ही मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्येक राईडसाठी १.५ किमीसाठी किमान भाडे ₹ १५ इतके निश्चित केले आहे. म्हणजे. एका किमीसाठी १० रूपये इतके भाडे असेल.
मागील दोन महिन्यांत मुंबईमध्ये बाईक टॅक्सी चालविण्यासाठी वाहतूक विभागाला ४ अर्ज मिळाले होते. त्यापैकी ओला, उबर आणि रॅपिडो यांना मान्यता मिळाली आहे. तर चौथ्या कंपनीला फटका बसला आहे. स्मार्ट-राईडला बाईक टॅक्सी चालविण्यासाठी आवश्यक अटी आणि शर्ती पूर्ण करण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांना प्राधिकरणाने डावलले. नवीन महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम २०२५ राज्य सरकारने सरकारी ठराव (GR) द्वारे लागू केले.
ई-बाईकसाठी प्रति १.५ किमीसाठी १५ रूपये दर निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर उर्वरित प्रवासासाठी प्रवाशांकडून प्रति किमी १०.२७ रुपये आकारले जातील. राज्य परिवहन सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखालील एसटीएने १८ ऑगस्ट रोजी हा निर्णय घेतला होता.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्राधिकरण एक वर्षानंतर बाईक टॅक्सीच्या भाड्यांचा आढावा घेण्याचा विचार करत आहे. हे नवीन बाईक टॅक्सीचे भाडे हे काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या किमान भाड्यापेक्षा खूपच कमी आहे. मुंबईत प्रवाशांना काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी किमान ₹ 31 आणि ऑटोरिक्षांसाठी ₹ 26 भाडे द्यावे लागते.
बाईक टॅक्सीचा महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. एक लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये बाईक टॅक्सीसाठी राज्य सरकारने धोऱण जाहीर केले होते. नव्या धोरणांनुसार, एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरात बाईक टॅक्सी सुरू होणार आहे. कमी भाड्यामध्ये प्रवास करता येणार आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील लाखो लोकांना होणार आहे
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



