
सोलापूर : पंढरीच्या पांडुरंगाच्या आषाढी वारीसाठी १६ ते १८ लाख वारकरी येतील, असा अंदाज पोलिस प्रशासनाचा आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाच हजार बसगाड्यांची सोय केली आहे. स्थानिक पातळीवर सोलापूर विभागाच्या २५० गाड्या असतील.
येत्या २९ जूनला आषाढी वारीचा सोहळा असून दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यातून २० लाखांपर्यंत भाविक पंढरीत दाखल होतात. पोलिस प्रशासन, राज्य महिला आयोग, आरटीओ, अशा वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या अडचणींवर मात केली जात आहे. दरवर्षी पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांचा अंदाज घेऊन एसटी महामंडळाने पाच हजार बसगाड्यांची सोय केली आहे.
मराठवाड्यातून येणाऱ्या बसगाड्या भीमा नगर बस स्थानकावर, खानदेशातून येणाऱ्या बस श्री विठ्ठल कारखान्यावरून, पुणे-सातारासह पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या बसगाड्या चंद्रभागा नगर येथून ये-जा करतील. स्थानिक पातळीवरील २५० अतिरिक्त गाड्या अक्कलकोट, तुळजापूर, मंगळवेढा, शिखर शिंगणापूर यासह गरजेच्या ठिकाणाहून धावतील.
पाच हजार बसगाड्यांसाठी दहा हजार चालक-वाहक व इतर विभागांचे अधिकाऱ्यांचा वॉच एसटी वाहतुकीवर असणार आहे. त्या नियोजनासाठी आज (सोमवारी) पंढरपुरात अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. त्यात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, याकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. एसटी प्रवाशांसाठी १८००२२१२५० हा टोल फ्री हेल्पलाइन नंबर आहे. बसगाड्यांच्या वेळापत्रक त्यावरून समजणार आहे.
‘या’ वारकऱ्यांना सवलतीचा प्रवास
शिंदे-फडणवीस सरकारने काही महिन्यांपूर्वी एसटी बसगाड्यातून प्रवास करणाऱ्या महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता आषाढी वारीसाठी येणाऱ्या महिला वारकऱ्यांना अर्ध्या तिकिटात पंढरीत दाखल होता येणार आहे. दुसरीकडे 75 वर्षांवरील ज्येष्ठांना केवळ आधारकार्ड किंवा मतदान कार्ड दाखवून मोफत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे यंदा महिला व ज्येष्ठ वारकऱ्यांची संख्या अधिक असेल, असा अंदाज एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सहा हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त
आषाढी वारीला येणाऱ्या भाविकांचा अंदाज घेऊन यंदा सहा हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त पंढरीत असणार आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली यासह इतर काही ठिकाणाहून देखील बंदोबस्त मागविला आहे. पोलिसांच्या मदतीला जवळपास एक हजार होमगार्ड असतील. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके देखील वारी काळात नेमली जाणार आहेत.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




