जुन्या काळी लोक १०० वर्षे निरोगी आयुष्य जगायची, कारण त्यांचा निसर्गाशी आणि आयुर्वेदाशी जवळचा संबंध होता. मात्र, आजची आधुनिक जीवनशैली आपल्याला अकाली वृद्धत्वाकडे आणि आजारांकडे ढकलत आहे, असे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे. पतंजली वेलनेसच्या माध्यमातून संवाद साधताना त्यांनी स्वयंपाकघरातील अशा काही गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे तुमचे शरीर आतून पोखरत आहे.
हल्ली धावपळीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल तरुण वयातच गंभीर आजार जडत आहेत. अशा परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव यांनी निरोगी राहण्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
पांढरे पदार्थ टाळा
बाबा रामदेव यांच्या मते, आपल्या ताटात दिसणारे पांढरे पदार्थ हे आरोग्यासाठी सर्वात मोठे शत्रू आहेत. त्यामुळे प्रामुख्याने खालील चार गोष्टींचा त्याग करावा.
- साखर: ही केवळ मधुमेहाला निमंत्रण देत नाही, तर शरीरातील जळजळ वाढवते आणि त्वचेच्या समस्यांना कारणीभूत ठरते.
- मैदा: पांढरे पीठ किंवा मैदा आतड्यांना चिटकून बसतो, ज्यामुळे पचनशक्ती मंदावते आणि बद्धकोष्ठतेसारखे आजार उद्भवतात.
- पांढरा तांदूळ: अतिप्रमाणात पॉलिश केलेल्या तांदळाचा वापर टाळून त्याऐवजी ब्राऊन राईस वापरावा.
- रिफाईंड तेल: याला त्यांनी बनावट तेल असे संबोधले आहे. हे तेल शुद्ध करण्यासाठी वापरली जाणारी रसायने हृदयाच्या आरोग्यासाठी घातक आहेत.
शॅम्पूपासून टूथपेस्टपर्यंत सर्वत्र रसायनांचा वापर
आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढी सौंदर्यप्रसाधने किंवा स्वच्छतेची उत्पादने वापरतो. त्यात मोठ्या प्रमाणात रसायने असतात. फेस वॉश, शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणामधील केमिकल्स त्वचेद्वारे शोषली जातात. हळूहळू यकृत (Liver) व मूत्रपिंडाच्या (Kidney) कार्यावर परिणाम करतात, असे बाबा रामदेव यांनी म्हटले. या रसायनांमुळे शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती नष्ट होते. कर्करोगाचा धोका वाढतो.
नैसर्गिक पर्याय काय?
रिफाइंड तेलाऐवजी मोहरी, तीळ किंवा नारळाच्या कोल्ड प्रेस ऑईलचा वापर करावा. तसेच, रासायनिक सौंदर्यप्रसाधनांऐवजी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पर्यायांचा अवलंब केल्यास शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होऊन आर्थिक नुकसानही टाळता येईल. तसेच साखरेऐवजी सेंद्रिय गूळ वापरावा. तसेच रासायनिक क्लिनर्सऐवजी लिंबू, कडुनिंब आणि गोमूत्र अर्कासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून घर आणि शरीर स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा.
प्रतिबंध हाच उपचार
आजकाल लोक आजारी पडल्यावर हजारो रुपये डॉक्टरांकडे आणि औषधांवर खर्च करतात. यामुळे आर्थिक भार तर वाढतोच, पण शरीरही औषधांच्या दुष्परिणामांमुळे थकते. जर आपण आपल्या जीवनशैलीतून काही अतिरिक्त गोष्टी काढून टाकल्या, तर आपल्याला डॉक्टरांची गरजच भासणार नाही,” असे बाबा रामदेव यांनी ठामपणे सांगितले.
शहर
- पुणे : फुगेवाडीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर; सरकारी मदतीची अपेक्षा.
- पुणे: रावेतमध्ये २९ वर्षीय महिला डॉक्टरने २४ व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवलं आयुष्य.
- FDA ची मोठी कारवाई! नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील ७ हॉटेलांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित
- कुंभमेळा रस्ते निविदा घोटाळा: २,२७० कोटींच्या कामांत १६ कंत्राटदारांची 'रिंग' करून भ्रष्टाचार; उच्चस्तरीय चौकशीची मागणी!
महाराष्ट्र
- पुणे : फुगेवाडीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर; सरकारी मदतीची अपेक्षा.
- पुणे: रावेतमध्ये २९ वर्षीय महिला डॉक्टरने २४ व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवलं आयुष्य.
- FDA ची मोठी कारवाई! नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील ७ हॉटेलांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित
- कांदा दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फायदा; घोडेगाव उपबाजारात अवघ्या आठ दिवसांत २७ कोटींची उलाढाल!
गुन्हा
- पुणे: ५ कोटींच्या वेतन घोटाळ्यात सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्थापकासह ७ जणांवर गुन्हा दाखल.
- ओरोसमध्ये गुटखा माफियांचे धाबे दणाणले; २१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि मालवाहू वाहन जप्त, तिघांवर गुन्हा दाखल.
- नवी मुंबई: लोकलमध्ये हाहाकार! वाशी-जुईनगर दरम्यान धावत्या लोकलवर दगडफेक; रेल्वे गार्ड गंभीर जखमी.
- साताऱ्यात बनावट नोटांचे रॅकेट उघड; उरूलच्या सरपंचासह पाच जणांवर गुन्हा दाखल, १७ बनावट नोटा जप्त.
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- आग्रा हादरले! पतीची निर्घृण हत्या करून मृतदेह बाथरूममध्ये पुरला; ४५ दिवसांनंतर धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा!
- इंधन दरांचे मोठे गुपित: पेट्रोल ६ रुपये तर डिझेल १८९ रुपये कसे? कंपन्या दर वाढवण्याचे धाडस का करत नाहीत? जाणून घ्या सत्य.
- भारतीय सैन्याची ताकद वाढणार! ५२,००० कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी; लष्कर, नौदल आणि वायुदलाला मिळणार आधुनिक शस्त्रास्त्रे.
- एक गूढ कलाकृती: 'विकृत' वाटणाऱ्या त्या चित्राला पाहण्यासाठी आजही का लागतात लांबच लांब रांगा?


























Subscribe to my channel




