
पुणे : मोसमी पावसावर यंदा एल-निनोचा प्रतिकूल परिणामाची शक्यता विचारात घेऊन अखेर शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून (१८ मे) होणार आहे. आठवड्यातून एकदा म्हणजे दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन महापालिकेने मे, जून आणि जुलै महिन्यातील पाणी पुरवठ्याचे नियाेजन करण्यासाठी पाणीकपातीचा निर्णय घेतला. महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी मंगळवारी ही माहिती दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. तसेच यापूर्वी जलसंपदा विभागाबरोबरच झालेल्या बैठकीत पाणी कपातीवर चर्चा झाली हाेती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवल्यानंतर त्याचा परिणाम पुढील दाेन ते तीन दिवसांच्या पाणी पुरवठ्यावर होतो. जलवाहिन्यांत ‘एअर ब्लाॅक’ मुळे पाणी पुरवठा विस्कळित होतो. ही अडचण दूर करण्यासाठी ‘एअर व्हॉल्व’ बसवून तो सुरळीत होऊ शकत असल्याचे निदर्शनास आले आहे. एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या भागातील पाणी पुरवठा विस्कळित हाेताे, अशी २० ठिकाणे महापालिकेने निश्चित केली आहेत. त्या ठिकाणी ‘एअर वाॅल्व्ह’ बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मदत हाेईल. तसेच या भागात पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाईल, असे पावसकर यांनी सांगितले.
कपातीतून १५ दिवसांचे पाणी बचतीचा दावा
पहिल्या टप्प्यात आठवड्यातून एकदा पाणी कपात करण्यात येणार असून या कपातीमधून दरमहा ०.२५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच शहराला १५ दिवस पुरेल, एवढ्या पाण्याची बचत होणार आहे. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले नाही, तर पाणी कपातीचे दिवस वाढू शकतात. त्यामुळे जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाकडून आप्तकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर यासारख्या गोष्टींवर बंधन आणण्यात येईल, असे महापालिका आयुक्त कुमार यांनी सांगितले.
महापालिका आणि कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा १५ जुलैपर्यंतच पुरेल, असे जलसंपदाकडून सांगण्यात आले. यंदा विलंबाने मोसमी पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज पाहता ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असल्यास महापालिकेने दहा टक्के पाणीकपात करावी आणि पाणी जपून वापरण्याबाबत कळविण्यात आले होते. पाणीकपात करायची किंवा कसे, याबाबतचा निर्णय महापालिकेने घेण्याचेही सांगण्यात आले होते.
– ह. वि. गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा पुणे विभाग
धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत
धरण पाणीसाठा (टीएमसी) टक्के
टेमघर ०.२४ ६.४६
वरसगाव ५.८२ ४५.३६ टक्के
पानशेत २.६० २४.४० टक्के
खडकवासला १.१२ ५६.८२ टक्के
एकूण पाणीसाठा ९.७८ ३३.५३ टक्के
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


