
पुणे : मोसमी पावसावर यंदा एल-निनोचा प्रतिकूल परिणामाची शक्यता विचारात घेऊन अखेर शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून (१८ मे) होणार आहे. आठवड्यातून एकदा म्हणजे दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन महापालिकेने मे, जून आणि जुलै महिन्यातील पाणी पुरवठ्याचे नियाेजन करण्यासाठी पाणीकपातीचा निर्णय घेतला. महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी मंगळवारी ही माहिती दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. तसेच यापूर्वी जलसंपदा विभागाबरोबरच झालेल्या बैठकीत पाणी कपातीवर चर्चा झाली हाेती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवल्यानंतर त्याचा परिणाम पुढील दाेन ते तीन दिवसांच्या पाणी पुरवठ्यावर होतो. जलवाहिन्यांत ‘एअर ब्लाॅक’ मुळे पाणी पुरवठा विस्कळित होतो. ही अडचण दूर करण्यासाठी ‘एअर व्हॉल्व’ बसवून तो सुरळीत होऊ शकत असल्याचे निदर्शनास आले आहे. एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या भागातील पाणी पुरवठा विस्कळित हाेताे, अशी २० ठिकाणे महापालिकेने निश्चित केली आहेत. त्या ठिकाणी ‘एअर वाॅल्व्ह’ बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मदत हाेईल. तसेच या भागात पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाईल, असे पावसकर यांनी सांगितले.
कपातीतून १५ दिवसांचे पाणी बचतीचा दावा
पहिल्या टप्प्यात आठवड्यातून एकदा पाणी कपात करण्यात येणार असून या कपातीमधून दरमहा ०.२५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच शहराला १५ दिवस पुरेल, एवढ्या पाण्याची बचत होणार आहे. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले नाही, तर पाणी कपातीचे दिवस वाढू शकतात. त्यामुळे जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाकडून आप्तकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर यासारख्या गोष्टींवर बंधन आणण्यात येईल, असे महापालिका आयुक्त कुमार यांनी सांगितले.
महापालिका आणि कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा १५ जुलैपर्यंतच पुरेल, असे जलसंपदाकडून सांगण्यात आले. यंदा विलंबाने मोसमी पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज पाहता ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असल्यास महापालिकेने दहा टक्के पाणीकपात करावी आणि पाणी जपून वापरण्याबाबत कळविण्यात आले होते. पाणीकपात करायची किंवा कसे, याबाबतचा निर्णय महापालिकेने घेण्याचेही सांगण्यात आले होते.
– ह. वि. गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा पुणे विभाग
धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत
धरण पाणीसाठा (टीएमसी) टक्के
टेमघर ०.२४ ६.४६
वरसगाव ५.८२ ४५.३६ टक्के
पानशेत २.६० २४.४० टक्के
खडकवासला १.१२ ५६.८२ टक्के
एकूण पाणीसाठा ९.७८ ३३.५३ टक्के
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




