जे आज मिळाले नाही, ते आत्ताच मिळावे. जे उद्या मिळायचे असते ते ही आजच मिळावे. जे वेळेने तयार केले नाही त्याची ही प्राप्ती व्हावी. असा निसर्गामध्ये फक्त मनुष्याला हव्यास असतो. आज पृथ्वीचा पोटात बीज रोवले आणि उद्या काढून पाहिले की अंकुर फुटला कां नाही? परत दररोज पहिले, तर ते व्यर्थ दवडले जाईल. प्रत्येक निर्मिती ला योग्य वेळ आणि संधी दिली तरच वेळेत योग्य प्राप्ती होत असते. निसर्गाचा, पृथ्वीचा पर्यायाने काळाचा एक नियम असतो. प्रत्येक निर्मितीसाठी पुरेसा वेळ द्यावा लागत असतो. अर्थात योग्य वेळेपूर्वी निर्मिती होत नसते आणि म्हणूनच घाई करुन प्राप्तीचा प्रयत्न करु नये. याचा अर्थ, प्रयत्न, कष्ट, मेहनत करू नये किंवा आपल्या उत्कृष्ट ध्येया प्रती उदासीन रहावे असा नव्हे. निसर्गाचेच पहा : सूर्य त्याच्या वेळेवर उगवतो तुम्ही वाट पहा अथवा नका पाहू, तुम्ही प्रार्थना करा अथवा नका करू. कळीचे फुल योग्य वेळ झाल्यावरच उमलते. कुठल्याही झाडाला त्याची फळे यायला योग्य मोसमच लागतो. मोसमा पूर्वी नैसर्गिक पद्धतीने कधीही फुलं, फळं येत नाहीत. मूल थोडेसे मोठे झाल्यावरच त्याला वयानुसार योग्य तशी समज यायला लागते. सूर्य त्याच्या वेळेनुसार मावळतो. प्राणी पक्षी वेळेनुसार घराकडे जातात. पावसाळ्यात पाऊस पडतो, नद्या,नाले,ओढे वाहू लागतात. योग्य मोसमातच काही पक्षी प्राणी स्थलांतर करतात. चंद्रही त्याच्या वेळेनुसारच दिसायला लागतो. चांदणं दिसायलाही योग्य वेळच लागते. शितल शांतता मध्यरात्रीनंतरच येते. पहाट वेळेनुसार होते. पाखरांची किलबिल वेळेवरच सुरू होते. सर्व गोष्टी, उत्पत्ती आणि निर्मितीची प्रक्रिया ही काळाशी संबंधित आहे. अर्थात कालप्रमाण निसर्ग सिद्ध आहे. ते बद्ध आणि नियमशीर आहे. या सर्वांमध्ये घाई फक्त मनुष्याला असते. कोणता प्राणी झाडाला फळे लागल्याशिवाय झाडाखाली उड्या मारत नाही. तसेच कोणताही पक्षी झाडाला फळे आल्याशिवाय तेथे जाऊन खाद्य मिळण्याची अपेक्षा करत नाही. मग माणसानेच कोणत्याही वस्तूची नियमापूर्वी प्राप्तीची अपेक्षा का करावी? घाई मध्ये माणूस नेहमीच नक्कीच चुकत असतो. माणूस या साठी चुकतो की त्याला लोभ, मोह, वासना, स्पर्धा, प्राप्तीची इच्छा, संग्रह, ख्यातीमोह, मोठेपणा, गर्व,अहंकार या अनेक प्रकारच्या प्रवृत्ती असतात. अर्थातच या संस्कार, साधना आणि अज्ञानामुळे प्रत्येकात कमी अधिक प्रमाणात दिसून येतात. कोणात कोणती प्रवृत्ती अधिक तर दुसरी प्रवृत्ती थोडीशी कमी. मात्र या सर्व प्रवृत्ती सर्व व्यक्तींमध्ये दिसून येतात. व्यक्ती अवेळी प्राप्तीचा व्यर्थ आटापिटा करतो. त्यामध्ये तो स्वतःचे मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक स्वास्थ्य हरवून बसतो. त्याच्या या हव्यासाचे, लोभ-मोहाचे विपरीत परिणाम मात्र समाजाला भोगावे लागतात. आपण संग्रह केला की कुठेतरी त्याची उणीव निर्माण झालेली असते. मोठ्या प्रमाणावर वस्तू दाबून ठेवल्या की बाहेर त्याची किंमत महागाई वाढलेली असते. म्हणूनच आज या ठिकाणी इतकेच व्यक्त व्हायचे आहे की निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालावे, निर्मितीच्या प्रक्रियेला वेळ द्यावा, वेळेपूर्वी प्राप्तीची इच्छा नको. ध्येयप्राप्ती साठी मात्र कष्ट, मेहनत मार्गक्रमण चालू असावे. रोजची कर्तव्य रोजच करावीत. परंतु नको त्या गोष्टीचा हव्यास नको. निसर्ग नियमांनुसार, विश्वाच्या व्यवस्थेनुसार काही गोष्टी वेळेवरच मिळत असतात यावर विश्वास असावा. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: दख्खनच्या ताजमहालात बेजबाबदारपणाचा कळस; ऐतिहासिक 'बीबी का मकबरा'च्या हौदात तरुणांचा धुडगूस, पर्यटकांत तीव्र संताप
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- मुंबई: १०५ दिवसांत सव्वा लाख रिक्षा-टॅक्सी चालकांचे मराठीवर प्रभुत्व; मराठी सक्तीची नाही, भक्तीची भाषा एकनाथ शिंदे
- मुंबई: राज ठाकरेंचा अपमान; भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
महाराष्ट्र
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- महाराष्ट्र: 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या अभिजित दीपकेंना केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची थेट खुली ऑफर; रिपब्लिकन पक्षात प्रवेश करण्याचे निमंत्रण
- छत्रपती संभाजीनगर: दख्खनच्या ताजमहालात बेजबाबदारपणाचा कळस; ऐतिहासिक 'बीबी का मकबरा'च्या हौदात तरुणांचा धुडगूस, पर्यटकांत तीव्र संताप
- मुंबई: १०५ दिवसांत सव्वा लाख रिक्षा-टॅक्सी चालकांचे मराठीवर प्रभुत्व; मराठी सक्तीची नाही, भक्तीची भाषा एकनाथ शिंदे
गुन्हा
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- उत्तर प्रदेश: वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या वृद्ध मातेची घरातच निर्घृण हत्या, सोन्याचे दागिने लांबवले
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले


























Subscribe to my channel


