
Maharashtra CM : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन बरेच दिवस झाले तरी देखील राज्यात अद्याप सरकार स्थापन झाले नाही. महायुतीमध्ये मंत्रीपदाच्या वाटपावरून सध्या वाद सुरू आहेत. राज्याचे नवे मुंख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत पीएम मोदी जो निर्णय घेतील हे मान्य असेल असे सांगितले होते. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार असल्याची चर्चा होती.
अशामध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुंख्यमंत्री होतील हे आता स्पष्ट झाले आहे. दिल्लीमध्ये गुरूवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबतच स्पष्ट संकेत दिले.
केंद्राकडून जरी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मु्ख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले जात असले तरी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा त्यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतरच केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मग एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील का अशी देखील चर्चा सुरू आहे. पण एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदाबाबत ठाम असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
|
|
पक्ष नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पूर्ण पाठिंबा आहेत. मुंबईत तीन नेते जे ठरवतील त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपद हे भाजपकडेच असावे असे मत अमित शहा यांनी व्यक्त केले. त्याचसोबत पीएम मोदींचे देखील हेच मत आहे असे अमित शहा यांनी बैठकीत सांगितले होते. मुख्यमंत्री पदाचा मुद्दा सुटेल पण आता मंत्रीपद वाटपावरून देखील तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असून अनेक मतभेद आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्रित बसून मंत्रीपद वाटपाचा फॉर्म्युला ठरवावा, असे या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले.
महत्वाचे म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर ते ५ डिसेंबरला शपथ घेण्याची शक्यता आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतल्या आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे. खरं तर हा शपथविधी सोहळा दादरच्या शिवाजीपार्कवर होणार असल्याचे म्हटले जात होते. पण ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरामध्ये गर्दी असणार आहे. याच कारणामुळे शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान निश्चित केले असल्याचे सांगितले जात आहे. या शपथविधी सोहळ्यादरम्यान कोण-कोण आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार हे अद्याप निश्चित झाले नाही. तसंच, या समारंभाला पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री देखील येतील.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



