
Pune University : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठाच्या कॅन्टिनमध्ये गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न खायला दिल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. विद्यापीठाच्या कॅन्टिनमध्ये दुपारच्या जेवणामध्ये देण्यात आलेली भाजी आणि चपाती आंबट लागत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. संतप्त विद्यार्थ्यांनी कॅन्टिनमधील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील कॅन्टिनमध्ये सोमवारी विद्यार्थी जेवण करीत होते. यावेळी चपाती आणि भाजीची चव आंबट लागत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी जेवण अर्धवट सोडून ताट तसेच ठेवून निघून गेले. काही विद्यार्थ्यांनी तत्काळ कॅन्टिनधील कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. विद्यार्थ्यांनी मेस कर्मचाऱ्यांना जाब विचारला तर त्यांच्यामध्ये वाद झाला. निकृष्ट दर्जाचे जेवण खायला देत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कॅन्टिनमध्ये गोंधळ घातला. याप्रकरणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवले आहे.
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने या पत्रामध्ये असे लिहिले की, २२ एप्रिलला विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले गेले. चौकशीअंती निष्पन्न झाले की, चपात्याचे पीठ खराब झाले होते. त्यामुळे सर्व चपात्या आंबट लागत होत्या. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी दिल्या आहेत. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी मेस चालक आणि मेस कर्मचाऱ्यांना निकृ्ष्ट जेवणासंदर्भात विचारणा केली आणि असे निकृष्ट जेवण विद्यार्थ्यांना देऊ नका विद्यार्थ्यांना विषबाधा होऊ शकते, अशी विनंती केली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी एका विद्यार्थ्यास तुला पाहून घेईल अशी धमकी दिली. मी लोकलचा आहे अशापद्धतीची भाषा त्याने विद्यार्थ्यांच्या प्रती वापरली.
तसंच, कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची काळजी घ्यायची, विद्यार्थ्यांना उत्तम आणि पौष्टिक अन्न देण्याऐवजी उलट कर्मचारी विद्यार्थ्यांना पाहून घेण्याची धमकी देत असतील तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे. त्यामुळे संबंधित मेस चालक आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसंच, अशापद्धतीने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम कोणी करत असेल आणि त्यांना धमकी देण्याचे काम कोणी करत असेल तर आम्ही त्याचे उत्तर तीव्र आंदोलनाच्या स्वरुपामध्ये देऊ, असा इशारा विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने दिला आहे.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



