माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा गृह विभागाने काढली आहे. सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या अहवाला नंतर हा निर्णय घेण्यात आला. अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कालावधी संपल्यानंतर वाय प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली. याच मुद्यावरून बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला टोला लगावला आहे. मालेगाव कोर्टात हजर होण्यापूर्वी ते माध्यमांशी संवाद? साधत होते. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता,त्यासंदर्भातील सुनावणीसाठी ते मालेगावात होते. सुनावणीपूर्वी ते विविध मुद्यांवरून माध्यमांशी बोलले, तेव्हाच त्यांनी भाजपावर टीका केली. संघ आणि भाजपवाल्यांना अजिबात धोका नाही. त्यांना कोणी चापटीही मारणार नाही. निरर्थक लोकं आहेत ते, अशा शब्दांत राऊतांनी टीकास्त्र सोडलं.
काय म्हणाले राऊत ?
खरं सांगायचं तर कोणीही, सेक्युरिटीची फार सोस धरू नये. या देशात फक्त भाजप आणि संघाच्या लोकांनाच धोका आहे. त्यामुळे झेडप्लस, डबल झेड प्लस, एनएसजी कमांडो किंवा सेक्युरिटी त्यांनाच, किंवा शिदेंसोबत जे लोक फुटून गेलेत त्यांनाच सुरक्षेची गरज. बाकी इतर पक्षाचे लोकं निर्भय आहेत. आमच्या आसपास येण्याची कुणाची हिंमत नाही, असं माझं मत आहे, असं राऊतांनी सुनावलं. त्यामुळे सेक्युरिटी ठेवली काय आणि काढली काय त्याचा आम्ही लोकांनी बाऊ करू नये. सेक्युरिटी कुणाला, तर त्यांना ( भाजप- शिंदे गट वगैरे) मिळते. पण संघ आणि भाजपवाल्यांना अजिबात धोका नाही. त्यांना कोणी चापटीही मारणार नाही, निरर्थक लोकं आहेत ते असा टोला राऊतांनी लगावला. पण सुरक्षा घेऊन आम्ही कुणी तरी मोठे आहोत. आमच्या जीवाला किती धोका, आम्ही किती राष्ट्रकार्य करतो हे दाखवत आहेत. त्यांचं राष्ट्र कार्य काय हे दिसतंय अशी टीकाही त्यांनी केली.
आपापसातील गटबाजीमुळे चंद्रपूरच्या राजकारणावर झाला परिणाम
उबाठामुळे चंद्रपुरात महापौर झाला नाही असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते. त्यांच्या या विधानाच राऊत यांनी समाचार घेतला. हे अगदी चुकीचं आहे. आमच्यामुळे काहीही झालेलं नाही, अस त्यांनी स्पष्ट केलं. तुमच्या आपापसातील गटबाजीमुळे हे झालं. आम्ही तुमच्यासोबतच होतो, म्हणूनच दिल्लीमध्ये या दोन्ही गटांना समजावण्यासाठी उच्चपातळीवर बैठक झाली. त्यात त्यांना समज दिली. दोन्ही गट एकत्र आले नाही, त्याचाच परिणाम चंद्रपूरच्या राजकारणावर झाला अशा शब्तांत राऊतांनी स्पष्ट सुनावलं.
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
