
Lucknow : पूर्वसूचनेशिवाय कोणतेही अधिकृत बांधकाम पाडण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे उत्तर प्रदेशातील विरोधी पक्षांनी स्वागत केले आहे. या आदेशामुळे ‘बुलडोझरची दहशत’, ‘जंगल राज’ संपुष्टात येईल अशी प्रतिक्रिया बहुजन समाज पक्ष, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने व्यक्त केली आहे. तर या निकालामुळे संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यात मदत होईल असा विश्वास उत्तर प्रदेश सरकारने व्यक्त केला आहे.
या निकालामुळे बुलडोझरची दहशत नक्की संपुष्टात येईल अशी आशा बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी व्यक्त केली. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले की, ‘‘या निकालामुळे उत्तर प्रदेश, तसेच इतर राज्यांमधील सरकारे सार्वजनिक हित आणि कल्याणाचे योग्यरित्या व सुरळीतपणे व्यवस्थापन करतील आणि यामुळे बुलडोझरची दहशत नक्कीच संपुष्टात येईल.’’
निकालामुळे उत्तर प्रदेशातील ‘जंगल राज’ संपेल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी म्हटले आहे. तर, बुलडोझर कारवाई संपूर्ण अन्याय्य, गैर, घटनाबाह्य आणि बेकायदा होती असे म्हणत सपने या निकालाची प्रशंसा केली. ‘‘भाजप सरकारनांनी कायदा व सुव्यवस्थेच्या नावावर अन्याय करणे थांबवावे, ’’ असे समाजवादी पक्षाने म्हटले आहे.
|
Pune : पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार |
उत्तर प्रदेशचे मंत्री ओमप्रकाश राजभर यांनीही या आदेशाचे स्वागत केले. राजभर म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल. बुलडोझर सार्वजनिक मालमत्तांवरील बेकायदा ताब्यावरच चालवला जातो असा दावा त्यांनी केला. हा उच्च न्यायालयाचा आदेश होता, असे त्यांनी सांगितले.
न्यायालयाची निरीक्षणे
● एखादा नागरिक केवळ आरोपी किंवा दोषी आहे म्हणून त्याचे घर पाडणे आणि तेसुद्धा कायद्याने विहित प्रक्रियेचे पालन केल्याविना, हे पूर्णपणे घटनाविरोधी आहे.
● अधिकाऱ्यांनी नैसर्गिक न्यायाच्या मूलभूत तत्त्वाचे आणि योग्य प्रक्रियेचे पालन न करता बुलडोझरने इमारत पाडण्याच्या दृश्याने बेकायदा ‘बळी तो कान पिळी’चे स्मरण होते.
● घटनात्मक भावार्थ आणि मूल्ये सत्तेच्या अशा कोणत्याही गैरवापराला परवानगी देत नाहीत, असे दु:साहस न्यायालय खपवून घेणार नाही.
● अशा प्रकरणांमध्ये कायदा हाती घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना अशा अरेरावीच्या वर्तनाबद्दल जबाबदार ठरवले पाहिजे.
● कार्यकारी मंडळ हे नागरिकांचे विश्वस्त म्हणून आपले अधिकार राबवतात. त्यामुळे त्यांच्या कृती या जनतेचा विश्वास कायम राखणाऱ्या असायला हव्यात.
● मालमत्ता पाडण्याचे आदेश दिल्यानंतरही त्याला योग्य मंचासमोर आव्हान देण्यासाठी संबंधितांना काही वेळ दिला पाहिजे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



