
Mumbai : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून विधानसभेत सोमवारी मोठा गदारोळ झाला. ‘या प्रकरणातील कोणालाही ‘क्लीन चिट’ दिली जाणार नाही, तसेच दोषींना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही’, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. शिवाय या संपूर्ण प्रकरणावर आज, मंगळवारी सभागृहात सविस्तर निवेदन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्थगन प्रस्तावाद्वारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. अशोक खरात याच्याशी संबंधित १००हून अधिक ‘व्हिडीओ क्लिप’ समोर आल्याचा दावा त्यांनी केला. या क्लिपमध्ये राजकीय व्यक्ती, ‘आयएएस’, ‘आयपीएस’ तसेच महसूल विभागातील अधिकार्यांचा सहभाग असल्याचा आरोप करत संबंधित सर्वांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) तपासण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर आमदार भास्कर जाधव आणि नाना पटोले यांनीही सरकारवर जोरदार टीका करत या प्रकरणामुळे राज्याची बदनामी झाल्याचे सांगितले. ‘हा महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असून, यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे’, अशी मागणी विरोधकांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात हस्तक्षेप करत हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले. आध्यात्माच्या नावाखाली महिलांची फसवणूक करून त्यांच्यावर अत्याचार, दुष्कृत्ये झाल्याचे समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी सक्रियपणे कारवाई सुरू केली असून, सुरुवातीला तक्रार देण्यास घाबरणाऱ्या महिलांना धीर दिल्यानंतर आता त्या पुढे येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
ही कारवाई अचानक झालेली नसून आधीपासूनच तयारी सुरू होती. आरोपीच्या अटकेपूर्वीच १० मार्च रोजी दुसर्या जिल्ह्यातील एका तक्रारीचा वापर करून आवश्यक ती ‘एलओसी’ मिळविण्यात आली होती. त्यामुळे त्याला बाहेर पळता आले नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे याबाबतची सविस्तर माहिती आज, मंगळवारी सभागृहासमोर मांडण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.
‘माझ्यात वेगळी शक्ती आहे’, असे महिलांना सांगून त्यांचा दुरुपयोग करणे आणि त्या जे काही समर्पण करत आहेत, तेच त्यांचे इतिकर्तव्य आहे, अशा पद्धतीने त्यांचे ‘ब्रेन वॉशिंग’ करणे, अशा अनेक गोष्टी यामध्ये झाल्या आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. मात्र, विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिल्यानंतरच पुढील कामकाज सुरू झाले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



