
Dharashiva : पवनचक्की वादातून बीड येथील सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली. हे प्रकरण ताजे असताना धाराशिवमधून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पवनचक्की गुंडांनी तुळजापुरात शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. शेतकऱ्याची २० गुंठे जमीन कंपनीने घेतली असताना ३५ गुंठा जमिनीवर पवनचक्की उभारणी केली जात होती. यावरून शेतकरी व कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला होता. यात शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी तुळजापुर पोलिसात कंपनीसह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील बारुळ गाव शिवारात पवनचक्की उभारली जात आहे. यासाठी आवश्यक तेवढी लागणारी जमीन शेतकऱ्यांकडून पवनचक्की उभारणाऱ्या कंपनीकडून घेण्यात येत आहे. दरम्यान बारुळ गावातील सचिन ठोंबरे या शेतकऱ्याच्या शेतात पवनचक्की उभारी जात असून यासाठी सदर कंपनीकडून शेतकऱ्याची २० गुंठे जमीन घेण्यात आली होती. मात्र ३५ गुंठ्यावरती पवनचक्की कंपनीकडून कब्जा करण्यात आला होता. यामुळे शेतकऱ्याकडून पवनचक्की उभारणीला विरोध करण्यात आला.
|
|
शेतकऱ्याला करण्यात आली मारहाण
दरम्यान जादा जागेवर कब्जा करण्यात येत असल्याने शेतकरी व तेथील कामगारांमध्ये वाद निर्माण झाला. यातून पवनचक्कीच्या गुत्तेदार आणि गुंडाकडून शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली होती. यात शेतकरी जखमी झाला होता. मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखलही घेतली जात नसल्याचे ठोंबरे म्हणाले. तर पवनचक्की ठेकेदारांनी फोन केल्यावर पोलीस तात्काळ हजर होतात. काही तक्रार असेल तर पोलिसात तक्रार करा म्हणतात. मात्र पोलीस स्टेशनला दिवस दिवस थांबून घेतात पण गुन्हा दाखल केला जात नव्हता.
महिनाभरानंतर गुन्हा दाखल
शेतकऱ्याला मारहाण होण्याच्या घटनेला साधारण महिनाभराचा कालावधी उलटला आहे. यानंतर अखेर महिनाभरानंतर तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मारहाण करणारे दादा पवार, अंकित मिश्रा, वैभव कदम, जे एस डब्ल्यू या पवनचक्की कंपनीसह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



