8 मार्च 1908 साली अमेरिकेतील वस्त्रोद्योगातील महिला कामगारांनी ऐतिहासिक निदर्शने केली होती. कामाचे तास कमी करणे, कामाच्या जागी सुरक्षितता आणि सर्व स्त्री व पुरुष यांना मतदानाचा हक्क या मागण्यांसाठी त्या आग्रही राहिल्या. त्यांनी दिलेली ‘ब्रेड अँड रोसेस’ ही घोषणा गाजली. पोटासाठी भाकरी आणि आयुष्यासाठी सन्मान अशा व्यापक अर्थाची ती घोषणा होती. क्लारा झेटकिन ही कम्युनिस्ट कार्यकर्ती या अमेरिकन कामगार स्त्री संघर्षामुळे प्रभावित झाली. 1910 साली कोपेनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत 8 मार्च हा दिवस अमेरिकन महिला कामगारांच्या संघर्षाच्या स्मरणार्थ ‘जागतिक महिला दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव तिने मांडला व तो पारित झाला. भारतात मुंबई येथे 8 मार्च 1943 रोजी पहिला महिला दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी जागतिक महिला दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो, पण स्त्रियांना कायमच सन्मानाने आणि सुरक्षित जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रोजच महिलांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत. जातीवादातून संघर्ष झाला तरी महिलांना वेठीस धरले जाते व त्यांच्यावर अत्याचार केले जातात, याचे उदाहरण म्हणजे मणिपूर येथील घटना. दोन समाजांतील संघर्षामध्ये अनेक महिलांवर अत्याचार झाले आहेत. कोलकाता येथील एका महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या केली, अशा अनेक घटना आपण ऐकतो आणि हळहळ व्यक्त करतो आणि काळ जातो तसा त्या घटनेची तीव्रता संपते. ही विकृती कधी संपणार हा प्रश्न अनुत्तरित राहतो, कारण महिला घराबाहेरच नाही तर त्यांच्या घरात सुद्धा सुरक्षित नाहीत. कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. संगमनेरस्थित लोकपंचायत संस्थेच्या माध्यमातून अकोले व संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये महिलांसोबत करत असलेल्या कामातून कौटुंबिक हिंसाचाराची, व्यसनाधीनता, विवाहबाह्य संबंध, संशय, मूल होत नाही किंवा मुलगा होत नाही, पैशाची मागणी ही कारणे समोर आली आहेत. हा हिंसाचार पोसण्यामागे माहेरची माणसे हातभार लावत असतात. कौटुंबिक छळ होत आहे हे माहिती असूनही तिला आधार न देता, सासरीच नांदण्यासाठीचा आग्रह ही माणसे करतात. ग्रामीण भागात हिंसाचारग्रस्त महिलांसाठी काम करत असताना समाजातील या वास्तवाची जाणीव होते. स्त्री घरातून परवानगी नसेल तर घराच्या बाहेर पडू शकत नाही. ज्या गावांमध्ये आम्ही काम करतो तिथे त्या महिलांसोबत बैठक घ्यायची असेल तर जनावरांचा चारा, शेतातील काम, स्वयंपाक, धुणे-भांडी अशी सर्व कामे केल्याशिवाय त्या बाहेर पडत नाहीत. काही महिला तर मजुरीसाठी बाहेरगावी जातात; 3 वाजता उठून स्वयंपाक करून 5 वाजता निघतात, तर संध्याकाळी 8 वाजता घरी येतात. काही अनुभव असेही आहेत की, उच्च शिक्षण घेतलेल्या मुलीही नवऱ्याने कितीही मारले, तिथे प्रेम नाही, तरी सासरीच नांदायचे आहे असा अट्टाहास करताना दिसतात; कारण माहेरी राहिली तर तिची समाजात अवहेलना होते. गावात भाऊबंदकीत किंवा शेजारी काही वाद झाला तर त्या घरातील स्त्रीने त्यामध्ये भाग घेऊ नये, तिला बोलू दिले जात नाही. या सर्व मानसिकता घडवण्याचा व तिलाच त्याचा वाहक बनवणाऱ्या या पुरुषप्रधान समाजाने महिला सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता, महिला दिनासारखे ‘इव्हेंट’ असे भास निर्माण केले आहेत. हे भास जेव्हा मिटतील तेव्हा प्रत्येक दिवस महिला सन्मानाने आणि निर्भीडपणे जगतील, लिंगभेद न करणारी न्यायव्यवस्था प्रस्थापित होईल, तेव्हा 8 मार्च हा एक दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची गरज पडणार नाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक विचार आहेत.) आजही स्त्री कौटुंबिक हिंसाचारामुळे पोळलेलीसासर व माहेरच्या हिंसाचक्रात महिला अडकलेल्या आहेत. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांच्यासोबत कोणीही उभे रहात नाही. अशा स्थितीत त्या तणावामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा, सलग दुसरं सुवर्णपदक मिळवण्याचा निर्धार.
- पुण्यात गॅस गळतीने भीषण स्फोट! आई, वडील आणि मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; खांदवेनगरमधील संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त
- खान सरांच्या अडचणीत वाढ! गोळीबार आणि तोडफोड प्रकरणी पाटणा न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.
- अंबरनाथच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; ७/१२ उताऱ्यासाठी केली होती मागणी.
महाराष्ट्र
- आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा, सलग दुसरं सुवर्णपदक मिळवण्याचा निर्धार.
- पुण्यात गॅस गळतीने भीषण स्फोट! आई, वडील आणि मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; खांदवेनगरमधील संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त
- खान सरांच्या अडचणीत वाढ! गोळीबार आणि तोडफोड प्रकरणी पाटणा न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.
- अंबरनाथच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; ७/१२ उताऱ्यासाठी केली होती मागणी.
गुन्हा
- अंबरनाथच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; ७/१२ उताऱ्यासाठी केली होती मागणी.
- लग्नाचा मांडव उखडलाही नव्हता तोच घात! लग्नानंतर अवघ्या १२ व्या दिवशी २६ वर्षीय तरुण तलाठ्याची आत्महत्या; पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- पुणे: नसरापूर नराधम आरोपी भीमराव कांबळे विरोधात खटल्याला वेग; विशेष न्यायालयात साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरू!
- दिल्ली विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापिकेची घरातच हत्या; ओळखीच्या व्यक्तीचाच हात असल्याची शक्यता!
राजकीय
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा






















Subscribe to my channel




