
Manoj jarange-Patil : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारपासून राज्यभरात दौरा सुरु केलाय. सकाळी अंतरवाली सराटीतून त्यांनी त्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली. रात्री धाराशिवमध्ये जाहीर सभेला त्यांनी संबोधित केलं. या धाराशिवमधील वाशीमध्ये आलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. मराठ्यांची एकजुट काय असते ती वाशी करांनी दाखवली असं म्हणत आता मराठा समाज एकत्र आलाय. सत्तर वर्षात सगळ्या पक्षातील नेत्यांना मराठ्यांनी मोठ केलं. परंतु या वर्षात आमंचं वाटोळं कोणी केलं, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.
|
Kalyan Fire News : इमारतीच्या १० व्या मजल्यावरील घराला भीषण आग, घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक |
आरक्षणावरून राजकीय नेत्यांवर जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला. याबरोबर त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटणार नसल्याची भूमिकाही मांडली. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणासाठी कष्ट करा, आपली कसोटी लावून धरा. जेवढी जमीन, संपत्ती महत्त्वाची आहे, तितकीच जात जीवन जगताना आरक्षण महत्त्वाची असते. आरक्षणाशिवाय आता पर्याय नाही. आपण समाजाशी गद्दारी करणार नाही, समाजाचा शब्द खाली पडू देणार नाही. पण आपल्या मतभेद होऊ देऊन नका. राजकीय लोकांच्या बोलण्यात येऊ नका. याच्या छाड्यात बसून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी मराठा समाज हा जागृत झालाय. आता नाही तर कधीच नाही.. अस म्हणून मराठा समाज एकञ आला सामान्य मराठा या आंदोलनात उतारलाय. आरक्षण मिळेपर्यंत गावोगावी साखळी उपोषण सुरू करा. आंदोलन शांततेत करा,आत्महत्या करू नका, असा सल्लाही जरांगे पाटील यांनी या सभेत दिला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना मनोज जरांगे- पाटील यांनी राजकीय नेत्यांवर निशाण्यावर घेतलं. आरक्षणापायी आमच्या लेकरांचा घात झाला आरक्षण नसल्याने आमच्या लेकरांच्या स्वप्नाची राखरांगोळी केली, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी संबोधित करताना जरांगे पाटलांनी मराठा समाजातील लोकांमध्ये एल्गार भरला.
तुम्हीच खोडीचे आहात. तुम्ही नेत्यांच्या तीन-तीन पिढ्या मोठ्या केल्या. त्यांच्या पोरांना तुम्ही साहेब म्हणता. परंतु आपल्या पोरांना त्यांची काहीच मदत झाली नाही. ७० वर्षांमध्ये ज्या नोंदी सापडत नव्हत्या, त्या आता सापडत आहेत. ७० वर्षांमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं, तर जगातली सगळ्यात सुधारित आणि पुढारलेली जात मराठा जात असती. आजपर्यंत कुणी ह्या नोंदी दडवून ठेवल्या होत्या? कुणामुळे ७० वर्षे मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही? त्याचं उत्तर मिळालं पाहिजे.
''नेत्यांची पोरं परदेशातून शिकून येतात. तो साहेबांचा भैय्या इन करतो अन् आपण त्याला बाळासाहेब म्हणतो. तेच आज मराठ्यांना विरोध करत आहेत. मराठ्यांनी ठरवलं तर त्यांना चड्डी-बनियनसकट झोडून काढतील. त्यांना आयुष्यभर मराठे गुलाल लागू देणार नाहीत.. जो आपल्या पोरांच्या मुळावर उठेल तो आपला नाही. आता फक्त आपल्याला पोरांचा फायदा बघायचा आहे. सगळ्यांनी एकजुटीने पुन्हा एकत्र यायचं आहे आणि गावागावातल्या मराठ्यांना जागरुक ठेवायचं आहे.''
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



