नवी दिल्ली:येत्या १ जून २०२६ पासून विमान प्रवाशांना महागाईचा मोठा झटका बसणार आहे. एअर इंडिया आणि इंडिगो या देशातील प्रमुख विमान कंपन्यांनी आपल्या देशांतर्गत विमान सेवांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विमानांची संख्या कमी होऊन ऐन सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांना तिकीट दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही कपात पुढील तीन महिने (जून ते ऑगस्ट) लागू राहणार आहे.
विमान सेवा कपातीची प्रमुख कारणे:
विमान कंपन्यांनी ही कपात करण्याचे मुख्य कारण म्हणजे आकाशाला गवसणी घालणारे 'एव्हिएशन टर्बाइन फ्युएल'चे (ATF) दर आणि प्रवासी मागणीतील घट.
१. इंधन दरवाढ: विमान इंधनाचे (ATF) दर १ लाख रुपये प्रति किलोलीटरच्या पुढे गेले आहेत. वाढत्या जागतिक तणावामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे विमान कंपन्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
२. प्रवासी मागणीत घट: शाळा-महाविद्यालयांच्या सुट्ट्या संपल्यानंतर प्रवाशांची संख्या घटते, अशा स्थितीत कमी प्रवासी संख्येसह विमाने चालवणे कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
३. रुपयाचे अवमूल्यन: डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे विमानांचे भाडे, विमा, देखभाल आणि सुटे भाग महागले आहेत. याचा थेट परिणाम कंपनीच्या नफ्यावर होत आहे.
प्रवासावर काय परिणाम होईल?
-
एअर इंडिया (Air India): एअर इंडिया आपल्या देशांतर्गत सेवांमध्ये १५ टक्क्यांपर्यंत कपात करणार आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गांवर विमानांच्या फेऱ्या कमी होतील.
-
इंडिगो (IndiGo): देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने ५ ते ७ टक्क्यांनी आपली सेवा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
भाडे वाढ: बाजारातील विमानांची उपलब्धता कमी झाल्यामुळे तिकिटांचे दर वाढणे निश्चित मानले जात आहे. ज्या प्रवाशांचे नियोजन आधीच निश्चित आहे, त्यांना वाढीव दराचा सामना करावा लागेल.
विमान कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की, पूर्णपणे मार्ग बंद केले जाणार नाहीत, तर केवळ विमानांच्या फेऱ्यांमध्ये तात्पुरती कपात केली जाईल. परिस्थिती सुधारल्यानंतर सेवा पुन्हा पूर्ववत केली जाईल, असे कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




