T20 WC 2026: टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगणार? उर्वरित दोन सामन्यात गणित जर तर वर...Image Credit source: BCCI Twitter
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारताची लढत दक्षिण अफ्रिकेशी झाली. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम गोलंदाजी आली. भारताची येथेच खऱ्या अर्थाने वाट लागली. कारण कर्णधार सूर्यकुमार यादवलाही प्रथम फलंदाजी करायची होती. पण तसं झालं नाही. दक्षिण अफ्रिकेने 20 षटकात 7 गडी गमवून 187 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ सर्व गडी बाद 111 धावाच करू शकला. भारताने हा सामना 76 धावांनी गमावला आहे. खरं तर दक्षिण अफ्रिकेने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीचा वचपा काढला असं म्हणायला हरकत नाही. कारण या सामन्यात भारतीय संघाला कुठेच भारी पडू दिलं नाही. त्यामुळे भारताचा नुसता पराभवच नाही तर नेट रनरेटचाही फटका बसला आहे. भारताने हा सामना मोठ्या फरकाने गमवल्याने -3.800 नेट रनरेट झाला आहे. त्यामुळे भारताची पुढच्या सामन्यात कसोटी लागणार आहे. खरं तर या स्पर्धेतून बाद होईल अशीच स्थिती आहे. कारण भारताला आता दक्षिण अफ्रिका वगळून इतर संघांच्या कामगिरीकडे लक्ष ठेवावं लागणार आहे.
भारताला आता उपांत्य फेरीत पोहोचणं कठीण होणार आहे. कारण भारताला नुसतं जिंकून नाही नेट रनरेटही सुधारावा लागणार आहे. त्यामुळे भारताची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. भारतासमोर आता झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचं आव्हान असणार आहे. या दोन्ही सामन्यात विजय मिळवून नाही. तर नेट रनरेट सुधारण्यावरही जोर द्यावा लागणार आहे. कारण भारताने तसं केलं नाही तर पदरात 4 गुण असूनही उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार नाही. त्यामुळे भारतीय संघाला सुपर 8 फेरीतच गाशा गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या संघांना मोठ्या फरकाने पराभूत करणं भाग आहे.
भारत आणि झिम्बाब्वे सामना आता 26 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यात भारताच्या कामगिरीवर सर्व काही अवलंबून असणार आहे. जर भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला तर आणि तरच स्पर्धेत राहील. अन्यथा सामन्यातून गाशा गुंडाळण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




