जालना/अंतरवली सराटी: राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) आणि प्रलंबित मागण्यांचा मुद्दा पुन्हा एकदा कमालीचा तापला असून सरकारकडून तोडगा काढण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ३० मे २०२६ पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, जरांगे यांनी दिलेल्या निमंत्रणाचा मान ठेवून भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार प्रसाद लाड हे आज (शुक्रवार, २२ मे) स्वतः अंतरवली सराटी येथे दाखल झाले. अत्यंत तणावपूर्ण आणि राजकीय घडामोडींनंतर झालेल्या या थेट चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक संवाद झाला, तर काही प्रसंगी आमदार लाड ऑन-कॅमेरा भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारकडे १० प्रमुख मागण्या चर्चेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या कल्याणासाठी आणि सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे १० प्रमुख मागण्यांची अधिकृत यादी सुपूर्द केली आहे. यामध्ये खालील मागण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे: १. सध्याची मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी. २. मराठा आणि कुणबी समाजाच्या स्वतंत्र विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी. ३. 'सगेसोयरे' अध्यादेशाची अंमलबजावणी करून कुणबी नोंदी आढळलेल्यांच्या रक्ताच्या नात्यातील सर्वांना प्रमाणपत्रे द्यावीत. ४. हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅझेटनुसार मराठा समाजाला आरक्षण लागू करावे. ५. सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अतिरिक्त निधी पुरवण्यात यावा.
मी तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन - प्रसाद लाड अंतरवली सराटीत पोहोचल्यानंतर प्रसाद लाड यांनी मराठा समाजाच्या लढ्यात मनोज जरांगे यांच्या भूमिकेचे कौतुक केले. लाड म्हणाले, "आमच्यात भूतकाळात अनेकदा राजकीय वाद झाले आहेत, हे मला मान्य आहे. मात्र, जरांगे यांनी दिलेल्या लढ्यामुळेच माझ्या समाजाला न्याय मिळाला, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मी येथे कोणताही आमदार किंवा नेता म्हणून आलेलो नाही, तर समाजाचा एक सामान्य माणूस आणि तुमचा लहान भाऊ म्हणून आलो आहे." ३० मे ही तारीख बदलून उपोषण न करण्याची विनंती त्यांनी केली. कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस असून जरांगे यांच्या प्रकृतीची सर्वांना काळजी आहे. हे सर्व १० मुद्दे आपण स्वतः 'सरकारचे दूत' म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडून त्यावर सभागृहात तात्काळ मार्ग काढू, अशी ग्वाही लाड यांनी दिली.
भेटीपूर्वी धमकीचा फोन; जरांगेंकडून निषेध या अत्यंत महत्त्वाच्या भेटीपूर्वी एक मोठी खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली होती. आमदार प्रसाद लाड हे हॉटेलमध्ये थांबले असताना त्यांच्या पीएला धमकीचा फोन आला होता आणि दोन संशयित तरुणांनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी या प्रकरणी योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेवर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "धमकी देणारे कोण आहेत मला माहीत नाही, पण अशा हल्ल्याचे किंवा धमकीचे समर्थन होऊ शकत नाही. आपल्या बांधवांनी गेली पौणे तीन वर्षे अतिशय शांततेने आंदोलन केले आहे, त्यामुळे मराठा समाजाला गालबोट लागेल असे वर्तन कोणीही करू नये." जरांगे यांनी स्पष्ट केले की, त्यांनी लाड यांच्यावर विश्वास ठेवला असून आता तोडगा काढण्याची धुरा पूर्णपणे प्रसाद लाड यांच्या खांद्यावर आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




