गरीबीवर खूप चर्चा होते. पण आपण एका नव्या‘एज्युकेशन ट्रॅप’मध्ये तर अडकत नाही ना? भारताची65 टक्के लोकसंख्या तरुण आहे. अशा वेळी या युवाशक्तीला देशाची ताकद बनवणे हे शासनाचे सर्वोच्चप्राधान्य असायला हवे. परंतु आपली धोरणे,शिक्षण-व्यवस्था व रोजगारनिर्मितीची प्रणाली तरुणांच्याक्षमतेचा पूर्ण विकास करत आहे का? येत्या दशकातभारताकडे उपलब्ध असणाऱ्या कार्यक्षम मनुष्यबळाचीक्षमता हळूहळू कमी होत चालली आहे. परवडणाऱ्या,दर्जेदार शिक्षणाच्या संधी कमी होणे, हे यामागचे मुख्यकारण आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी उत्तमजीवनशैलीचे स्वप्न हे शिक्षण आणि योग्य कौशल्यांशी जोडलेले असते. पूर्वी साईनबोर्ड आणि पोस्टर बनवणारा पेंटर आता संगणक डिझायनिंग शिकून फ्लेक्स बनवू लागला. आपण स्वतःमध्ये सतत बदल घडवतशारीरिक श्रमाकडून स्वयंचलित उत्पादनाकडे वळले पाहिजे. आपल्या मजबूत शिक्षण-व्यवस्थेच्या जोरावर आपण जगाला उत्तम गुणवत्ता दिली आहे. पण आपणती आघाडी कायम ठेवली आहे का? की नव्याप्रयोगांच्या शर्यतीत आपण आपली मूळ संस्थात्मकताकदच कमकुवत करून बसलो आहोत? आपल्याआधीच्या पिढीला स्वस्त व सुलभ सार्वजनिक शिक्षणसंस्था उपलब्ध होत्या. याउलट आजच्या तरुण पिढीलाफी आणि कोचिंगवर प्रचंड खर्च करावा लागतो. शेवटीही पिढी परीक्षा, निवड प्रक्रियेत अपयशी ठरणाऱ्याजाळ्यात अडकून पडते. गुणवत्ता टिकवणे आणिशिक्षण सुलभ करणे ही संस्थांची जबाबदारी होती.त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे तरुणांसमोर व्यावसायिकपर्याय निवडण्याच्या संधी कमी होत आहेत. हाच तो‘एज्युकेशन ट्रॅप’ आहे – एक दुष्टचक्र. यातून बाहेरपडणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. जुन्याआणि नामांकित व्यावसायिक संस्था प्रवेश परीक्षा योग्यउमेदवार निवडण्यात अपयशी ठरत आहेत. यामुळेविद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची या यंत्रणांची क्षमताखरोखरच उरली आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माणहोतो. भारत आपल्या कुशल, प्रशिक्षित व सुशिक्षित मनुष्यबळाला जगभरात पाठवण्यासाठी ओळखलाजातो. या लोकांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरस्वतःच्या संस्थांचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केलेआहे. भारतातही त्यांनी सरकारी, सार्वजनिक आणिखाजगी क्षेत्रात मोलाचे योगदान देऊन देश एका नव्याउंचीवर नेला. यातल्या बहुतांश लोकांनी आपले शिक्षणसरकारी शाळा आणि कॉलेजांमधूनच पूर्ण केले होते.करदात्यांच्या पैशांचा योग्य वापर करून अत्यंत दर्जेदारआणि स्वस्त शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचवणे, हेसरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. वाढती लोकसंख्याआणि उत्तम व्यावसायिक शिक्षणासाठी वाढणारी स्पर्धापाहता, आज आपण खरोखरच स्वस्त शिक्षण देऊशकत आहोत का? हा एक मोठा प्रश्न आहे. 2002 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीद्वारे कलम 21-अ जोडूनशिक्षणाचा अधिकार हा मूलभूत हक्क बनवण्यातआला. 1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा लागू झाला.यामुळे सार्वजनिक शिक्षणाचा हक्क सर्वांना मिळण्यावरभर दिला गेला. शाळांमधील पटसंख्या 98 टक्क्यांपर्यंतपोहोचली आणि लाखो मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली.परंतु ‘लर्निंग डेफिसिट’ म्हणजेच शिकण्याच्यागुणवत्तेतील तूट कायम राहिली. ही यंत्रणा मजबूतकरण्याऐवजी आपले लक्ष खाजगी शाळांमधीलप्रवेशांकडे वळले. परिणामी शिक्षण दिवसेंदिवस महागहोत गेले. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार, गेल्यादशकात 94,000 सरकारी शाळा एकतर बंद झाल्याकिंवा त्यांचे विलीनीकरण केले. यामुळे वंचितघटकांसाठी शिक्षणाची उपलब्धता हा प्रश्न अधिकगंभीर बनला. देशाच्या दुर्गम भागांपर्यंत शिक्षणपोहोचवण्याचे प्रयत्न मागे पडले. सरकारी शाळांमधीलप्रवेशांचे प्रमाण 6 टक्क्यांनी घटले . शाळा सोडणाऱ्यामुलांची संख्या वाढली. अशा प्रकारे,सामाजिक वआर्थिक दरी मिटवण्याचे शिक्षण मोठे माध्यम असायलाहवे होते. तेच शिक्षण आज ही दरी अधिक रुंदावतानादिसत आहे. (लेखिकेचे हे वैयक्तिक मत आहे.) सरकारी शाळांची संख्या 2014-15मधील 11.07 लाखांवरून घटून2024-25 मध्ये 10.13 लाखावर आली.ही घसरण देशात लाखो ‘गहाळविद्यार्थ्यां’ची स्थिती आहे. हा समूह एकावंचित लोकसंख्येच्या रूपात आव्हानबनून राहील .
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



