जुन्या काळी लोक १०० वर्षे निरोगी आयुष्य जगायची, कारण त्यांचा निसर्गाशी आणि आयुर्वेदाशी जवळचा संबंध होता. मात्र, आजची आधुनिक जीवनशैली आपल्याला अकाली वृद्धत्वाकडे आणि आजारांकडे ढकलत आहे, असे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे. पतंजली वेलनेसच्या माध्यमातून संवाद साधताना त्यांनी स्वयंपाकघरातील अशा काही गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे तुमचे शरीर आतून पोखरत आहे.
हल्ली धावपळीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल तरुण वयातच गंभीर आजार जडत आहेत. अशा परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव यांनी निरोगी राहण्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
पांढरे पदार्थ टाळा
बाबा रामदेव यांच्या मते, आपल्या ताटात दिसणारे पांढरे पदार्थ हे आरोग्यासाठी सर्वात मोठे शत्रू आहेत. त्यामुळे प्रामुख्याने खालील चार गोष्टींचा त्याग करावा.
- साखर: ही केवळ मधुमेहाला निमंत्रण देत नाही, तर शरीरातील जळजळ वाढवते आणि त्वचेच्या समस्यांना कारणीभूत ठरते.
- मैदा: पांढरे पीठ किंवा मैदा आतड्यांना चिटकून बसतो, ज्यामुळे पचनशक्ती मंदावते आणि बद्धकोष्ठतेसारखे आजार उद्भवतात.
- पांढरा तांदूळ: अतिप्रमाणात पॉलिश केलेल्या तांदळाचा वापर टाळून त्याऐवजी ब्राऊन राईस वापरावा.
- रिफाईंड तेल: याला त्यांनी बनावट तेल असे संबोधले आहे. हे तेल शुद्ध करण्यासाठी वापरली जाणारी रसायने हृदयाच्या आरोग्यासाठी घातक आहेत.
शॅम्पूपासून टूथपेस्टपर्यंत सर्वत्र रसायनांचा वापर
आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढी सौंदर्यप्रसाधने किंवा स्वच्छतेची उत्पादने वापरतो. त्यात मोठ्या प्रमाणात रसायने असतात. फेस वॉश, शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणामधील केमिकल्स त्वचेद्वारे शोषली जातात. हळूहळू यकृत (Liver) व मूत्रपिंडाच्या (Kidney) कार्यावर परिणाम करतात, असे बाबा रामदेव यांनी म्हटले. या रसायनांमुळे शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती नष्ट होते. कर्करोगाचा धोका वाढतो.
नैसर्गिक पर्याय काय?
रिफाइंड तेलाऐवजी मोहरी, तीळ किंवा नारळाच्या कोल्ड प्रेस ऑईलचा वापर करावा. तसेच, रासायनिक सौंदर्यप्रसाधनांऐवजी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पर्यायांचा अवलंब केल्यास शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होऊन आर्थिक नुकसानही टाळता येईल. तसेच साखरेऐवजी सेंद्रिय गूळ वापरावा. तसेच रासायनिक क्लिनर्सऐवजी लिंबू, कडुनिंब आणि गोमूत्र अर्कासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून घर आणि शरीर स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा.
प्रतिबंध हाच उपचार
आजकाल लोक आजारी पडल्यावर हजारो रुपये डॉक्टरांकडे आणि औषधांवर खर्च करतात. यामुळे आर्थिक भार तर वाढतोच, पण शरीरही औषधांच्या दुष्परिणामांमुळे थकते. जर आपण आपल्या जीवनशैलीतून काही अतिरिक्त गोष्टी काढून टाकल्या, तर आपल्याला डॉक्टरांची गरजच भासणार नाही,” असे बाबा रामदेव यांनी ठामपणे सांगितले.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




