
Pune : व्हिसावर भारतामध्ये आलेल्या १११ पाकिस्तानी नागरिकांचे सध्या पुण्यामध्ये वास्तव्य आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतात व्हिसावर आलेल्या या नागरिकांमध्ये मुस्लिम, सिंधी आणि हिंदू समाजाच्या व्यक्तींचा समावेश आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ निरपराध भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत भारतामध्ये वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याचा आदेश दिला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सध्या एकूण १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. ५६ महिला आणि ३५ पुरुष दीर्घकालीन व्हिसावर भारतात आले आहेत, अशी माहिती विशेष पोलीस शाखेकडून देण्यात आली.
|
Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर मोठी कारवाई, संशयित दहशतवादी आसिफ-आदिलचे घर उद्ध्वस्त |
विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या आदेशानंतर शहरातील सर्व पाकिस्तानी नागरिकांची माहिती संकलित करण्यात येत असून, त्यांच्याकडे असलेल्या व्हिसा आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर आतापर्यंत तीन पाकिस्तानी नागरिकांनी पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी कार्यालयाकडून (एफआरओ) ‘एक्झिट’ प्रमाणपत्र घेतले असून, लवकरच ते भारत सोडून जाणार आहेत. उर्वरित नागरिकांच्याही परतीच्या प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे.’ दरम्यान, कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा बसावा आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, परकीय नागरिकांशी संबंधित सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत देश सोडून जावे, असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. मात्र, अद्याप स्थानिक पोलिसांना त्या अनुषंगाने कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही. आदेश प्राप्त होताच त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्यात येईल. रंजनकुमार शर्मा, पोलीस सहआयुक्त
शहर
- मुंबई: राज ठाकरेंचा अपमान; भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
- पुणे: "मानसिक नक्षलवादी" म्हणजे नक्की काय? पंतप्रधान कार्यालयाने खुलासा करावा; खासदार सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल
- पुणे: माळशेज-भोरांडे जलविद्युत प्रकल्पाच्या जनसुनावणीला स्थगिती; खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या आक्षेपांमुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले
- नवी मुंबई: महापेमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; ॲपल टेक सपोर्टच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची लूट
महाराष्ट्र
- मुंबई: राज ठाकरेंचा अपमान; भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
- पुणे: "मानसिक नक्षलवादी" म्हणजे नक्की काय? पंतप्रधान कार्यालयाने खुलासा करावा; खासदार सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल
- पुणे: माळशेज-भोरांडे जलविद्युत प्रकल्पाच्या जनसुनावणीला स्थगिती; खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या आक्षेपांमुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले
- नवी मुंबई: महापेमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; ॲपल टेक सपोर्टच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची लूट
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू


























Subscribe to my channel




