जे आज मिळाले नाही, ते आत्ताच मिळावे. जे उद्या मिळायचे असते ते ही आजच मिळावे. जे वेळेने तयार केले नाही त्याची ही प्राप्ती व्हावी. असा निसर्गामध्ये फक्त मनुष्याला हव्यास असतो. आज पृथ्वीचा पोटात बीज रोवले आणि उद्या काढून पाहिले की अंकुर फुटला कां नाही? परत दररोज पहिले, तर ते व्यर्थ दवडले जाईल. प्रत्येक निर्मिती ला योग्य वेळ आणि संधी दिली तरच वेळेत योग्य प्राप्ती होत असते. निसर्गाचा, पृथ्वीचा पर्यायाने काळाचा एक नियम असतो. प्रत्येक निर्मितीसाठी पुरेसा वेळ द्यावा लागत असतो. अर्थात योग्य वेळेपूर्वी निर्मिती होत नसते आणि म्हणूनच घाई करुन प्राप्तीचा प्रयत्न करु नये. याचा अर्थ, प्रयत्न, कष्ट, मेहनत करू नये किंवा आपल्या उत्कृष्ट ध्येया प्रती उदासीन रहावे असा नव्हे. निसर्गाचेच पहा : सूर्य त्याच्या वेळेवर उगवतो तुम्ही वाट पहा अथवा नका पाहू, तुम्ही प्रार्थना करा अथवा नका करू. कळीचे फुल योग्य वेळ झाल्यावरच उमलते. कुठल्याही झाडाला त्याची फळे यायला योग्य मोसमच लागतो. मोसमा पूर्वी नैसर्गिक पद्धतीने कधीही फुलं, फळं येत नाहीत. मूल थोडेसे मोठे झाल्यावरच त्याला वयानुसार योग्य तशी समज यायला लागते. सूर्य त्याच्या वेळेनुसार मावळतो. प्राणी पक्षी वेळेनुसार घराकडे जातात. पावसाळ्यात पाऊस पडतो, नद्या,नाले,ओढे वाहू लागतात. योग्य मोसमातच काही पक्षी प्राणी स्थलांतर करतात. चंद्रही त्याच्या वेळेनुसारच दिसायला लागतो. चांदणं दिसायलाही योग्य वेळच लागते. शितल शांतता मध्यरात्रीनंतरच येते. पहाट वेळेनुसार होते. पाखरांची किलबिल वेळेवरच सुरू होते. सर्व गोष्टी, उत्पत्ती आणि निर्मितीची प्रक्रिया ही काळाशी संबंधित आहे. अर्थात कालप्रमाण निसर्ग सिद्ध आहे. ते बद्ध आणि नियमशीर आहे. या सर्वांमध्ये घाई फक्त मनुष्याला असते. कोणता प्राणी झाडाला फळे लागल्याशिवाय झाडाखाली उड्या मारत नाही. तसेच कोणताही पक्षी झाडाला फळे आल्याशिवाय तेथे जाऊन खाद्य मिळण्याची अपेक्षा करत नाही. मग माणसानेच कोणत्याही वस्तूची नियमापूर्वी प्राप्तीची अपेक्षा का करावी? घाई मध्ये माणूस नेहमीच नक्कीच चुकत असतो. माणूस या साठी चुकतो की त्याला लोभ, मोह, वासना, स्पर्धा, प्राप्तीची इच्छा, संग्रह, ख्यातीमोह, मोठेपणा, गर्व,अहंकार या अनेक प्रकारच्या प्रवृत्ती असतात. अर्थातच या संस्कार, साधना आणि अज्ञानामुळे प्रत्येकात कमी अधिक प्रमाणात दिसून येतात. कोणात कोणती प्रवृत्ती अधिक तर दुसरी प्रवृत्ती थोडीशी कमी. मात्र या सर्व प्रवृत्ती सर्व व्यक्तींमध्ये दिसून येतात. व्यक्ती अवेळी प्राप्तीचा व्यर्थ आटापिटा करतो. त्यामध्ये तो स्वतःचे मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक स्वास्थ्य हरवून बसतो. त्याच्या या हव्यासाचे, लोभ-मोहाचे विपरीत परिणाम मात्र समाजाला भोगावे लागतात. आपण संग्रह केला की कुठेतरी त्याची उणीव निर्माण झालेली असते. मोठ्या प्रमाणावर वस्तू दाबून ठेवल्या की बाहेर त्याची किंमत महागाई वाढलेली असते. म्हणूनच आज या ठिकाणी इतकेच व्यक्त व्हायचे आहे की निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालावे, निर्मितीच्या प्रक्रियेला वेळ द्यावा, वेळेपूर्वी प्राप्तीची इच्छा नको. ध्येयप्राप्ती साठी मात्र कष्ट, मेहनत मार्गक्रमण चालू असावे. रोजची कर्तव्य रोजच करावीत. परंतु नको त्या गोष्टीचा हव्यास नको. निसर्ग नियमांनुसार, विश्वाच्या व्यवस्थेनुसार काही गोष्टी वेळेवरच मिळत असतात यावर विश्वास असावा. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- "शेअर बाजारात हाहाकार: ट्रम्प यांच्या विधानानंतर सेन्सेक्समध्ये १,६७७ अंकांची घसरण; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी पाण्यात"
- कोल्हापूरकरांनो सतर्क राहा! पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली, पावसाचा जोर कायम
महाराष्ट्र
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- पावसात रायगड किल्ल्यावर जाताय? अतिवृष्टीमुळे पायरी मार्ग दोन दिवस बंद; महाड प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
- कोल्हापूरकरांनो सतर्क राहा! पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली, पावसाचा जोर कायम
- मुंबई: नांदेड–मुंबईदरम्यान दोन अतिरिक्त साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या सुरू
गुन्हा
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- पश्चिम बंगाल: बारुईपूर १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा.
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!



























Subscribe to my channel


