
Mumbai : लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रांवर संध्याकाळपर्यंत झालेली गर्दी टाळण्यासाठी यंदा मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असून प्रायोगिक तत्वावर गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र सुरू करण्यात आला आहे. संपूर्ण मुंबईत तब्बल साडेसहाशे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रावरील मतदारांची गैरसोयही टळणार आहेच, पण मुंबईतील मतदानाचा टक्काही वाढण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्राबाहेर लागलेल्या रांगांमुळे मतदारांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागले होते. एकेका मतदान केंद्रावर जास्त संख्येने मतदार असल्यामुळे मतदानाची वेळही वाढवावी लागली होती. अनेक मतदार मतदान न करताच घरी परतले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियोजनावर खूप टीका झाली होती. यावेळी खबरदारी घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी पूर्वी असणारी सरासरी दीड हजार मतदारांची संख्या आता सरासरी एक हजार ते १२०० पर्यंत असेल. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्याही वाढली आहे. यावेळी मुंबईतील मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ इतकी आहे. तसेच यावेळी मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही मतदान केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. यावेळी तब्बल साडेसहाशे गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहे.
|
Pune : मुख्यमंत्री कोण, याचा अंदाज बांधणे अशक्य; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत |
निवडणूक आयोगाला मतदान केंद्रासाठी जागा ताब्यात घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. मात्र तरीही ज्या गृहनिर्माण संस्थांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे त्याच ठिकाणी मतदान केंद्रे उभारले आहे. अन्यथा मुंबईत अनेक शाळा असून त्यात मतदान केंद्रे उभारली आहेत. मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सोसाव्या लागलेल्या उन्हाच्या झळा यावेळी टळतील. त्यामुळे मतदारांच्या सोयीसाठी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहे. याकरीता सूक्ष्म नियोजन केले असून त्याचा मतदान वाढीसाठी चांगला फायदा होईल, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
५०० पेक्षा जास्त सदस्य असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये केंद्र
मोठ्या गृहनिर्माण संस्था किंवा गृहनिर्माण संकुलांमध्ये मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. पाचशेपेक्षा जास्त सदस्य संख्या असलेल्या गृहनिर्माण संकुलांमध्ये ही केंद्रे आहेत. ज्या गृहनिर्माण संस्थांंनी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे अशा संस्थांमध्येच ही केंद्रे सुरू करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवडणूक समन्वयक फरोग मुकादम यांनी दिली. अशा सोसायट्यांमधील मोकळ्या जागेत किंवा वाहनतळाच्या ठिकाणी ही केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. अशा सोसायट्यांमध्ये शक्यतो ९० टक्के मतदार हे त्या सोसायटीतील असतील.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



