पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक‎ साधनेसाठी खूप अनुकूल‎

आपण काही गोष्टींना दैवी कृपा किंवा दैवी कोप मानणे थांबवले‎पाहिजे. पूर येतो, आपले नुकसान होते किंवा आपले शरीर आजारी‎पडते तेव्हा आपण म्हणतो की ही देवाची इच्छा आहे किंवा त्याने दया‎दाखवली आहे, किंवा तो क्रोधित आहे. पण हे एक अपूर्ण सत्य आहे.‎निसर्ग हाहाकार माजवत असेल तर त्याचे श्रेय केवळ दैवी इच्छेला‎देऊ नका; त्यात आपलीही भूमिका असते. आपणच निसर्गाला‎आपल्या मनाप्रमाणे वागवले आहे. यातून तो सूड घेत आहे. देवाने हे‎जग खूप चांगल्या पद्धतीने निर्माण केले आहे. यात काहीही व्यर्थ जात‎नाही. संकटाचा सामना करतो, तेव्हा आपण प्रथम आपली भूमिका‎काय आहे याचा विचार केला पाहिजे. आजपासून रौद्र नावाचे संवत्सर‎सुरू होत आहे. ज्योतिषांच्या मते या वर्षी गुरु राजा आणि मंगळ मंत्री‎असेल. गुरुच्या प्रभावामुळे धार्मिक कार्यांमध्ये वाढ होईल. यातून हे‎वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत अनुकूल ठरेल. यंदा तसा संकल्प‎करा. मंगळ मंत्री असल्यामुळे अग्नी, हिंसाचारा अशा घटना घडत‎राहतील. परंतु हे हिंदू वर्ष आत्म्याशी जोडले जाण्याच्या अनेक संधी‎देईल.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *