
Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. सध्या राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये कडाक्याचे ऊन तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी उकाडा सुरू झाला आहे. राज्यात पुन्हा सूर्य आग ओकू लागला आहे. उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात अकोला येथे सर्वात उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये ४ दिवसांच्या उच्चांकी तापमानानंतर आजपासून पारा कमी होणार आहे. आयएमडीच्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. गेले ५ दिवस नाशिकमध्ये उन्हाचा सर्वाधिक चटका जाणवला. आजपासून उष्णतेचा पारा कमी होणार आहे. सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाला. आता दररोज एक अंशाने तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज आहे. तरीही नागरिकांनी दुपारच्या वेळेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील तापमानात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ झाली आहे. यंदा एप्रिलमध्ये प्रथमच पारा चाळीशी पार गेला असून बुधवारी चिपळूण मधील कमाल तापमान ४०.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारी नागरिकांना घराबाहेर जाणे टाळले त्यामुळे शहरातील रस्त्यांवर गर्दी कमी होती. कोकण कृषी विद्यापीठाकडून आलेल्या अंदाजानुसार कोकण विभागात १३ ते १९ एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमानात वाढ होत असल्याने चिपळूण शहरात पाणी टंचाईमध्ये वाढ होत असून टँकरची मागणी देखील वाढलेली आहे.
छत्रपती संभाजी नगर शहरात सूर्य आग ओळखत असल्याची प्रचिती पुन्हा आलेली आहे. बुधवारी दुपारी ४२.६ अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे. दररोज तापमानात एक अंशाने वाढ होत असल्यामुळे उन्हाळ्यात तापमानाचा पारा पन्नाशी गाठतो की काय अशी भीती वाटू लागली आहे. आज सकाळपासून ही तीच स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरात मागील पाच दिवसांपासून शहर आणि परिसरावर सूर्य आग ओकत आहे. चिकलठाणा वेधशाळेने काल कमाल तापमान ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान आहे. दरवर्षी एप्रिल अखेर आणि वैशाखाच्या सुरुवाती पूर्वी एवढे तापमान असते. तो आकडा एप्रिलच्या पहिल्या १० दिवसांतच गाठल्याने पुढील काळात तापमान अजून वाढणार असल्याने संभाजीनगरकरांची चिंता वाढली आहे.
सध्या नांदेड शहरातील तापमान ४१ अंशांच्या पुढे जाऊ लागले असून, उष्णता वाढली आहे. दुपारच्या वेळेत शहरातील मुख्य रस्ते ओस पडत आहेत. तापमान वाढल्याने शीतपेयांना मागणी वाढली आहे. वाढत्या उन्हात आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उन्हाळा सुरू झाला असून तापमानात वाढ होत आहे. मध्यंतरी जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने हजेरी लावल्यानंतर काही प्रमाणात कमी झालेला तापमानाचा पारा दोन दिवसांपासून पुन्हा एकदा वाढू लागला असून, तो आता ४२ अंशांवर पोचला आहे. दुपारची मेहनतीची कामे टाळावीत. अनावश्यक घराबाहेर पडू नये. दुपारी ज्या मुलांची शाळा असेल, त्यांची पालकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
शहर
- आषाढी वारी २०२६: वारकऱ्यांसाठी धावणार १२६० जादा बस; पंढरपूरच्या वारीसाठी 'एसटी'चे मराठवाड्यातील मोठे नियोजन!
- यशाची नवी व्याख्या! न्यूयॉर्कमधील आलिशान जीवन सोडून अमेरिकन जोडपे स्थायिक झाले इटलीत; सुखी आयुष्यासाठी घेतला मोठा निर्णय
- भागीदारी संस्थांनो सावधान! कलम १९४-टी (Section 194T) नुसार भागीदारांच्या पगार, व्याजावर १०% टीडीएस अनिवार्य; नियम मोडल्यास खर्च होणार नामंजूर
- किल्ले विसापूरचे रहस्य उलगडले! गुप्त भुयारानंतर आता प्राचीन अपरिचित लेणीचा शोध; दोन पाण्याच्या टाक्या आणि विश्रांती कक्षही आढळला
महाराष्ट्र
- यशाची नवी व्याख्या! न्यूयॉर्कमधील आलिशान जीवन सोडून अमेरिकन जोडपे स्थायिक झाले इटलीत; सुखी आयुष्यासाठी घेतला मोठा निर्णय
- भागीदारी संस्थांनो सावधान! कलम १९४-टी (Section 194T) नुसार भागीदारांच्या पगार, व्याजावर १०% टीडीएस अनिवार्य; नियम मोडल्यास खर्च होणार नामंजूर
- किल्ले विसापूरचे रहस्य उलगडले! गुप्त भुयारानंतर आता प्राचीन अपरिचित लेणीचा शोध; दोन पाण्याच्या टाक्या आणि विश्रांती कक्षही आढळला
- पुणे-मुंबई प्रवास टाळा! मुसळधार पाऊस अन् भीषण दरडींमुळे एक्सप्रेसवे आणि रेल्वे मार्ग पूर्णपणे ठप्प; प्रशासनाचे प्रवाशांना महत्वाचे आवाहन
गुन्हा
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
- "जे लग्न कधी होणारच नाहीये, त्यासाठी आधार कशाला?" केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचे खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल!
- उत्तर प्रदेश: पतीची हत्या करून मृतदेह बाथरुमच्या फरशीखाली गाडला; ४५ दिवस मृतदेहावरच आंघोळ केली!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!
- म्हैसूर दसऱ्याच्या 'जंबो सवारी'चा मानकरी; प्रसिद्ध 'अभिमन्यू' हत्तीचा सुळा तुटला! वन विभागाकडून उपचार सुरू


























Subscribe to my channel




