
Pune - 'सीएनजी'च्या वापरामुळे केवळ वाहनविश्वातच नव्हे तर त्याच्या वापरकर्त्यांच्या आयुष्यातदेखील क्रांती घडली आहे. हातावर पोट असलेले छोटे रिक्षा व्यावसायिक असो की कारचालक, 'सीएनजी'च्या वापरामुळे इंधन खर्चात मोठी बचत होत आहे.
परिणामी मुलांचे शिक्षण, घराचे हप्ते आदींसाठी पैसा उपलब्ध होत आहे. 'सीएनजी'च्या वापरामुळे केवळ ग्राहकच नाही, तर त्याचे संपूर्ण कुटुंब आता एक चांगले आयुष्य जगत आहे. आयुष्याचा प्रवास आता समृद्धीच्या दिशेने होत आहे.
'सीएनजी'च्या वापरामुळे जीवनात बदलाची अनुभूती घेतलेले रामदास काकडे सांगतात, गेल्या पाच वर्षांपासून मी रिक्षाचा व्यवसाय करीत आहे. रिक्षा व्यवसायातून जेवढे उत्पन्न मिळत होते, त्यातील अर्धा खर्च हा पेट्रोलवर होत होता. घरी जाताना हाती फार काही शिल्लक राहत नव्हते. घरात पाच सदस्य अन् कमविणारा मी एकटाच. अनेक स्वप्रे उराशी बाळगलेली, पण दैनंदिन खर्च भागविताना मेटाकुटीला आलो होतो.
एके दिवशी 'सीएनजी'वर रिक्षा व्यवसाय करायचा निश्चय केला. ७ ते ८ महिन्यांपूर्वी 'सीएनजी'वर धावणारी रिक्षा घेतली. रोज साधारणपणे ३०० रुपयांचा 'सीएनजी' भरतो. यावर दिवसाकाठी ८० किलोमीटर इतका प्रवास करतो. 'सीएनजी'चा दर पेट्रोलच्या तुलनेत कमी आहे. शिवाय 'सीएनजी'ला प्रतिकिलोमागे किमान १० ते १२ किलोमीटरचे अधिकचे मायलेज मिळते. त्यामुळे माझा दोन्ही बाजूंनी फायदा होतो.
'सीएनजीं'मुळे इंधनावर होणारा खर्च कमी झाला आहे. शिवाय चांगले मायलेज असल्याने अधिकचे उत्पन्नदेखील मिळत आहे. यातून आता महिन्याला सुमारे सहा हजारांची बचत होत आहे. या बचतीतून मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला आहे. 'सीएनजी'मुळे मी केवळ एकटाच नाही तर सपूर्ण कुटुंब आता चांगले आयुष्य जगत आहोत. आमचा प्रवास समृद्धीच्या दिशेने सुरू असल्याने जगण्यात आता आनंद निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
दुचाकीतही आता क्रांती
|
Maratha Reservation : पुण्यात खळबळजनक घटना,मराठा आरक्षणासाठी बार्शीतील युवकाने संपवलं जीवन |
आशियात सर्वाधिक दुचाकी एकट्या पुणे शहरात आहेत. पुण्यात ३५ लाखांहून अधिक दुचाकीची संख्या आहे. या दुचाकी पेट्रोल अथवा इलेक्ट्रिक ऊर्जेवर धावतात. मात्र आता दुचाकीप्रेमींना आणखी एक चांगला पर्याय उपलब्ध होत आहे. बजाज ऑटो लिमिटेड कंपनीने दुचाकीमध्ये 'सीएनजी'वर धावणारी दुचाकीची निर्मिती केली आहे. जगातील पहिली 'सीएनजी'वर धावणारी दुचाकी होण्याचा मान यानिमिताने बजाज ऑटो लिमिटेड कंपनीला मिळालेला आहे. लवकरच ही दुचाकी ग्राहकांच्या भेटीला उपलब्ध होईल.
राज्यात 'सीएनजी'चा प्रवास सुसाट
पुण्यासह राज्यात आता 'सीएनजी'च्या वापरात वाढ होत आहे. 'सीएनजी'ची होणारी सहज उपलब्धता, वाहनांना मिळणारे चांगले मायलेज व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत 'सीएनजी'चे कमी असलेले दर यामुळे वाहनचालक आता इंधन म्हणून 'सीएनजी'चा पर्याय निवडत आहेत. शिवाय 'सीएनजी'चा वापर पर्यावरणपूरक असल्याने अशी वाहने वापरणे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. आदी कारणांमुळे राज्यात 'सीएनजी'वरील वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. पर्यायाने सीएनजी पंपांची संख्या वाढत आहे.
पुण्याची स्थिती
• सुमारे २ लाख २५ हजार (कॅब व खासगी वाहने) - वाहने
• दीड लाख (पुणे व पिपरी-चिंचवड) - रिक्षा
६ लाख ७० हजार किलो रोजची गंसविक्की
• 'पीएमपी'मधील एकूण बस - १६५०
• 'सीएनजी'वर धावणाऱ्या बस १२२९
• 'पीएमपी' बससाठी वापर (दररोज) ८४ हजार किलो
• सीएनजी पंप - १२०
अर्थकारण
• ४ किलो - रिक्षाची सीएनजी टाकी क्षमता
• 30 किमीचा प्रवास १ किलोमध्ये
• ८३.५० रुपये प्रतिकिलो सध्याचा सीएनजी दर
• ५० ते ७० किमी रोजचा वापर
• पाचशे ते सातशे रुपये रिक्षाचालकाचे सरासरी उत्पन्न
'सीएनजी' च्या वापरामुळे इथन खर्चात बचत होत आहे. पूर्वी इंधनावर जास्त खर्च करावा लागत होता. आता सीएनजी तुलनेने स्वस्त आहे. शिवाय रिक्षाला चांगले मायलेजदेखील मिळत आहे. त्यामुळे आता खर्च वगळून चांगली बचतदेखील होत आहे.
राकेश पवार, घोरपडी, रिक्षाचालक
डिझेलच्या तुलनेत सीएनजी असलेल्या वाहनावर व्यवसाय करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या आहे. त्यामुळे इंधन अधिक खर्ची पडते. पूर्वी डिझेलचा मोठ्या प्रमाणात अपव्यय तर होत असे. शिवाय त्याचा आर्थिक फटकादेखील बसत होता. आता 'सीएनजी' मुळे इंधनावरचा खर्च तुलनेने कमी झाला आहे.
सोहन शेख, हडपसर, कॅबचालक
'पीएमपी'च्या ताफ्यात सध्या १२२१ बस आहेत. येत्या काही महिन्यात ५०० 'सीएनजी'वर धावणाऱ्या नवीन बसचा समावेश होणार आहे. इलेक्ट्रिक बसच्या तुलनेत 'सीएनजी'वर धावणान्या बसचा वापर करणे अधिक हितावह आहे. 'सीएनजी'वरची प्रवासी वाहतूक ही इलेक्ट्रिकच्या तुलनेत स्वस्तात होते त्याचा फायदा 'पीएमपी'ला होत आहे.
सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी, पुणे
शहर
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
महाराष्ट्र
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.


























Subscribe to my channel



