
Pune - 'सीएनजी'च्या वापरामुळे केवळ वाहनविश्वातच नव्हे तर त्याच्या वापरकर्त्यांच्या आयुष्यातदेखील क्रांती घडली आहे. हातावर पोट असलेले छोटे रिक्षा व्यावसायिक असो की कारचालक, 'सीएनजी'च्या वापरामुळे इंधन खर्चात मोठी बचत होत आहे.
परिणामी मुलांचे शिक्षण, घराचे हप्ते आदींसाठी पैसा उपलब्ध होत आहे. 'सीएनजी'च्या वापरामुळे केवळ ग्राहकच नाही, तर त्याचे संपूर्ण कुटुंब आता एक चांगले आयुष्य जगत आहे. आयुष्याचा प्रवास आता समृद्धीच्या दिशेने होत आहे.
'सीएनजी'च्या वापरामुळे जीवनात बदलाची अनुभूती घेतलेले रामदास काकडे सांगतात, गेल्या पाच वर्षांपासून मी रिक्षाचा व्यवसाय करीत आहे. रिक्षा व्यवसायातून जेवढे उत्पन्न मिळत होते, त्यातील अर्धा खर्च हा पेट्रोलवर होत होता. घरी जाताना हाती फार काही शिल्लक राहत नव्हते. घरात पाच सदस्य अन् कमविणारा मी एकटाच. अनेक स्वप्रे उराशी बाळगलेली, पण दैनंदिन खर्च भागविताना मेटाकुटीला आलो होतो.
एके दिवशी 'सीएनजी'वर रिक्षा व्यवसाय करायचा निश्चय केला. ७ ते ८ महिन्यांपूर्वी 'सीएनजी'वर धावणारी रिक्षा घेतली. रोज साधारणपणे ३०० रुपयांचा 'सीएनजी' भरतो. यावर दिवसाकाठी ८० किलोमीटर इतका प्रवास करतो. 'सीएनजी'चा दर पेट्रोलच्या तुलनेत कमी आहे. शिवाय 'सीएनजी'ला प्रतिकिलोमागे किमान १० ते १२ किलोमीटरचे अधिकचे मायलेज मिळते. त्यामुळे माझा दोन्ही बाजूंनी फायदा होतो.
'सीएनजीं'मुळे इंधनावर होणारा खर्च कमी झाला आहे. शिवाय चांगले मायलेज असल्याने अधिकचे उत्पन्नदेखील मिळत आहे. यातून आता महिन्याला सुमारे सहा हजारांची बचत होत आहे. या बचतीतून मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला आहे. 'सीएनजी'मुळे मी केवळ एकटाच नाही तर सपूर्ण कुटुंब आता चांगले आयुष्य जगत आहोत. आमचा प्रवास समृद्धीच्या दिशेने सुरू असल्याने जगण्यात आता आनंद निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
दुचाकीतही आता क्रांती
|
Maratha Reservation : पुण्यात खळबळजनक घटना,मराठा आरक्षणासाठी बार्शीतील युवकाने संपवलं जीवन |
आशियात सर्वाधिक दुचाकी एकट्या पुणे शहरात आहेत. पुण्यात ३५ लाखांहून अधिक दुचाकीची संख्या आहे. या दुचाकी पेट्रोल अथवा इलेक्ट्रिक ऊर्जेवर धावतात. मात्र आता दुचाकीप्रेमींना आणखी एक चांगला पर्याय उपलब्ध होत आहे. बजाज ऑटो लिमिटेड कंपनीने दुचाकीमध्ये 'सीएनजी'वर धावणारी दुचाकीची निर्मिती केली आहे. जगातील पहिली 'सीएनजी'वर धावणारी दुचाकी होण्याचा मान यानिमिताने बजाज ऑटो लिमिटेड कंपनीला मिळालेला आहे. लवकरच ही दुचाकी ग्राहकांच्या भेटीला उपलब्ध होईल.
राज्यात 'सीएनजी'चा प्रवास सुसाट
पुण्यासह राज्यात आता 'सीएनजी'च्या वापरात वाढ होत आहे. 'सीएनजी'ची होणारी सहज उपलब्धता, वाहनांना मिळणारे चांगले मायलेज व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत 'सीएनजी'चे कमी असलेले दर यामुळे वाहनचालक आता इंधन म्हणून 'सीएनजी'चा पर्याय निवडत आहेत. शिवाय 'सीएनजी'चा वापर पर्यावरणपूरक असल्याने अशी वाहने वापरणे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. आदी कारणांमुळे राज्यात 'सीएनजी'वरील वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. पर्यायाने सीएनजी पंपांची संख्या वाढत आहे.
पुण्याची स्थिती
• सुमारे २ लाख २५ हजार (कॅब व खासगी वाहने) - वाहने
• दीड लाख (पुणे व पिपरी-चिंचवड) - रिक्षा
६ लाख ७० हजार किलो रोजची गंसविक्की
• 'पीएमपी'मधील एकूण बस - १६५०
• 'सीएनजी'वर धावणाऱ्या बस १२२९
• 'पीएमपी' बससाठी वापर (दररोज) ८४ हजार किलो
• सीएनजी पंप - १२०
अर्थकारण
• ४ किलो - रिक्षाची सीएनजी टाकी क्षमता
• 30 किमीचा प्रवास १ किलोमध्ये
• ८३.५० रुपये प्रतिकिलो सध्याचा सीएनजी दर
• ५० ते ७० किमी रोजचा वापर
• पाचशे ते सातशे रुपये रिक्षाचालकाचे सरासरी उत्पन्न
'सीएनजी' च्या वापरामुळे इथन खर्चात बचत होत आहे. पूर्वी इंधनावर जास्त खर्च करावा लागत होता. आता सीएनजी तुलनेने स्वस्त आहे. शिवाय रिक्षाला चांगले मायलेजदेखील मिळत आहे. त्यामुळे आता खर्च वगळून चांगली बचतदेखील होत आहे.
राकेश पवार, घोरपडी, रिक्षाचालक
डिझेलच्या तुलनेत सीएनजी असलेल्या वाहनावर व्यवसाय करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या आहे. त्यामुळे इंधन अधिक खर्ची पडते. पूर्वी डिझेलचा मोठ्या प्रमाणात अपव्यय तर होत असे. शिवाय त्याचा आर्थिक फटकादेखील बसत होता. आता 'सीएनजी' मुळे इंधनावरचा खर्च तुलनेने कमी झाला आहे.
सोहन शेख, हडपसर, कॅबचालक
'पीएमपी'च्या ताफ्यात सध्या १२२१ बस आहेत. येत्या काही महिन्यात ५०० 'सीएनजी'वर धावणाऱ्या नवीन बसचा समावेश होणार आहे. इलेक्ट्रिक बसच्या तुलनेत 'सीएनजी'वर धावणान्या बसचा वापर करणे अधिक हितावह आहे. 'सीएनजी'वरची प्रवासी वाहतूक ही इलेक्ट्रिकच्या तुलनेत स्वस्तात होते त्याचा फायदा 'पीएमपी'ला होत आहे.
सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी, पुणे
शहर
- मुंबई: तुरुंगात माझ्यावर विषप्रयोग झाला असावा का? खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा, राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर करणार 'टॉक्सिक टेस्ट'!
- मुंबई: जोगेश्वरी-गोरेगाव SRA घरकुल घोटाळा: पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना घरे वाटप केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दोन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे निर्देश!
- मुंबई: दहीहंडी उत्सव २०२६ साईलीला क्रीडा मंडळाचे ९ थरांचे लक्ष्य, तर ठाण्यात ११ थरांसाठी तब्बल २१ लाखांचे घसघशीत इनाम जाहीर!
- मुंबई: कृष्णजन्माष्टमीनिमित्त दिविजा फडणवीस यांचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; देवाकडे मोह-मायेच्या गोष्टी मागण्याबद्दल दिला अत्यंत महत्त्वाचा संदेश!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: बनावट बँक खात्यांच्या माध्यमातून तब्बल १०० कोटींहून अधिक रक्कम विविध बँकांत वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक!
- गडचिरोली: हरित पोलादाचा नवा अध्याय! खनिजसंपन्न जिल्ह्याला ग्लोबल हबन बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 'जॉन कॉकरिल'सोबत ऐतिहासिक करार!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
- मुंबई: तुरुंगात माझ्यावर विषप्रयोग झाला असावा का? खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा, राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर करणार 'टॉक्सिक टेस्ट'!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगढ: संगीत जगतातून अत्यंत धक्कादायक बातमी; ३५ वर्षीय प्रसिद्ध पंजाबी गायक बलजीत सिंग याचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ!
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती





























Subscribe to my channel




