अजित पवार यांच्या निधनानंतर काहीच दिवसांनी राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी साठी घाई केल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी दिली आहे. सर्वसामान्य जनतेनेही याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच आज रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी शपथविधीवर शंका उपस्थित करत सुनेत्रा काकींची इच्छा नसताना शपथ दिली असावी असी शक्यता वर्तवली आहे. यावरून त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली आहे. रोहित पवार नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
काकींची इच्छा नसतानाही…
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘त्या नेत्यांकडे सत्ता आहे. राज्यात, ती मेंटेन ठेवण्यासाठी, ती सत्ता तशीच राहावी म्हणून ती गोष्ट महत्त्वाची वाटली असेल. मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्या विषयाकडे त्यांचं लक्ष गेलं. काकींची इच्छा नसताना त्यांनी त्यांना शपथ दिली असावी. सर्वांच्या प्रायोरिटी वेगळ्या आहेत. आमच्या काकाचा अपघात झाला ही आमची प्रायोरिटी आहे. काकी, पार्थ आणि जयलाही ही महत्त्वाची आहे. नेत्यांना काय महत्त्वाचं आहे हे गेल्या काही दिवसांपासून सर्वांना माहीत आहे.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘रोहित पवार काही गोष्टी मांडत असेल तर त्याला अफवा म्हणत नाही. ही रोखठोक म्हणतात. ज्यांना कुणाला काही वाटतं ते वाटू द्या. ते चारपाच लोक वेगळे आहेत. त्यांचा पक्ष वेगळा आहे. आमच्यासाठी काका महत्त्वाचे आहे. आमच्या काकाचा अपघात कसा झाला, याची उत्तरे आम्हाला माहीत पाहिजे.’
शरद पवारांच्या विधानावर भाष्य
अजित पवार यांनी 28 तारखेला अजित पवारांच्या अपघातावर बोलताना हा केवळ एक अपघात असल्याचे म्हटले होते. याबाबत प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले की, शरद पवारांनी 28 तारखेला स्टेटमेंट दिलं. अपघाताला सहा तास झाले असतील. मी 13 दिवसाने बोलतो. सहा तासात काय माहिती मिळणार. दुसऱ्या दिवशी लाखो लोक येणार होते. त्यामुळे अर्धवट माहिती दिली तर लाखो लोक काहीही करू शकले असते. तेवढी प्रगल्भता पवार साहेबांकडे आहे. म्हणून मी 13 दिवसानंतर मी बोलत आहे. काल साहेबांशी बोलणार होतो. पण त्यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे चर्चा झाली नाही. मी सतत सांगत होतो. ते साहेबांना माहीत होतं. त्यामुळे साहेबांनी मला काही विचारलं नाही. मीही त्यांना माहिती दिली नाही. पण त्यांच्या मनात काय आहे हे मला कळतं.
[embedded content]
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

