एन. रघुरामन यांचा कॉलम:शिक्षणातून मिळालेल्या प्रकाशाने इतरांचा मार्गही उज्ज्वल करू शकता

मध्य प्रदेशातील चंदेरी येथील एका शांत आणि धुळीने माखलेल्या गावात आयुष्य अत्यंत संथ आणि कठीण होते. येथे राहणारी कुटुंबे शेतात काम करून आपला उदरनिर्वाह करत असत आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरांवरच त्यांचा विश्वास होता. यांपैकीच एक होते साक्षीचे कुटुंब. त्यांच्या घराण्यात आजवर कुणीही चौथीच्या पुढे शिकले नव्हते. पिढ्यान‌्पिढ्या त्यांच्यासाठी जीवनाचा अर्थ अक्षरे नसून केवळ शारीरिक कष्ट हाच होता. तिचे वडील अशिक्षित होते आणि आई पुनाबाई पुढच्या वेळच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत असे. शिक्षण त्यांच्यासाठी खूप दूरची गोष्ट होती- एक अशी लक्झरी, जी फक्त श्रीमंतांसाठीच होती. साक्षी लहान असतानाच पीक वाया गेल्याने आणि अत्यंत गरिबीमुळे कुटुंबाला एक धोकादायक निर्णय घेणे भाग पडले. त्यांनी आपले एकमेव घर सोडले आणि शेकडो किलोमीटर दूर असलेल्या उत्तरेकडील गजबजलेल्या महानगर नवी दिल्ली येथे आले. मोठे शहर आपल्याला एक नवीन सुरुवात करून देईल या आशेने, ते ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ असलेल्या एका गर्दीच्या झोपडपट्टीत राहू लागले. परंतु येथे एक वेगळीच अडचण समोर आली. दिल्लीत आल्यानंतर काही दिवसांतच साक्षीचे वडील गंभीर आजारी पडले आणि अनेक वर्षे त्यांना काम करता आले नाही. उदरनिर्वाहाची सर्व जबाबदारी पूर्णपणे आई पुनाबाई यांच्यावर आली. त्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी घरांमध्ये भांडी घासून महिन्याला दहा हजार रुपये कमावत असत. राजधानीच्या गर्दीच्या गल्लीबोळांत साक्षीचे बालपण युनिफॉर्म, स्कूल बॅग आणि पुस्तकांशिवायच गेले. क्लासरूम तोपर्यंत तिच्यासाठी आवाक्याबाहेर होता, जोपर्यंत 2022 च्या एका दुपारने तिचे नशीब कायमचे बदलले नाही. एका धुळीने माखलेल्या पार्किंगमधून जात असताना, त्या टीनएजर साक्षीने एक अनोखे दृश्य पाहिले. उघड्या आकाशाखाली मुले रांगेत बसली होती. त्यांच्यासमोर दिल्ली पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल थान सिंह उभे राहून एक तात्पुरती शाळा चालवत होते, ज्याला ‘थान सिंह की पाठशाला’ म्हटले जाते. साक्षी तिथेच थांबून पाहू लागली. तिची उत्सुकता पाहून थान सिंह यांनी असे काही केले जे यापूर्वी कुणीही केले नव्हते- त्यांनी साक्षीच्या हातात पुस्तक सोपवले. त्याच फुटपाथवर खाकी वर्दीतील त्या माणसाने साक्षीला पहिल्यांदा अक्षरे शिकवली. साक्षीची चिकाटी पाहून ते तिथेच थांबले नाहीत. त्यांनी साक्षीला थेट सातवी इयत्तेत प्रवेश मिळवून दिला. तिला पुस्तके आणि इतर आवश्यक साहित्यही मिळवून दिले, ज्याची तिला खूप गरज होती. हा बदल साक्षीसाठी खूप भीिदायक होता. ती तिच्या वर्गमित्रांपेक्षा अनेक वर्षे मागे होती आणि विशेषतः गणित तिला खूप कठीण वाटत होते. अंक तिला एखाद्या उंच भिंतीसारखे वाटायचे. परंतु तिने परिस्थितीला स्वतःपेक्षा वरचढ होऊ दिले नाही. कुटुंबाच्या एका लहान आणि अरुंद खोलीच्या कोपऱ्यात, जिथे एकच बल्ब जळत होता, साक्षीने तिचे एक जग निर्माण केले. प्लास्टिकची मिल्क क्रॅट तिची बुकशेल्फ बनली आणि लाकडाचा एक सपाट तुकडा तिचा स्टडी डेस्क बनला. रोज घरी परतल्यावर ती थेट त्याच कोपऱ्यात बसायची आणि उशिरा रात्रीपर्यंत अभ्यास करायची. तिची अथक मेहनत फळाला आली. अलीकडेच दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात, साक्षी तिच्या कुटुंबाच्या इतिहासात ही महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण होणारी पहिली मुलगी ठरली. अशिक्षेचे हे चक्र तोडल्यानंतर, साक्षी लगेचच लाल किल्ल्याजवळील त्याच पार्किंगमध्ये परतली. आता 18 वर्षांची साक्षी दुसऱ्या बाजूला बसून शिक्षिका म्हणून सहा-सात वर्षांच्या मुलांना शिकवते. शिकवता शिकवता तिने आपल्या गणिताच्या भीतीवरही मात केली आहे. जेव्हा ती तिच्या उत्साही विद्यार्थ्यांना पाहते, तेव्हािस अधिकाऱ्यापासून प्रेरणा घेऊन, साक्षी आता तिच्या लाकडी डेस्कवर बसून एक नवीन स्वप्न पाहत आहे: सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी बनणे. फंडा असा आहे की, तुमची सद्य:स्थिती तुमची अंतिम ध्येय निश्चित करत नाही. खरे सक्षमीकरण तेव्हाच येते, जेव्हा तुम्ही तुमच्या यशाचा वापर करून तुमच्या मागे येणाऱ्यांचा मार्ग मोकळा करता.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *