माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा गृह विभागाने काढली आहे. सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या अहवाला नंतर हा निर्णय घेण्यात आला. अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कालावधी संपल्यानंतर वाय प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली. याच मुद्यावरून बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला टोला लगावला आहे. मालेगाव कोर्टात हजर होण्यापूर्वी ते माध्यमांशी संवाद? साधत होते. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता,त्यासंदर्भातील सुनावणीसाठी ते मालेगावात होते. सुनावणीपूर्वी ते विविध मुद्यांवरून माध्यमांशी बोलले, तेव्हाच त्यांनी भाजपावर टीका केली. संघ आणि भाजपवाल्यांना अजिबात धोका नाही. त्यांना कोणी चापटीही मारणार नाही. निरर्थक लोकं आहेत ते, अशा शब्दांत राऊतांनी टीकास्त्र सोडलं.
काय म्हणाले राऊत ?
खरं सांगायचं तर कोणीही, सेक्युरिटीची फार सोस धरू नये. या देशात फक्त भाजप आणि संघाच्या लोकांनाच धोका आहे. त्यामुळे झेडप्लस, डबल झेड प्लस, एनएसजी कमांडो किंवा सेक्युरिटी त्यांनाच, किंवा शिदेंसोबत जे लोक फुटून गेलेत त्यांनाच सुरक्षेची गरज. बाकी इतर पक्षाचे लोकं निर्भय आहेत. आमच्या आसपास येण्याची कुणाची हिंमत नाही, असं माझं मत आहे, असं राऊतांनी सुनावलं. त्यामुळे सेक्युरिटी ठेवली काय आणि काढली काय त्याचा आम्ही लोकांनी बाऊ करू नये. सेक्युरिटी कुणाला, तर त्यांना ( भाजप- शिंदे गट वगैरे) मिळते. पण संघ आणि भाजपवाल्यांना अजिबात धोका नाही. त्यांना कोणी चापटीही मारणार नाही, निरर्थक लोकं आहेत ते असा टोला राऊतांनी लगावला. पण सुरक्षा घेऊन आम्ही कुणी तरी मोठे आहोत. आमच्या जीवाला किती धोका, आम्ही किती राष्ट्रकार्य करतो हे दाखवत आहेत. त्यांचं राष्ट्र कार्य काय हे दिसतंय अशी टीकाही त्यांनी केली.
आपापसातील गटबाजीमुळे चंद्रपूरच्या राजकारणावर झाला परिणाम
उबाठामुळे चंद्रपुरात महापौर झाला नाही असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते. त्यांच्या या विधानाच राऊत यांनी समाचार घेतला. हे अगदी चुकीचं आहे. आमच्यामुळे काहीही झालेलं नाही, अस त्यांनी स्पष्ट केलं. तुमच्या आपापसातील गटबाजीमुळे हे झालं. आम्ही तुमच्यासोबतच होतो, म्हणूनच दिल्लीमध्ये या दोन्ही गटांना समजावण्यासाठी उच्चपातळीवर बैठक झाली. त्यात त्यांना समज दिली. दोन्ही गट एकत्र आले नाही, त्याचाच परिणाम चंद्रपूरच्या राजकारणावर झाला अशा शब्तांत राऊतांनी स्पष्ट सुनावलं.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप


























Subscribe to my channel




