नंदितेश निलय यांचा कॉलम:आज आपल्या जगाला “आध्यात्मिक नेतृत्वा’ ची खूप गरज आहे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

जगात सतत सुरू असलेले संघर्ष आपल्याला काही‎शिकवण देत आहेत का? कदाचित हो! या संघर्षांनी सर्वात‎मोठा धडा हाच दिला आहे की, या जगाला फक्त लीडर्स‎नकोत, तर असे लीडर्स हवे आहेत जे आध्यात्मिक‎बुद्धिमत्तेने परिपूर्ण असतील. आणि त्यांच्यात हा विश्वासही‎असायला हवा की राष्ट्राची शक्ती केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेतून‎येत नाही, तर अशा नेतृत्वातून येते, जे लीडरला‎जनसामान्यांपर्यंत आध्यात्मिक शक्ती पोहोचवण्याची‎जबाबदारीही देते. युवाल नोआ हरारी सांगतात की, 21 व्या‎शतकात आध्यात्मिकता पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहे,‎कारण या काळात अनेक आध्यात्मिक आणि दार्शनिक‎प्रश्न अचानक व्यावहारिक प्रश्न बनत चालले आहेत.‎त्यांच्या मते, आज युद्धाच्या संकटात ते सर्व प्रश्न जे‎कधीकाळी तत्त्वज्ञानाशी संबंधित होते, ते आता खूप‎महत्त्वाचे झाले आहेत आणि आपल्याला अशा वळणावर‎आणून सोडत आहेत, जिथे मानव स्वतः मानवाला पुन्हा‎डिझाइन करू शकतो. आज या जगाला आध्यात्मिक‎नेतृत्वाची सर्वाधिक गरज आहे, कारण जग पुन्हा विचारू‎लागले आहे की बॉम्ब शाळांवर का पडतात, गरीब आणखी‎गरीब का होत आहेत, फ्री-विल काय असते, माणूस‎असण्याचा अर्थ काय आणि माणुसकी काय आहे? हरारी‎ही बाब थेट त्या कंपन्यांशी जोडतात, ज्या आपल्या‎भविष्याला आकार देत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की‎टेक-कंपन्यांनाही खरोखरच तत्त्वज्ञांची गरज आहे. त्यांना‎अध्यात्माच्या जाणकारांची आवश्यकता आहे, जेणेकरून ते‎नेमके काय करत आहेत हे त्यांना समजू शकेल.‎आध्यात्मिक नेतृत्वच तो विश्वास प्रस्थापित करते, जो‎आजच्या जगात दिवसेंदिवस तुटत चालला आहे.‎ या युद्धांनी सर्वात मोठी शिकवण ही दिली आहे की तमाम‎करार आणि तहांनंतरही राष्ट्रांमध्ये तो विश्वास उरलेला नाही.‎ज्या आर्थिक अवलंबित्वावर जग टिकून होते, तेदेखील युद्धे‎रोखू शकले नाही आणि सर्व आंतरराष्ट्रीय संस्थाही युद्ध‎रोखण्यात अपयशी ठरल्या. कारण आध्यात्मिक‎लीडरशिपचे नेतृत्व करणारे लीडर्सच त्यांना मिळू शकले‎नाहीत. तो हरवलेला विश्वास फक्त असेच नेतृत्व परत‎आणू शकते, ज्याच्या प्रतिमेत कोणतेही लपलेले युद्ध नसेल,‎कोणतीही डोकावणारी क्रूरता नसेल, तर तो शांतता आणि‎साधनेचा नायक असेल, जो जगाला वाचवण्याचा‎सर्वतोपरी प्रयत्न करेल. आज आपल्याला अशा‎“स्पिरिचुअल कोशेंट’ ची गरज आहे, जो जगाला‎वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. आणि या जगाला‎कोणत्याही पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये विभागले जाऊ‎देणार नाही. आज एकीकडे एआयपासून मानवतेला‎वाचवण्याची धडपड सुरू आहे, तर दुसरीकडे‎सर्वसामान्यांमध्ये नेतृत्वाविषयीचा तो विश्वासही तुटत‎चालला आहे, जो कोणत्याही समाजाला आणि देशाला‎घडवतो आणि वाचवतोही. सर्व राष्ट्रे जणू एखादा राजकीय‎आखाडा बनत चालली आहेत, जिथे कोणतेही नाते किंवा‎ओळख या गोष्टीवर अवलंबून असते की कुणाची राजकीय‎बांधिलकी काय आहे? कोण पक्षात आहे तर कोण‎विरोधात आहे? पश्चिम आशियातील संघर्षामध्येही हेच‎पाहायला मिळाले की आपला स्वार्थ साधण्यासाठी‎जगातील देश शस्त्रे तर विकू शकतात, पण युद्ध रोखण्याचा‎कोणताही प्रयत्न करू इच्छित नाहीत. कारण तिथेही तमाम‎राष्ट्रांमध्ये एक पक्ष आणि विरोधी पक्ष निर्माण झालेला‎असतो. जगाला असे लीडर हवे आहेत, जे प्रेम आणि‎सलोख्याने जगायला शिकवतील. आध्यात्मिक लीडरशिप‎जनतेला आत्मिक शक्तीने परिपूर्ण करते. ती नेतृत्वाला त्या‎अहंकारापासून वाचवते, जो जगाला शस्त्रांनी जिंकू पाहतो‎आणि कधीही न संपणाऱ्या संघर्षात लोटून देतो. ज्यामध्ये‎पश्चात्ताप करण्याचीही संधी नसते. कोविडनंतर युद्धांमध्ये‎बुडालेले जग आता त्या आध्यात्मिक लीडरशिपला साद‎घालत आहे, जी आपल्याला जीवनाच्या होर्मुझमधून‎सुरक्षित बाहेर काढण्यास सक्षम असेल!‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *