
Pune : मतदानाच्या दिवशी मतदार घराबाहेर पडावा, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाची पळापळ सुरू असते. मतदाराने मतदान केंद्रात येऊन मतदान केले, तरी मतदान कोणाला केले असेल, याचा अंदाज लागणे कठीण. त्यामध्येच काही बोगस मतदार येऊन मतदान करून जाण्याचे प्रकार आजही घडत असतात. पुण्यात नगरपालिका असताना मात्र चित्र वेगळे होते. मतदाराने मतदानासाठी येण्यापासून मतदान करेपर्यंत अनेक गमतीजमती घडायच्या. मतदाराने मतदान कोणाला केले, हे तर उघड-उघड समजायचे; पण बोगस मतदान होण्याला थारा नसायचा. कारण त्यावर तत्कालीन नगरपालिकेच्या प्रशासनाची भिस्त ही वसुली कारकुनावर होती. त्यामुळे बोगस मतदान हा प्रकारच होत नव्हता.
आज मतदानाच्या प्रक्रियेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असला, तरीही बोगस मतदान होण्याचे प्रकार घडतच असतात. मतदाराने मतदानाला यावे, यासाठी पूर्वी आणि आताही राजकीय पक्षांची धावपळ मतदानाच्या दिवशी सुरू असते. आता आचारसंहितेच्या कडक नियमांमुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदारांना मतदान केंद्रामध्ये आणण्यासाठी उघडपणे काही करता येत नाही. मात्र, गुप्तपणे हे प्रकार सुरूच असतात.
मतदारांना मतदान केंद्रावर आणल्यावर त्याने मतदान कोणाला केले, याचा अंदाज बांधणे अवघड असते. मात्र, हमखास मत देणाऱ्या मतदारांची उमेदवार आणि त्याच्या विश्वासू साथीदारांना माहिती असते. त्यावरून प्रत्येक मतदान केंद्रावर किती मतदान झाले आणि आपापल्या हक्काच्या परिसरातील किती मतदारांनी मतदान केले, यावरून उमेदवार निकालाचा कल जाणतात. मात्र, प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी प्रत्येक मतदानाचे आकडे समोर येईपर्यंत कोणत्याही उमेदवाराच्या मनात धास्ती असते. त्यात बोगस मतदान झाले असेल, तर सर्वच गणिते बिघडतात.
|
Pune : रेल्वे स्थानकावर आता बिनधास्त खा! पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह १० स्थानके ‘ईट राइट स्टेशन’ |
सध्या बोगस मतदान रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या यंत्रणा असतानाही बोगस मतदानाचे प्रकार घडतच असतात. नामसाधर्म्य पाहून एखाद्या मतदाराच्या नावावर दुसऱ्याने मतदान करणे, मतदारसंघातील रहिवासी नसताना मतदारयादीत नाव समाविष्ट करून मतदान करणे असे प्रकार आजही घडताना दिसतात. त्यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि गदारोळ होतो. निकाल जाहीर झाल्यावर सर्व काही थंडावते.
पुणे ही नगरपालिका असतानाही मतदानाच्या दिवशी अनेक गमतीजमती घडायच्या. त्या वेळी वॉर्डांची संख्या आणि मतदारांची संख्याही कमी असायची. प्रत्येक वॉर्डात एकच मतदान केंद्र तयार केले जायचे. त्यामध्ये प्रत्येक उमेदवाराच्या मतपेट्या ठेवल्या जात असत. काही उमेदवार अशिक्षित असायचे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रंगांचे वाटप करून मतपेट्यांना संबंधित रंगाचे कागद चिकटवून त्यावर उमेदवाराचे नाव लिहिण्यात येत असे. आचारसंहिता नसल्याने आणि उमेदवाराच्या खर्चावर मर्यादा नसल्याने त्या वेळी मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी टांगे वापरले जायचे. टांग्यावर पुढे आणि मागे उमेदवाराच्या नावाचा फलक लावण्यात येत असे. उमेदवाराचे कार्यकर्ते म्हणजे त्या भागातील वजनदार मंडळी असायची. मतदाराला मतपत्रिका दिल्यावर त्याची स्वाक्षरी आणि निरक्षर असल्यास अंगठा घेऊन कार्यकर्तेच मतपत्रिका उमेदवाराच्या मतपेटीमध्ये टाकत. त्यामुळे उमेदवाराला किती मतदान झाले आणि आणखी किती मतांची गरज आहे, याचा अंदाज उमेदवारांना येत असे. त्या दृष्टीने त्यांची मतदानाच्या दिवशी पळापळ सुरू असायची.
मात्र, बोगस मतदानाला वाव नसायचा. बोगस मतदानावर तत्कालीन नगरपालिकेने नामी युक्ती शोधून काढली होती. वसुली कारकुनावर सर्व भिस्त असायची. वसुली कारकून हे करवसुलीसाठी प्रत्येक घरी जायचे. त्यामुळे त्यांना प्रत्येक पेठेतील घरमालक ओळखीचे असत. वसुली कारकुनाकडून ओळख पटल्याशिवाय मतदाराला मतपत्रिका दिली जात नसे. त्यामुळे बोगस मतदान टाळले जायचे.
आता अत्याधुनिक युगात अनेक सुविधा झाल्या असताना अद्यापही पुण्यासारख्या शहरात मतदानाचे प्रमाण कमी असते. जेमतेम ५० टक्के मतदार मतदान करतात. उर्वरित मतदार उमेदवार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हाती लागत नाहीत. उपलब्ध असलेल्या मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याचे आव्हान उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपुढे असणार आहे. बोगस मतदानाची ओरड प्रत्येक निवडणुकीत सुरूच असते. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी हे सर्व चित्र पाहायला मिळणार आहे.
शहर
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
महाराष्ट्र
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र


























Subscribe to my channel



