
Pune : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखडा करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील बाह्यवळण रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) जिल्हा विकास आराखडा समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची परवानगी न घेताच परस्पर प्रशासकीय मान्यता दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब उघड झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी तातडीने निविदेला स्थगिती दिली.
पुरंदर तालुक्यातील श्री खंडोबा देवसंस्थान आणि जेजुरी शहर विकासासाठी राज्य शासनाने सुमारे ३४९.४५ कोटी रुपयांचा श्रीक्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. तीन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात १०९ कोटी ५७ लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये मंदिर, संपूर्ण तटबंदीचे जतन आणि दुरुस्तीसाठी ११ कोटी २३ लाख रुपये, दीपमाळांचे जतन आणि दुरुस्तीसाठी ११ कोटी २५ लाख रुपये, उत्तर-पूर्व व पश्चिम पायऱ्या, १३ कमानी, सहायक संरचना जतन आणि दुरुस्तीसाठी १२ कोटी २२ लाख रुपये, ऐतिहासिक होळकर आणि पेशवे तलाव आणि इतर जलकुंडांचे जतन आणि दुरुस्तीसाठी १२ कोटी ५६ लाख रुपये, मल्हार गौतमेश्वर मंदिर, लवथळेश्वर आणि बल्लाळेश्वर मंदिरांचे जतन-दुरुस्तीसाठी दोन कोटी दोन लाख रुपये, कडेपठार मंदिर दोन पायरी मार्गांचे जतन-दुरुस्तीसाठी दहा कोटी ७३ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मूलभूत पायाभूत सुविधेअंतर्गत १२ कोटी रुपये, भूदृशे विकसित करण्यासाठी १८ लाख रुपये आदी कामांचा समावेश आहे.
|
|
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीआयपी) दहा कोटी ६८ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर होऊन पहिल्या टप्प्यात बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे मंजुरी दिल्यानंतर शिखर समितीने देखील मान्यता देऊन नियोजन विभागाने आदेश प्रसृत केला. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात आराखड्याचे काम थंड असताना पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांनी परस्पर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला प्रशासकीय मान्यता दिली. मात्र, कार्यकारी समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांना याबाबत कोणतीही कल्पना नसल्याने संबंधित निविदा तातडीने थांबविण्याचे आदेश पीडब्ल्यूडीला पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा पुरातत्त्व विभागाच्या आदेशानुसार राबविणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पीडब्ल्यूडीने आराखड्यातील बाह्यवळण रस्त्याची काढलेली निविदा तातडीने रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी मागणी केली आहे.- संजय जगताप, आमदार, पुरंदर
संबंधित निविदा प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. कार्यकारी समितीची नव्याने बैठक घेऊन नव्याने निविदा प्रक्रिया राबिवण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



