
Pune : गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मीळ आजाराने पुरंदर तालुक्यातील नीरा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. या वर्षातील ‘जीबीएस’च्या रुग्णाचा पुणे जिल्ह्यातील पहिलाच मृत्यू असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
‘जीबीएस’च्या आजाराने नीरा येथील ५१ वर्षांच्या व्यक्तीचा भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. या रुग्णाला अशक्तपणा, हात पायाला मुंग्या येणे, हात पायांची हालचाल मंदावणे अशी काही लक्षणे दिसून येत होती. मेंदूच्या तपासण्या केल्यानंतर रुग्णाला ‘जीबीएस’ झाल्याचे निदान झाले. त्यानुसार नीरा येथील खासगी रुग्णालयात काही दिवस उपचार सुरू होते. मात्र, रुग्णाला उपचारादरम्यान श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये सोमवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचारादरम्यान रक्तदाब वाढल्याने आणि श्वसनास त्रास झाल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना प्रकृती स्थिर होत असतानाच गुरुवारी सकाळी रक्तदाब वाढून हृदयविकाराचा झटका आला. ‘जीबीएस’च्या संसर्गामुळे या रुग्णाचा मृत्यू झाला.
पुरंदर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी भारती हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णाच्या आजाराची सर्व माहिती संकलित केली. दरम्यान, नीरेत आणखी एकाला जीबीएस झाल्याचे निदान झाले. मात्र, योग्य उपचारांमुळे तो बरा झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
खासगी आणि इतर पाण्याचे स्त्रोत आता तपासण्याचे; तसेच सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. खासगी रुग्णालयांनी अशा लक्षणांचे रुग्ण आढळल्यास त्याची आरोग्य विभागाला माहिती देण्याची सूचना केली आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे नमुने पाठवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. - डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी
रुग्णाला 'जीबीएस'चा संसर्ग झाला होता. त्यातही 'जीबीएस'च्या गंभीर प्रकाराचा आजार आल्याचे निदान झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा रक्तदाब वाढला. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आला. 'जीबीएस'मुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. -डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती हॉस्पिटल
पुरंदर तालुक्यात एकाच गावात 'जीबीएस'च्या संसर्गाचे दोन रुग्ण आढळले आहे. त्यापैकी एका रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर योग्य वेळी झालेल्या उपचारांमुळे आजार बरा झाला आहे. आजाराच्या संसर्गाची जिल्हा परिषदेने गांभीर्याने दखल घेतली असून, घटनास्थळी पाहणी केली आहे; तसेच आरोग्य यंत्रणेला सर्वेक्षण करण्याबरोबर सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. -चंद्रकांत वाघमारे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



